शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारमुळे अत्याचार करणाऱ्यांची हिंमत वाढतेय- प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 15:53 IST

जामनेर घटनेतील पीडितांच्या कुटुंबावर गुन्हा मागे घेण्यासाठी सातत्याने दबाव आणला जात आहे.

मुंबई: जामनेरमध्ये मातंग समाजाच्या दोन मुलांची नग्न धिंड काढल्याच्या घटनेवरून भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर टीका केली. सरकार अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई न करता केवळ समोरच्या घटनांकडे पाहत बसते. दबाव निर्माण झाला तरच सरकारकडून कारवाई केली जाते. त्यामुळे तुम्ही अत्याचार करा, तुम्हाला काही होणार नाही , असा संदेश समाजात जातोय. जामनेर घटनेतील पीडितांच्या कुटुंबावर गुन्हा मागे घेण्यासाठी सातत्याने दबाव आणला जात आहे. आम्ही त्यांची लवकरच भेट घेणार आहोत. जेणेकरून या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई व्हावी. तसेच या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात होणे, आवश्यक आहे. त्यामुळे जनतेत योग्य तो संदेश जाईल, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. तत्पूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्विटवरून या घटनेचा निषेध केला. महाराष्ट्रातील या दलित मुलांचा गुन्हा केवळ इतका आहे की, त्यांनी 'सवर्ण' समाजाच्या विहिरीत आंघोळ केली. RSS / भाजपाच्या मनुवादाच्या विषारी राजकारणाविरोधात जर आपण आवाज उठवला नाही तर इतिहास आपल्याला कधीच माफ करणार नाही, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले.  

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपा