शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

खड्डे दुरुस्ती रखडलेलीच

By admin | Updated: November 4, 2016 00:46 IST

डागडुजी केलेले खड्डे उखडले जात असल्याने त्यांचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

पुणे : पावसाळा संपल्यानंतर खड्डे पडण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी पूर्वी तात्पुरती डागडुजी केलेले खड्डे उखडले जात असल्याने त्यांचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा संपल्यानंतर खड्ड्यांविषयीच्या तक्रारींबाबत प्रशासनाचे गांभीर्य कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. तात्पुरती डागडुजी केलेले रस्ते पूर्ववत चांगले करण्याच्या कामाला वेग देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.पावसाळ्यामध्ये शहरातील जुन्या रस्त्यांबरोबर नुकतेच केलेल्या रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर यंत्रणा राबविली गेली, खड्ड्यांची तक्रार आल्यानंतर ते २४ तासांच्या आत बुजविण्याची व्यवस्था उभारण्यात आली. खड्डे बुजविण्यासाठी मोबाइल व्हॅन सुरू करण्यात आल्या. मात्र पावसाळा संपताच खड्ड्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. खड्ड्यांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी मोबाइल अ‍ॅप, महापालिकेचे संकेतस्थळ यांसह ट्विटर, फेसबुकवरूनही तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पावसाळ्याच्या काळात महापालिकेकडे महिन्याला सरासरी १५० खड्ड्यांच्या तक्रारी येत होत्या. आॅक्टोबर महिन्यात तक्रारींचे हे प्रमाण ७० इतके होते. मात्र तक्रार केल्यानंतर पूर्वी ज्या वेगाने २४ तासांच्या आत खड्डे बुजविले जात होते, तितक्या वेगाने आता कार्यवाही होताना दिसून येत नाही. सध्या खड्ड्यांच्या २६ तक्रारी प्रलंबित आहेत. सातारा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते, पावसाळ्यात ते बुजविण्यात आले. मात्र, तात्पुरत्या डागडुजीनंतर ते पुन्हा उखडले गेले आहेत. स्वारगेट चौकामध्ये उड्डाणपुलाच्या बाजूला खड्डे बुजविण्यासाठी टाकलेले डांबर निघून गेल्याने पुन्हा खड्डे उघडे पडल्याचे दिसून येत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागांमधील पेठ परिसरामध्येही ठिकठिकाणी रस्ते उखडले गेले आहेत. उपनगरांमधील रस्त्यांची परिस्थिती आणखीनच वाईट आहे.(प्रतिनिधी)>खडडे बुजविण्यासाठी सध्या ४ मोबाइल व्हॅन कार्यान्वित असून येत्या २ महिन्यात आणखी ८ मोबाइल व्हॅन कार्यान्वित होणार आहे. सध्या खडयांच्या तक्रारी मात्र खुपच कमी झाल्या आहेत.- राजेंद्र राऊत, पथ विभाग प्रमुख >खड्डेमुक्त सेवावाहिनी टाकण्याचा प्रस्ताव प्रलंबितशहरामध्ये मोबाइल, गॅस कंपन्या, महावितरण यांच्याकडून सेवावाहिनी टाकण्यासाठी केल्या जात असलेल्या खोदाईमुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडून रस्त्यांची दुरवस्था होते. या पार्श्वभूमीवर खड्डेमुक्त सेवावाहिनी टाकण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर मांडला आहे. मात्र, स्थायी समितीकडून दोन महिने उलटले तरी त्याला अद्याप मान्यता देण्यात आलेली नाही. शहरात पुढील वर्षभरात मोठ्या प्रमाणात खोदाई करण्याचे कंपन्यांचे नियोजन आहे, त्यामुळे पुन्हा आणखी खड्ड्यांचा करावा लागणार आहे.>मणक्याच्या आजाराला आमंत्रणखड्ड्यांमुळे नागरिकांना पाठीच्या तसेच मणक्याच्या आजारांना सामोरे जावे लागत आहेत. सकाळी व संध्याकाळच्या वेळी वाहतूककोंडीबरोबर खड्डे चुकविण्याचीही मोठी कसरत नागरिकांना करावी लागत आहे. त्यामुळे तात्पुरत्या डागडुजी केलेल्या खड्ड्यांची योग्यप्रकारे दुरुस्ती केली जावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.