शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

आधीच 'वंचित', त्यात मुस्लीम नेत्यांच्या दुफळीने प्रणिती शिंदे अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 18:17 IST

गेल्यावेळी एकटी लढलेल्या एमआयएम सोबत आता प्रकाश आंबडेकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची ताकद असणार आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत सोलापूरमधून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुक लढवल्याने, मतांचे विभाजन झाले आणि काँग्रेसचे दिग्गज नेते सुशील कुमार शिंदे यांना पराभव स्वीकारावा लागला. त्याचप्रमाणे आता विधानसभा निवडणुकीत जर वंचितने स्वबळावर लढवण्याचे ठरवले तर, याची पुनरावृत्ती सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि विद्यामान आमदार असलेल्या प्रणीती शिंदे यांच्या मतदारसंघात होण्याची चर्चा पहायला मिळत आहे. एकीकडे 'वंचित'चे आव्हान तर दुसरीकडे पक्षातून मुस्लीम उमेदवाराला सोलापूर शहर (मध्य) मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी. यामुळे शिंदे कुटुंब दुहेरी संकटात सापडले आहे.

२०१४ मध्ये सोलापूर शहर (मध्य) विधानसभा मतदारसंघात प्रणीती शिंदे यांनी विजय मिळवला होता. त्यावेळी त्यांना ४६ हजार ९०७ मते मिळाली होती. मात्र याच मतदारसंघातून दुसऱ्या क्रमांकावर एमआयएमचे शेख तोफिक यांना मते मिळाली होती. तसेच गेल्यावेळी एकटी लढलेल्या एमआयएम सोबत आता प्रकाश आंबडेकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची ताकद असणार आहे. त्यामुळे प्रणीती यांच्यासमोर वंचितचे मोठे आव्हान असणार आहे.

त्यातच आता काँग्रेसचे माजी महापौर यू.एन.बेरिया आणि काँग्रेस मानवाधिकार सेलेचे सेलचे प्रदेश महासचिव ईशितयाक जागीरदार यांनी सोलापूर शहर (मध्य) मतदारसंघातून काँग्रेसकडून मुस्लीम उमेदवार देण्यात यावा अशी मागणी केली आहे. मुस्लीम समाजाचा हा हक्काचा मतदारसंघ असून, आजपर्यंत त्यांनी काँग्रेसलाच मतदान केले आहे. त्यामुळे यावेळी मुस्लीम उमेदवार द्यावा अशी मागणी जागीरदार यांनी केली आहे. तर  प्रणिती शिंदे यांची उमेदवारी दुहेरी संकटात सापडली असून, सुशीलकुमार यावर काय मार्ग काढणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

लोकसभा निवडणुकीत महाआघाडीत वंचित बहुजन आघाडी जाणार असल्याची चर्चा होती. मात्र पुढे जागावाटपाच्या कारणावरून वंचित आघाडीने स्वबळावर निवडणुका लढवल्या. सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात खुद्द प्रकाश आंबडेकर रिंगणात उतरले होते. त्यामुळे दलित-मुस्लीम मतांचे विभाजन झाले आणि शिंदे यांना पराभव स्वीकारावा लागला. आता याची पुनरावृत्ती प्रणीती यांच्या सोलापूर शहर (मध्य) मतदारसंघात होऊ शकते अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकरणात पहायला मिळत आहे.