शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
4
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
5
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
6
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
7
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
8
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
9
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
10
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
12
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
13
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
14
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
15
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
16
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
17
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
18
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
19
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
20
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र

पूर्व द्रुतगती महामार्ग २ तास बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 04:00 IST

महाराष्ट्र बंदचे तीव्र पडसाद गोवंडी-चेंबूर भागांत उमटले. गोवंडी येथे आंदोलकांनी पूर्व द्रुतगती महामार्ग रोखला. शंभर ते सव्वाशे आंदोलकांनी रस्त्यावर उतरत येथून एकही वाहन पुढे जाऊ दिले नाही, याउलट मंगळवारी आंदोलकांनी लक्ष्य केलेल्या सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक सुरळीत होती.

मुंबई - महाराष्ट्र बंदचे तीव्र पडसाद गोवंडी-चेंबूर भागांत उमटले. गोवंडी येथे आंदोलकांनी पूर्व द्रुतगती महामार्ग रोखला. शंभर ते सव्वाशे आंदोलकांनी रस्त्यावर उतरत येथून एकही वाहन पुढे जाऊ दिले नाही, याउलट मंगळवारी आंदोलकांनी लक्ष्य केलेल्या सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक सुरळीत होती.बुधवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास गोवंडी येथे जमाव पूर्व द्रुतगती महामार्गावर उतरला. जमावामध्ये ७-१० वर्षांच्या मुलांची संख्या मोठी होती. जमावाने पुलावर येताना उड्डाणपुलाखाली ठेवलेले बॅरिगेट्स सोबत आणले होते. सदर बॅरिगेट्स द्रुतगती मार्गावर लावून वाहतूक रोखली. नेहमीपेक्षा वाहनांची वर्दळ कमी असल्याने सुरुवातीला मोठी कोंडी झाली नाही, परंतु दुपारी १नंतर द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.सकाळी ९च्या सुमारास आणि दुपारी १२ वाजता आंदोलकांनी चेंबूर नाका येथे प्रत्येकी १५ मिनिटे ‘रास्ता रोको’ केला. यामुळे सायन पनवेल मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. उर्वरित दिवसभर या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू होती. दरम्यान, चेंबूर नाक्यावर आंदोलन करणारे आंदोलक चेंबूर परिसरातील प्रत्येक प्रमुख रस्त्यावर वाहतूक रोखूत होते़महिला व तरुणींचाही सहभागगोवंडी व चेंबूरमध्ये ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनांत महिला आणि तरुणींचा मोठा सहभाग होता. प्रामुख्याने गोवंडी येथील पूर्व द्रुतगती महामार्ग रोखण्यात महिला पुढे होत्या. महिला घोषणाबाजी करत पुलावर उतरल्या. रस्त्यावरील वाहतूक नियंत्रणात आणल्यानंतर महिला आंदोलक रस्त्यावर बसल्या. निळे झेंडे, निषेधात्मक फलक हाती घेऊन या महिला घोषणा देत होत्या, तर मुलींनी रस्त्यावरील वाहतूक रोखली होती. रस्त्यावर येणाºया प्रत्येक वाहनास तरुणींसह लहान मुलीही रोखत होत्या.मुख्यमंत्र्यांनी संयुक्त बैठक घ्यावीआंबेडकरी जनतेचा रोष पाहता, मुख्यमंत्र्यांनी राज्यातील वातावरण निवळण्यासाठी सर्व आंबेडकरी संघटनांची एक संयुक्त बैठक घेण्याची मागणी भीम क्रांती संघटनेने केली आहे. भीमा कोरेगाव येथील भ्याड हल्ल्यासंदर्भात नेमकी काय कारवाई करणार? यावर मुख्यमंत्र्यांनी संबंधित बैठकीत उजाळा टाकावा. जेणेकरून राज्यात शांतता प्रस्थापित होईल, असे मत संघटनेचे अध्यक्ष राजेश सोनवणे यांनी व्यक्त केले आहे.आठवले, पासवान यांनी राजीनामा द्यावा!केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि केंद्रीय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री रामविलास पासवान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (खरात)चे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंद