शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पूर्व द्रुतगती महामार्ग २ तास बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 04:00 IST

महाराष्ट्र बंदचे तीव्र पडसाद गोवंडी-चेंबूर भागांत उमटले. गोवंडी येथे आंदोलकांनी पूर्व द्रुतगती महामार्ग रोखला. शंभर ते सव्वाशे आंदोलकांनी रस्त्यावर उतरत येथून एकही वाहन पुढे जाऊ दिले नाही, याउलट मंगळवारी आंदोलकांनी लक्ष्य केलेल्या सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक सुरळीत होती.

मुंबई - महाराष्ट्र बंदचे तीव्र पडसाद गोवंडी-चेंबूर भागांत उमटले. गोवंडी येथे आंदोलकांनी पूर्व द्रुतगती महामार्ग रोखला. शंभर ते सव्वाशे आंदोलकांनी रस्त्यावर उतरत येथून एकही वाहन पुढे जाऊ दिले नाही, याउलट मंगळवारी आंदोलकांनी लक्ष्य केलेल्या सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक सुरळीत होती.बुधवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास गोवंडी येथे जमाव पूर्व द्रुतगती महामार्गावर उतरला. जमावामध्ये ७-१० वर्षांच्या मुलांची संख्या मोठी होती. जमावाने पुलावर येताना उड्डाणपुलाखाली ठेवलेले बॅरिगेट्स सोबत आणले होते. सदर बॅरिगेट्स द्रुतगती मार्गावर लावून वाहतूक रोखली. नेहमीपेक्षा वाहनांची वर्दळ कमी असल्याने सुरुवातीला मोठी कोंडी झाली नाही, परंतु दुपारी १नंतर द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.सकाळी ९च्या सुमारास आणि दुपारी १२ वाजता आंदोलकांनी चेंबूर नाका येथे प्रत्येकी १५ मिनिटे ‘रास्ता रोको’ केला. यामुळे सायन पनवेल मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. उर्वरित दिवसभर या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू होती. दरम्यान, चेंबूर नाक्यावर आंदोलन करणारे आंदोलक चेंबूर परिसरातील प्रत्येक प्रमुख रस्त्यावर वाहतूक रोखूत होते़महिला व तरुणींचाही सहभागगोवंडी व चेंबूरमध्ये ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनांत महिला आणि तरुणींचा मोठा सहभाग होता. प्रामुख्याने गोवंडी येथील पूर्व द्रुतगती महामार्ग रोखण्यात महिला पुढे होत्या. महिला घोषणाबाजी करत पुलावर उतरल्या. रस्त्यावरील वाहतूक नियंत्रणात आणल्यानंतर महिला आंदोलक रस्त्यावर बसल्या. निळे झेंडे, निषेधात्मक फलक हाती घेऊन या महिला घोषणा देत होत्या, तर मुलींनी रस्त्यावरील वाहतूक रोखली होती. रस्त्यावर येणाºया प्रत्येक वाहनास तरुणींसह लहान मुलीही रोखत होत्या.मुख्यमंत्र्यांनी संयुक्त बैठक घ्यावीआंबेडकरी जनतेचा रोष पाहता, मुख्यमंत्र्यांनी राज्यातील वातावरण निवळण्यासाठी सर्व आंबेडकरी संघटनांची एक संयुक्त बैठक घेण्याची मागणी भीम क्रांती संघटनेने केली आहे. भीमा कोरेगाव येथील भ्याड हल्ल्यासंदर्भात नेमकी काय कारवाई करणार? यावर मुख्यमंत्र्यांनी संबंधित बैठकीत उजाळा टाकावा. जेणेकरून राज्यात शांतता प्रस्थापित होईल, असे मत संघटनेचे अध्यक्ष राजेश सोनवणे यांनी व्यक्त केले आहे.आठवले, पासवान यांनी राजीनामा द्यावा!केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि केंद्रीय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री रामविलास पासवान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (खरात)चे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंद