शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

मनोज जरांगे पाटील विधानसभेच्या रिंगणात उतरणार?; २९ ऑगस्टला होणार मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 13:22 IST

लढायचं की पाडायचं...२९ तारखेला होणार निर्णय, मराठा समाज सर्व समाजातील घटकांसह मैदानात उतरण्याच्या तयारीत. 

पुणे - मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून आंदोलनात उतरलेले मनोज जरांगे पाटील आता विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून जरांगे पाटील यांची मराठा समाज शांतता रॅली पश्चिम महाराष्ट्रात सुरू आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही असा पवित्रा जरांगे पाटलांनी घेतला आहे. मात्र आगमी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील २९ ऑगस्टला मोठा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.

याबाबत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राजकारणातले डाव सांगायचे नसतात. २९ ऑगस्टला निवडणूक लढायची की नाही हे ठरवणार आहोत. माझ्या शरीरापेक्षा माझा समाज महत्त्वाचा आहे. समाजाला न्याय देणं गरजेचे आहे. सगळं आता सांगणार नाही. राजकारणात काही गोष्टी उघड्या करायच्या नसतात. राजकारण हे टक्क्यावर नसते तर २९ ऑगस्टला फायनल निर्णय होणार असल्याचं त्यांनी सांगितले. 

तसेच ओबीसी-मराठा एकत्र आहे. गोरगरिब मराठ्यांचे, ओबीसींचे वाटोळे करू नका. राजकारण साध्य करण्यासाठी भांडणे लावू नका. किती निवडून आणायचे हे मी बघतो. मराठा समाजात फूट दाखवायची हे षडयंत्र देवेंद्र फडणवीसांचे आहे. मराठ्यांमध्ये फूट पडणार नाही. फडणवीसांचे स्वप्न कधीच साकार होणार नाही. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मराठ्यात फूट पडणार नाही. ओबीसीतून आरक्षण मिळवणारच, राखीव जागेतून आमच्या विचारांची माणसे निवडून आणणार. सर्व जातीधर्माचे लोक आम्ही उभे करणार. ही सर्वसामान्यांची लाट असणार आहे असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

दरम्यान, माझ्या मुख्यमंत्रिपदाचे बॅनर हे समाजातील भावना आहे. परंतु मी स्वार्थी नाही. मला त्याचा नाद नाही. समाजाला लुटून मी मोठा होणार नाही. सर्व समाजातील गोरगरिब सत्तेत आणायचे आहेत. आम्ही विधानसभा निवडणुकीची तयारी करतोय. लढायचं की पाडायचं हे २९ तारखेला अंतिम होणार आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४