शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

पोस्टमन झाले ‘स्मार्ट’

By admin | Updated: June 11, 2016 02:21 IST

ई-कॉमर्स क्षेत्राचा वाढता विस्तार पाहता टपाल विभागानेही कात टाकून ‘स्मार्ट’ मार्ग अवलंबिला आहे

मुंबई : ई-कॉमर्स क्षेत्राचा वाढता विस्तार पाहता टपाल विभागानेही कात टाकून ‘स्मार्ट’ मार्ग अवलंबिला आहे. टपाल विभागाने व्यवहार सुलभतेसाठी पोस्टमनच्या हाती अ‍ॅण्ड्रॉइड अ‍ॅप दिले आहे. जेणेकरून, स्पीड पोस्ट, रजिस्टर पत्र, टपाल आदींच्या वितरणाची योग्य वेळेवर खातरजमा व्हावी यासाठी पोस्टमन्सना हे अ‍ॅप उपयुक्त ठरणार आहे.टपाल विभागाच्या महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल ए.के. दास यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भांडुप येथेही या मोबाइल अ‍ॅपचे आज उद्घाटन करण्यात आले. तसेच नुकतेच या अ‍ॅपचे अनावरण केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते छिंदवाडा येथेही करण्यात आले आहे. सध्या ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. भांडुप पूर्व येथील टपाल विभागात कार्यरत असणाऱ्या १८ पोस्टमनना स्मार्ट फोन देण्यात आले आहेत. ज्यामध्ये पोस्टमन अ‍ॅपचा समावेश करण्यात आलेला आहे. टपाल वस्तू प्राप्त करणे, ई-हस्ताक्षर घेणे, त्याच ठिकाणी सेंट्रल सर्व्हरमध्ये संबंधित माहिती अपलोड करणे आदी या अ‍ॅप्लिकेशनची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. मुंबईतील सर्व १७ व्यवसाय टपाल केंदे्र आणि ३५ विपणन कार्यकारी यांना उपमहाव्यवस्थापक यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत एकत्र आणून एक प्रभावी व्यवसाय विकास मंडळ सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. देशातील आर्थिक समावेशकतेला प्रोत्साहन देण्यासाठी टपाल विभागाच्या अंतर्गत इंडिया पोस्ट पेमेंट बँक सुरू करायला मंत्रिमंडळाने १ जून २०१६ रोजी मंजुरी दिली आहे. त्यानुसार शुक्रवारी ‘माय गव्ह’ वेबसाइटवर लोगो डिझाइन आणि घोषवाक्य स्पर्धा सुरू करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>यांत्रिक पार्सल प्रक्रिया केंद्राची स्थापनाई-कॉमर्स ग्राहकांच्या गरजा लक्षात घेता परळ येथे एक समर्पित यांत्रिक पार्सल प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात आले आहे, असेही दास म्हणाले. १२ हजार चौरस फुटांवर विस्तारलेल्या या केंद्राची दररोज ३० हजार पार्सल इतकी क्षमता आहे. याशिवाय महाराष्ट्र टपाल विभागाने ऐरोली येथे ४ हजार चौरस मीटर क्षेत्रावर ई-कॉमर्स पार्सल प्रक्रिया केंद्र विकसित करण्याचा संकल्प केला आहे. तसेच ग्राहकांची गरज लक्षात घेऊन विभागाकडून ई-कॉमर्स, स्पीड पोस्ट, लॉजिस्टिक पोस्ट, रिटेल पोस्ट, मीडिया पोस्ट, बिझनेस पोस्ट, बिल मेल सेवा, एक्स्प्रेस पार्सल पोस्ट आणि डायरेक्ट पोस्ट आदी सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. महसुलात वाढव्यवसाय विकास, टपाल आणि बचत बँक या माध्यमातून सरकारला २०१५-१६ मध्ये एकूण १६७५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. या महसुलात गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. महाराष्ट्र टपाल विभागाचा एकूण टपाल कार्यान्वयन महसूल ९५३ कोटी रुपये इतका आहे, असे दास यांनी या वेळी सांगितले.