शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

राज्याच्या वीजपुरवठ्याची मदार खासगी क्षेत्रावर; ५५%पुरवठा खासगी क्षेत्राकडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 06:50 IST

महानिर्मितीने विविध औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्रांमध्ये क्षमता वाढीसाठी कृती आराखड्यास मान्यता दिली आहे.

मुंबई : भारनियमनाच्या चटक्यांमधून आठ वर्षांपूर्वीच मुक्ती मिळालेला महाराष्ट्र वीजपुरवठ्यात स्वयंपूर्ण असल्याचे दिसत असले तरी महानिर्मितीकडून होणाऱ्या वीजनिर्मितीत गेल्या तीन वर्षांत घट झाली आहे, तर खासगी क्षेत्राकडून होणाºया वीजपुरवठ्यात लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. खासगी क्षेत्राच्या विजेचा टक्का ५५ पेक्षाही जास्त झाला असून, महानिर्मितीची झेप ४१ टक्क्यांवरच थंडावली आहे. त्यामुळे वीजपुरवठ्याबाबत खासगी क्षेत्रावरील महाराष्ट्राची मदार वाढताना दिसत आहे.

महाराष्ट्रातील विजेचा दरडोई वापर १०८३ युनिट असून देशात ते प्रमाण ७८४ युनिट आहे. गेल्या तीन वर्षांत राज्यातील वीज वापराचे प्रमाण २५ टक्क्यांनी वाढले आहे. विजेची मागणी २०१६-१७ साली १६८८ मेगावॅट होती. ती आता २० हजार ३८९ मेगावॅटपर्यंत वाढली आहे.

महावितरण, बेस्टच्या वीज खरेदीचे प्रमाणही वाढू लागले आहे. या वीज खरेदीसाठी महावितरणने २०१७-१८ साली मासिक १९३ कोटी रुपये मोजले होते. यंदा ते प्रमाण २१२ कोटींवर पोहोचले आहे. राज्यात सर्वाधिक वीज ही उद्योगांसाठी (३४,४४८ दशलक्ष युनिट) वापरली जाते. त्याखालोखाल घरगुती वीज वापर (२३,३५३), कृषी (२०,९३०) वाणिज्य (११,०१३), सार्वजनिकसेवा (३८४९), रेल्वे (१३९) यांचा क्रमांक लागतो.महानिर्मितीचे क्षमता वाढीचे प्रयत्नमहानिर्मितीने विविध औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्रांमध्ये क्षमता वाढीसाठी कृती आराखड्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार भुसावळ येथे ६६० मेगावॅट आणि कोराडी येथे १३२० मेगावॅट वीजनिर्मितीस महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगानेही तत्त्वत: मंजुरी दिली असून, हे काम येत्या काही महिन्यांत सुरू होईल अशी अपेक्षा आहे.वितरण हानी घटलीगेल्या चार वर्षांतल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे महावितरणची वीजपुरवठ्यातील वितरण हानी १४.६८ टक्क्यांवरून १२.१७ टक्के इतकी कमी झाली आहे. मात्र, बेस्ट (४.३४), रिलायन्स (८.३६) आणि टाटा पॉवर (०.८९)च्या तुलनेत ती खूप जास्त आहे. राज्यातील ८६ टक्के वितरण व्यवस्थेचा भार महावितरणच्या खांद्यावर आहे. त्यामुळे ही वितरणहानी जास्त असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :electricityवीज