शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

पोस्टमास्तरचे नातेवाईकच चालवताहेत पोस्ट कार्यालय

By admin | Updated: February 13, 2015 00:57 IST

आर. के. नगर कार्यालयात पोरखेळ : कामाचा निपटारा वेळेवर नसल्याने नागरिक हवालदिल

घन:शाम कुंभार - यड्राव -टपाल कार्यालयाचा दैनंदिन कारभार मुलगी, पुतण्या व इतर नातेवाइकांच्या आधारे बेकायदेशीरपणे सांभाळला जात आहे. आर. के. नगर - यड्राव टपाल कार्यालयाचे पोस्टमास्तर बी. एस. बत्ते यांनी केंद्र शासनाची नोकरी पोरखेळ बनविली आहे. यामुळे कार्यालयातून होणारे टपालासह इतर कार्यक्रम विस्कळीत झाले आहेत. याचा तोटा व नाहक त्रास सहन करण्याची वेळ ग्राहक व एजंटांवर आली आहे. याची दखल वरिष्ठांकडून कशी घेतली जाते, यावरच येथील टपाल कार्यालयाचे नियोजन अवलंबून आहे.इचलकरंजी टपाल कार्यालयाकडून आर. के. नगर टपाल कार्यालयास शहापूर, तारदाळ, शिरढोण, टाकवडे, आर. के. नगर व जांभळी या गावांचे बटवड्याचे टपाल येतात. आर. के. नगर टपाल कार्यालयातून टपाल व त्या संबंधीच्या कामाची विभागणी येथे होते. टपाल कार्यालयात वीज बिल, फोन बिल, आर.डी. भरून घेण्याची सोय आहे. याकरिता तारदाळ व आर. के. नगरमधून काही महिला एजंट म्हणून कार्यरत आहेत. आर. के. नगर कार्यालयातून पोस्टमास्तरांच्या मनमानीमुळे सर्वच गावांचा बटवडा विस्कळीत झाला आहे. आर.डी. भरण्यासाठी लाईट बिल व फोन बिल यासाठी पैसे द्या, नंतर बिल पासबुक घेऊन जा, अशी कामाची पद्धत सुरू झाल्याने एजंट व ग्राहक त्रस्त आहेत.पोस्टातून येणारी पत्रे वेळेवर संबंधितांना पोहोचत नसल्याने त्यांना आर्थिक, मानसिक त्रास होत आहे. कारण शासकीय, नोकरीचे अनुदान व महत्त्वाचे टपाल पोस्टाद्वारे येतात. ती वेळेवर न मिळाल्यास ग्राहकांचे सर्वांगीण नुकसान होत आहे. काही ग्राहकांचे खाती बंद करण्याचे अर्ज चार महिन्यांपासून तसेच पडून आहेत. यड्राव परिसरात वाहनांची विक्री करणारी दोन-तीन केंदे्र आहेत. त्यांच्याकडून येणारी कागदपत्रे तशीच धूळ खात पडली आहेत. या सर्व प्रकाराने नागरिक हवालदिल झाले आहेत.पोस्टमास्तर बत्ते हे पोस्ट कार्यालयाचा संगणकाद्वारे व्यवहार करण्यासाठी मुलगी, पुतण्या व इतर नातेवाइकांना बेकायदेशीरपणे वापरास देत आहेत. कोणीही अर्ज घेऊन आले की, साहेब येऊ देत. नंतर या, असे उत्तर त्यांच्याकडून मिळत आहे. केंद्र शासनाचे अत्यंत महत्त्वाचे व जबाबदारीचे पोस्टमास्तर पद असून, बेकायदेशीर वापर करून पोस्टमास्तर पोरखेळ करीत आहेत. या मुलांकडून एखादी चूक झाल्यास, अजाणतेपणी महत्त्वाची टपाल गहाळ झाल्यास ग्राहकांचे मोठे नुकसान होऊ शकते. इतकी बेफिकिरी केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांकडून होत आहे. याकडे वरिष्ठांकडून कशी दखल घेतली जाते, यावर येथील टपाल कार्यालयाचे नियोजन अवलंबून आहे. तसेच पोरखेळ थांबवावा, ग्राहकांना सुलभ सेवा मिळावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.दोषी आढळल्यास कारवाईपोस्ट कार्यालयामध्ये विभागाच्या कर्मचाऱ्याव्यतिरिक्त कोणासही काम करता येत नाही. तसा कोणी प्रकार सुरू केला असेल, तर तो बेकायदेशीर आहे. त्याची चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे कोल्हापूर विभागाचे सीनिअर सुपरिटेंडेंट पोस्ट आॅफिसर रमेश पाटील यांनी सांगितले.