शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

सरकारमुळे अत्याचार करणाऱ्यांची हिंमत वाढतेय- प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 15:53 IST

जामनेर घटनेतील पीडितांच्या कुटुंबावर गुन्हा मागे घेण्यासाठी सातत्याने दबाव आणला जात आहे.

मुंबई: जामनेरमध्ये मातंग समाजाच्या दोन मुलांची नग्न धिंड काढल्याच्या घटनेवरून भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर टीका केली. सरकार अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई न करता केवळ समोरच्या घटनांकडे पाहत बसते. दबाव निर्माण झाला तरच सरकारकडून कारवाई केली जाते. त्यामुळे तुम्ही अत्याचार करा, तुम्हाला काही होणार नाही , असा संदेश समाजात जातोय. जामनेर घटनेतील पीडितांच्या कुटुंबावर गुन्हा मागे घेण्यासाठी सातत्याने दबाव आणला जात आहे. आम्ही त्यांची लवकरच भेट घेणार आहोत. जेणेकरून या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई व्हावी. तसेच या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात होणे, आवश्यक आहे. त्यामुळे जनतेत योग्य तो संदेश जाईल, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. तत्पूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्विटवरून या घटनेचा निषेध केला. महाराष्ट्रातील या दलित मुलांचा गुन्हा केवळ इतका आहे की, त्यांनी 'सवर्ण' समाजाच्या विहिरीत आंघोळ केली. RSS / भाजपाच्या मनुवादाच्या विषारी राजकारणाविरोधात जर आपण आवाज उठवला नाही तर इतिहास आपल्याला कधीच माफ करणार नाही, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले.  

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपा