शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

वीजनिर्मिती संकटात, भारनियमन वाढणार : चार दिवस पुरेल एवढाच कोळसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 04:13 IST

महावितरणला वीजपुरवठा करणाºया राज्यातील १४ औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये चार-सहा दिवस पुरेल एवढाच कोळसा असल्याने वीजनिर्मिती कमालीची संकटात आली आहे. आधीच भारनियमनाचे चटके राज्याला बसत असताना वीजनिर्मितीला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

- यदु जोशी मुंबई : महावितरणला वीजपुरवठा करणा-या राज्यातील १४ औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये चार-सहा दिवस पुरेल एवढाच कोळसा असल्याने वीजनिर्मिती कमालीची संकटात आली आहे. आधीच भारनियमनाचे चटके राज्याला बसत असताना वीजनिर्मितीला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.वीज निर्मिती प्रकल्प आणि त्यांच्याकडे किती दिवसापुरता कोळसा साठा उपलब्ध आहे त्याची आकडेवारी अशी - अमरावती ६, भुसावळ ३, बुटीबोरी १, चंद्रपूर १०, डहाणू २, धारीवाल ०, जीएमआर वरोरा ५, खापरखेडा ८, कोराडी ४, मौदा ०, नाशिक ६, पारस ३, परळी ४, तिरोडा १. या प्रकल्पांमध्ये महानिर्मिती आणि खासगी अशा दोन्हींचे वीज प्रकल्प आहेत. येत्या दोन-चार दिवसांत कोळसा मिळाला नाही, तर वीजनिर्मितीत घट होणार असल्याने वीजभारनियमन वाढण्याची शक्यता आहे.वीजभारनियमनामुळे महाविरतण आणि महानिर्मितीमध्ये एकमेकांवर आरोप करणे सुरू झाले आहे. कोळसासाठ्याचे नियोजन महानिर्मितीने नीट केले नाही, असे महावितरणचे म्हणणे आहे; तर महावितरणने विजेच्या गरजेबाबत अद्ययावत आणि अचूक माहिती दिली नसल्याचे महानिर्मितीचे अधिकारी सांगत आहेत. कोळसा कंपन्यांकडून कोळशाचा पुरवठा जवळपास बंद झाला आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय ऊर्जा व कोळसा मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा करून तत्काळ कोळसा पाठविण्याची विनंती केली आहे. महावितरणने आज खुल्या बाजारातून ४०० मेगावॅट वीज विकत घेत भारनियमनावर मात करण्याचा प्रयत्न केला.भारनियमनामुळे कर्जमाफीचे आॅनलाइन फॉर्म अडचणीतराज्याच्या अनेक भागांत वीज भारनियमन होत असल्याने कर्जमाफीसाठी शेतकरी आॅनलाइन अर्ज भरू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. १५ सप्टेंबर ही सदर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे ही तारीख वाढविली नाही, तर अनेक शेतकरी अर्ज भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार