शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
7
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
8
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
9
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
10
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
11
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
12
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
13
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
14
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
15
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
16
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
17
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
18
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
19
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
20
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

धर्मसत्तेचा आधार असल्यास सत्ता भ्रष्ट होत नाही

By admin | Updated: November 2, 2015 03:01 IST

‘धर्मसत्तेचा आधार असलेली सत्ता कधीच भ्रष्ट होत नाही,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. तब्बल अडीच हजार वर्षांतील सर्वात कठीण तपस्या असलेले

मुंबई : ‘धर्मसत्तेचा आधार असलेली सत्ता कधीच भ्रष्ट होत नाही,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. तब्बल अडीच हजार वर्षांतील सर्वात कठीण तपस्या असलेले ‘गुणरत्न संवत्सर तप’ श्री हंसरत्न विजयजी महाराज यांनी पूर्ण केले. त्या निमित्त रविवारी आयोजित केलेल्या पारणा महोत्सवात मुख्यमंत्री बोलत होते.वांद्रे कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदानावर झालेल्या या महोत्सवासाठी हजारो जैन अनुयायी एकवटले होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ‘राजसत्ता ही धर्मसत्तेपेक्षा श्रेष्ठ नाही. राज्याच्या कारभारात नैतिकता राहण्यासाठी धर्मसत्ता असावी लागते, तरच राज्यकारभार पारदर्शी राहतो. भारतीय संस्कृती ही नैतिकतेवरच आधारलेली आहे.’‘श्रीहंसरत्न विजयजी महाराज यांच्या तपस्येमुळे अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा समाजाला फायदा होईल,’ असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.नाशिकच्या संघवी कुटुंबाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दिवंगत कांताबेन रसिकलाल संघवी यांच्या स्मरणार्थ राजेंद्र संघवी आणि विलास संघवी या बंधुंनी कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला. यावेळी संघवी कुटुंबातील काश्मीराबेन, शिल्पाबेन, विराज, करण आणि स्तुती यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, श्रीहंसरत्न विजयजी महाराज यांच्या दर्शनासाठी अनेक दिग्गजांनी गर्दी केली होती. त्यात न्यायमूर्ती, प्रशासकीय अधिकारी आणि अनेक उद्योगपतींचा समावेश होता. राज्याच्या विकासातजैन समाजाचा वाटाराज्याच्या विकासात जैन समाजाची मोठी भूमिका असल्याचे उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. ‘रोजगार निर्मितीमध्ये जैन समाजाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. व्यापार, उद्योग आणि रोजगारात या समाजाने मोलाचे योगदान दिले आहे. अन्य समाजाच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याची मानसिकता या समाजाकडे आहे. शिवाय शांती आणि अहिंसेच्या मार्गावर चालणाऱ्या या समाजाने नेहमीच जीवनाचे अंतिम सत्य दाखवले आहे,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.