शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

२५ हजार विद्यार्थ्यांनी भरले महाविद्यालयांचे पसंतीक्रम

By admin | Updated: June 19, 2014 03:17 IST

दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेचे अर्ज भरण्यास पहिल्याच दिवशी भरघोस प्रतिसाद लाभला

मुंबई : दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेचे अर्ज भरण्यास पहिल्याच दिवशी भरघोस प्रतिसाद लाभला. बुधवारपर्यंत ९५ हजार २५४ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरला आहे. तर निकालानंतर पहिल्याच दिवशी २५ हजार विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम अर्ज भरले. यापैकी २ हजार ४५५ अर्ज सादर झाले आहेत.अकरावी आॅनलाइन प्रवेशाचे संकेतस्थळ २४ एप्रिलपासून खुले करण्यात आले आहे. दहावी परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी अकरावीचा प्रवेश अर्ज भरून ठेवला होता. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी अर्जाचा दुसरा भाग म्हणजेच गुण व महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्यास सुरुवात केली आहे. संकेतस्थळ सुरू झाल्यापासून ९५ हजार २५४ विद्यार्थ्यांनी अर्ज भरला आहे.निकालानंतर अकरावी आॅनलाइन प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी २५ हजार ११० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. त्यापैकी १४ हजार ०८९ अर्ज अपूर्ण असून ८ हजार ५६६ विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण भरले आहेत. तसेच २ हजार ४५५ विद्यार्थ्यांनी प्रवेशाचे अर्ज सादर केले आहेत. मुंबईतील विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने अर्ज पूर्णपणे भरलेले आहेत. यामध्ये पश्चिम मुंबईतून सर्वाधिक म्हणजे १ हजार १३ विद्यार्थ्यांनी आपले अर्ज सादर केले आहेत, तर दक्षिण मुंबईतून ५३६ आणि उत्तर मुंबईतील २५६ विद्यार्थ्यांनी आपले अर्ज सादर केले आहेत.