शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

धर्मसत्तेचा आधार असल्यास सत्ता भ्रष्ट होत नाही

By admin | Updated: November 2, 2015 03:01 IST

‘धर्मसत्तेचा आधार असलेली सत्ता कधीच भ्रष्ट होत नाही,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. तब्बल अडीच हजार वर्षांतील सर्वात कठीण तपस्या असलेले

मुंबई : ‘धर्मसत्तेचा आधार असलेली सत्ता कधीच भ्रष्ट होत नाही,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. तब्बल अडीच हजार वर्षांतील सर्वात कठीण तपस्या असलेले ‘गुणरत्न संवत्सर तप’ श्री हंसरत्न विजयजी महाराज यांनी पूर्ण केले. त्या निमित्त रविवारी आयोजित केलेल्या पारणा महोत्सवात मुख्यमंत्री बोलत होते.वांद्रे कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदानावर झालेल्या या महोत्सवासाठी हजारो जैन अनुयायी एकवटले होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ‘राजसत्ता ही धर्मसत्तेपेक्षा श्रेष्ठ नाही. राज्याच्या कारभारात नैतिकता राहण्यासाठी धर्मसत्ता असावी लागते, तरच राज्यकारभार पारदर्शी राहतो. भारतीय संस्कृती ही नैतिकतेवरच आधारलेली आहे.’‘श्रीहंसरत्न विजयजी महाराज यांच्या तपस्येमुळे अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा समाजाला फायदा होईल,’ असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.नाशिकच्या संघवी कुटुंबाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दिवंगत कांताबेन रसिकलाल संघवी यांच्या स्मरणार्थ राजेंद्र संघवी आणि विलास संघवी या बंधुंनी कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला. यावेळी संघवी कुटुंबातील काश्मीराबेन, शिल्पाबेन, विराज, करण आणि स्तुती यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, श्रीहंसरत्न विजयजी महाराज यांच्या दर्शनासाठी अनेक दिग्गजांनी गर्दी केली होती. त्यात न्यायमूर्ती, प्रशासकीय अधिकारी आणि अनेक उद्योगपतींचा समावेश होता. राज्याच्या विकासातजैन समाजाचा वाटाराज्याच्या विकासात जैन समाजाची मोठी भूमिका असल्याचे उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. ‘रोजगार निर्मितीमध्ये जैन समाजाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. व्यापार, उद्योग आणि रोजगारात या समाजाने मोलाचे योगदान दिले आहे. अन्य समाजाच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याची मानसिकता या समाजाकडे आहे. शिवाय शांती आणि अहिंसेच्या मार्गावर चालणाऱ्या या समाजाने नेहमीच जीवनाचे अंतिम सत्य दाखवले आहे,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.