शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

“राष्ट्रवादी काँग्रेस राजकीयदृष्ट्या सर्वांत कमकुवत पक्ष, त्यांचे मोठे नेते भाजपच्या गळाला लागणार”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 18:27 IST

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंनी सतर्क राहावे. महाविकास आघाडीच्या नादी लागू नये, असा सल्लाही देण्यात आला आहे.

Maharashtra Politics: आताच्या घडीला राज्यात विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे नेते आणि सत्ताधारी भाजप-शिवसेना शिंदे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना दिसत आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस राजकीयदृष्ट्या सर्वांत कमकुवत पक्ष असल्याचे मोठे विधान करण्यात आले आहे. 

काही दिवसांपूर्वीच शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आंदोलन करून आक्रमक भूमिका घेतली. अखेर शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घेतला. या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने शक्तिप्रदर्शन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि पक्षाभोवती अनेक घडामोडी घडत असल्याचे दिसत असून, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठे विधान केले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते भाजपच्या गळाला लागणार असल्याचा दावा केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस राजकीयदृष्ट्या सर्वांत कमकुवत पक्ष

राष्ट्रवादीत जयंत पाटील यांच्याप्रमाणे अनेक जणांना जर अल्टिमेटम दिला की ‘आम्ही एकतर तुम्हाला अटक करू किंवा तुम्ही भाजपत या’, तर ते भाजपत जाण्यासाठी कधीही इच्छुक असतील. ते तुरुंगात जाण्यास इच्छुक नसतील. त्यामुळे सध्याच्या ईडीच्या राजकारणात इथला सगळ्यात कमकुवत राजकीय घटक कोणता असेल, तर तो राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यांचे अनेक नेते भाजपच्या गळाला लागणार आहे, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच महाविकास आघाडीच्या नादी लागू नका, असा सल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी दिल्याचे सांगितले जात आहे. 

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSharad Pawarशरद पवार