शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 05:50 IST

स्वप्नांच्या वाटेवर जिद्द असेल, तर यशाला कुणी थांबवू शकत नाही

लोकमत न्यूज नेटवर्क 

कोल्हापूर : ती जन्मायच्या आधीच वडिलांचे छत्र हरपलेले. त्यामुळे आईच्या कष्टाच्या सावलीतच ती वाढलेली. धुणीभांडी करून उदरनिर्वाह करणाऱ्या आईचा अचानक अपघात झाला अन् सर्व जबाबदारी तिच्यावर पडली. पण, ती डगमगली नाही. मेन राजाराम कॉलेजमध्ये कला शाखेत शिक्षण घेत ती उद्यमनगरातील एका पेट्रोलपंपावर दिवसभर काम करायची. याच संघर्षाला तिने बारावी परीक्षेत ७५ टक्के गुण मिळवत यशाची लख्ख झळाळी दिली. प्राची मनोहर लाखे असे या जिद्दी मुलीचे नाव.

  यादवनगरात राहणाऱ्या प्राचीची आई चार घरचं धुणीभांडी करून कसतरी संसाराचा गाडा चालवते. त्यात आईचा एक छोटासा अपघात झाल्याने प्राचीवर मोठी जबाबदारी पडली. तिने सकाळच्या प्रहरी काॅलेज व सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत पेट्रोलपंपावर काम करणे सुरू केले. विशेष म्हणजे तिने एकही दिवस कॉलेज चुकवले नाही. नित्यनेमाने ती काॅलेजला यायची. तिने ७५ टक्के गुण घेत कॉलेजमध्ये कला शाखेत प्रथम येण्याचा मान तिने पटकावला. निकालाच्या दिवशीही प्राची पेट्रोलपंपावरच काम करत होती. 

मुख्यमंत्र्यांचे वैभवीला पत्र

केज (जि. बीड) : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याच्या प्रकरणाने महाराष्ट्र ढवळून निघाला. असे असले, तरी पित्याच्या हत्येच्या डोंगराएवढ्या दुःखातही लेकीने बारावीची परीक्षा दिली. आता याचा निकाल लागला असून, वैभवी देशमुख हिने विज्ञान शाखेतून ८५.३३ टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे.   सरपंच देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी हत्या झाली. या प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. यामुळे देशमुख कुटुंबीयांवर  दुःखाचा डोंगर कोसळला. अशा कठीण परिस्थितीमध्येही वैभवीने बारावीची  परीक्षा दिली होती. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैभवीला अभिनंदनपर पत्र लिहिले. हे पत्र अंबेजोगाई एसडीओंनी वैभवीला  दिले. पत्रात म्हटले की, कठीण परिस्थितीत तू यश मिळवले. आज तुझे वडील असते तर त्यांना आनंद झाला असता!  तुझे कौतुक करावे तितके कमी आहे. तू अशीच प्रगती करत राहावीस,  आमच्या शुभेच्छा तुझ्यासोबत आहेत. 

माया ! शेतकरी मायबापानं पुण्यात पाठवलं,  लेकीनं मिळविले ९५ %

पुणे : ती मूळची धाराशिव जिल्ह्यातील विठ्ठलवाडी गावाची. आई- वडील दोन्ही शेतकरी, वडिलांना बारावीत ६७ टक्के गुण मिळाले होते. वडिलांना पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेण्याची इच्छा होती; पण घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही. मात्र, मुलगी माया माने हिने वडिलांचे हे स्वप्न पूर्ण करत फर्ग्युसन कॉलेजमध्ये बारावीत ९५ टक्के गुण मिळवले. वडिलांना जेव्हा बारावीचा निकाल फोनवर सांगितला, तेव्हा ते म्हणाले, खरंच! एवढे गुण मिळाले... आणि त्यानंतर वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहले. शैक्षणिक प्रवासासाठी पुण्यात आलेल्या मायाला दहावीत चांगले गुण मिळाले. त्यामुळे फर्ग्युसन महाविद्यालयात अकरावीत प्रवेश मिळाला. मायाचा प्रवास तसा खडतरच होता. आई- वडील विठ्ठलवाडी गावात शेती करतात. कोणताही खासगी क्लास नाही, फक्त पाठ्यपुस्तके, शिक्षकांचे मार्गदर्शन, महाविद्यालयात होणारी दररोजच्या लेक्चरला उपस्थितीआणि अभ्यास करून तिने हे घवघवीत यश मिळवले. वसतिगृहात राहूनशिक्षण घेणाऱ्या मायाने अभ्यासात सातत्य ठेवले. 

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाHSC Exam Resultबारावी निकाल