शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
3
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
4
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
5
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
6
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
7
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
8
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
9
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
10
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
11
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
12
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
13
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
14
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
15
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
16
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
17
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
18
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
19
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान

प्रकाश मेहता, बडोले, सवरांसह सहा मंत्र्यांची झाली गच्छंती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 05:26 IST

गैरव्यवहार अन् निष्क्रियतेचे आरोप भोवले? : दिलीप कांबळे, प्रवीण पोटे, अंबरिशराजे आत्राम यांनाही डच्चू

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या फेरबदलात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गैरव्यवहार वा निष्क्रियतेचा आरोप होत असलेल्या सहा मंत्र्यांना घरचा रस्ता दाखविला, असे म्हटले जाते. त्यात मुंबईतील गृहनिर्माण योजनेत गैरव्यवहाराचा आरोप असलेले गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, लवकर निर्णय न घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले आणि ज्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांस पैशांच्या देवाणघेवाणीवरून मंत्रालयातच मारहाण करण्यात आली होती असे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले आणि निष्क्रियतेबद्दल सातत्याने टीकेचे धनी ठरलेले आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांचा समावेश आहे.मंत्रालयात न दिसणारे आणि खात्यात कधीही गांभीर्याने न वावरलेले गडचिरोली जिल्ह्यातील राज्यमंत्री अंबरिशराजे आत्राम गळाले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यात भाजपला जोरदार यश मिळाल्यानंतर आत्राम यांना राज्यमंत्रीपद देताना ते चांगले नेतृत्व म्हणून समोर येतील, अशी पक्षाची अपेक्षा होती पण ती फोल ठरली. लोकसभा निवडणुकीत आत्राम यांच्या विधानसभा मतदारसंघात (अहेरी) भाजपचे उमेदवार अशोक नेते पिछाडीवर राहिले. अन्य विधानसभा मतदारसंघांमध्ये ते आघाडीवर होते. ही बाबही आत्राम यांच्या गच्छंतीसाठी कारणीभूत ठरली.सार्वजनिक बांधकाम, उद्योग, पर्यावरण विभागाचे राज्यमंत्री प्रवीण पोटे हे तसे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जात होते. तरीही त्यांना वगळण्यात आले. अमरावती जिल्ह्यातील डॉ.अनिल बोंडे यांना कॅबिनेट मंत्री करताना पोटेंना डच्चू दिला गेला. राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढतीची अपेक्षा असताना त्यांचे आहे तेही पद गेले. सामाजिक न्यायचे कॅबिनेट मंत्री राजकुमार बडोले यांच्याशी त्यांचे कधीही पटले नाही. दोघांमधील वादाचा अनेकदा विभागाला फटका बसला. त्यातून दोघांनाही घरी बसावे लागले.मेहतांचा राजीनामा विलंबानेप्रकाश मेहता वगळता इतरांचे राजीनामे दोन दिवस आधीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले होते. मेहता यांनी मात्र सांगूनही आज सकाळपर्यंत राजीनामा पाठविला नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्री, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गोटात अस्वस्थता होती. आज सकाळी साडेनऊला त्यांनी राजीनामा पाठविला. ‘मीडिया ट्रायल’वर डच्चू मिळाल्याबद्दल ते नाराज असल्याचे म्हटले जाते.मुख्यमंत्र्यांकडून मात्र इन्कारमंत्र्यांना गैरव्यवहाराचे आरोप वा निष्क्रियतेमुळे वगळल्याचा स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना इन्कार केला. ते म्हणाले की, मेहतांशी संबंधित प्रकरणात लोकायुक्तांचा अहवाल आम्ही विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडणार आहोत. मेहतांवर ठपका वगैरे आहे म्हणून आता जे काही माध्यमांमधून म्हटले जात आहे त्या सगळ्यांची उत्तरे तुम्हाला मिळतील. आज ज्यांना वगळले त्यांना साडेचार वर्षे संधी दिली. इतरांनाही ती मिळावी म्हणून विभागीय, सामाजिक समीकरणे समोर ठेऊनही फेरबदल केले आहेत.मेहतांना ते प्रकरण भोवले?दक्षिण मुंबईत एमपी मिल कंपाउंड पुनर्विकासात एका बड्या विकासकाला इमारतीच्या पुनर्विकासाकरिता जादा सवलत दिल्याचा आरोप मेहता यांच्यावर आहे. या प्रकरणी लोकायुक्तांच्या चौकशी अहवालात मेहता यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याचे वृत्त असताना त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले.पंतप्रधान आवास योजनेतील अपयशही कारणीभूत ठरल्याचे म्हटले जाते.

टॅग्स :Prakash Mehtaप्रकाश मेहताRajkumar Badoleराजकुमार बडोलेvishnu savaraविष्णू सावरा