शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
2
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
3
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
4
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
5
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
6
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
7
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
8
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
9
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
10
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
11
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
12
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
14
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
15
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
16
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
17
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
18
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
19
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
20
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."

पोस्टमन झाले ‘स्मार्ट’

By admin | Updated: June 11, 2016 02:21 IST

ई-कॉमर्स क्षेत्राचा वाढता विस्तार पाहता टपाल विभागानेही कात टाकून ‘स्मार्ट’ मार्ग अवलंबिला आहे

मुंबई : ई-कॉमर्स क्षेत्राचा वाढता विस्तार पाहता टपाल विभागानेही कात टाकून ‘स्मार्ट’ मार्ग अवलंबिला आहे. टपाल विभागाने व्यवहार सुलभतेसाठी पोस्टमनच्या हाती अ‍ॅण्ड्रॉइड अ‍ॅप दिले आहे. जेणेकरून, स्पीड पोस्ट, रजिस्टर पत्र, टपाल आदींच्या वितरणाची योग्य वेळेवर खातरजमा व्हावी यासाठी पोस्टमन्सना हे अ‍ॅप उपयुक्त ठरणार आहे.टपाल विभागाच्या महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल ए.के. दास यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भांडुप येथेही या मोबाइल अ‍ॅपचे आज उद्घाटन करण्यात आले. तसेच नुकतेच या अ‍ॅपचे अनावरण केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते छिंदवाडा येथेही करण्यात आले आहे. सध्या ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. भांडुप पूर्व येथील टपाल विभागात कार्यरत असणाऱ्या १८ पोस्टमनना स्मार्ट फोन देण्यात आले आहेत. ज्यामध्ये पोस्टमन अ‍ॅपचा समावेश करण्यात आलेला आहे. टपाल वस्तू प्राप्त करणे, ई-हस्ताक्षर घेणे, त्याच ठिकाणी सेंट्रल सर्व्हरमध्ये संबंधित माहिती अपलोड करणे आदी या अ‍ॅप्लिकेशनची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. मुंबईतील सर्व १७ व्यवसाय टपाल केंदे्र आणि ३५ विपणन कार्यकारी यांना उपमहाव्यवस्थापक यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत एकत्र आणून एक प्रभावी व्यवसाय विकास मंडळ सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. देशातील आर्थिक समावेशकतेला प्रोत्साहन देण्यासाठी टपाल विभागाच्या अंतर्गत इंडिया पोस्ट पेमेंट बँक सुरू करायला मंत्रिमंडळाने १ जून २०१६ रोजी मंजुरी दिली आहे. त्यानुसार शुक्रवारी ‘माय गव्ह’ वेबसाइटवर लोगो डिझाइन आणि घोषवाक्य स्पर्धा सुरू करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>यांत्रिक पार्सल प्रक्रिया केंद्राची स्थापनाई-कॉमर्स ग्राहकांच्या गरजा लक्षात घेता परळ येथे एक समर्पित यांत्रिक पार्सल प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात आले आहे, असेही दास म्हणाले. १२ हजार चौरस फुटांवर विस्तारलेल्या या केंद्राची दररोज ३० हजार पार्सल इतकी क्षमता आहे. याशिवाय महाराष्ट्र टपाल विभागाने ऐरोली येथे ४ हजार चौरस मीटर क्षेत्रावर ई-कॉमर्स पार्सल प्रक्रिया केंद्र विकसित करण्याचा संकल्प केला आहे. तसेच ग्राहकांची गरज लक्षात घेऊन विभागाकडून ई-कॉमर्स, स्पीड पोस्ट, लॉजिस्टिक पोस्ट, रिटेल पोस्ट, मीडिया पोस्ट, बिझनेस पोस्ट, बिल मेल सेवा, एक्स्प्रेस पार्सल पोस्ट आणि डायरेक्ट पोस्ट आदी सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. महसुलात वाढव्यवसाय विकास, टपाल आणि बचत बँक या माध्यमातून सरकारला २०१५-१६ मध्ये एकूण १६७५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. या महसुलात गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. महाराष्ट्र टपाल विभागाचा एकूण टपाल कार्यान्वयन महसूल ९५३ कोटी रुपये इतका आहे, असे दास यांनी या वेळी सांगितले.