शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

Raju Shetti: स्वाभिमानी संघटना मोठा निर्णय घेण्याची शक्यता! राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 13:00 IST

Raju Shetti: विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या यादीत आमदार व्हायचे की नाही, याचाही निर्णय होणार असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई: महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) बेबनाव वारंवार समोर येत आहे. एकीकडे विरोधी पक्ष सातत्याने निशाणा साधत असताना महाविकास आघाडीतील घटक पक्षातील कुरबुरही वाढताना दिसत आहे. यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी महाविकास आघाडीवर निशाणा साधताना दिसत आहेत. शेतकरी प्रश्नांवर आक्रमक झालेले राजू शेट्टी (Raju Shetti) आता महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. 

राज्यातील शेतकरी बांधवांच्या प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. त्यामुळे राजू शेट्टी महविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ५ एप्रिल रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत अंतिम निर्णय घेण्याचे सूतोवाच देण्यात आले आहेत. दरम्यान, विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या यादीत आमदार व्हायचे की नाही, याचाही निर्णय याच बैठकीत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

स्वाभिमानीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता

शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, खासगी कंपन्यांकडून सरकार वीज खरेदी करत नाही. दिवसा वीज द्यावी ही पक्षाची मागणी असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. महाविकास आघाडीला पाठींबा द्यायचा की नाही याबाबतचा निर्णय ५ एप्रिल रोजी घेणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली. स्वाभिमानी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्य बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. राज्यात भविष्यात आघाडीचे राजकारण करायचे की नाही, याचादेखील गंभीर विचार या बैठकीत करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. एबीपी माझाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

दरम्यान, अलीकडेच दिल्लीत देशातील सर्वच शेतकरी संघटना बैठक झाली. शेतकऱ्यांना हमी भाव देणारा कायदा करुन घेण्यासाठी आता पुढचा लढा असल्याचे राजू शेट्टींनी सांगितले. हरभरा हमी भावपेक्षा कमी दरानं खरेदी केला जात आहे. ऊस तोडणी मजूर पेटवून ऊस तोडत आहेत. हे बरोबर नाही. हमी भावाच्या संदर्भात ०१ मे रोजी गावसभेत ठराव घेणार असल्याचे ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमध्ये जाण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्णय सामुदायिक होता. अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारला समीक्षा करण्याची वेळ आली आहे. ज्या उद्देशाने किमान समान कार्यक्रमावर महाविकास आघाडी तयार झाली, त्याचे काय झाले? अनेक मुद्दे खटकणारे आहेत. नवीन धोरण राबवताना संवादही साधला नाही, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीRaju Shettyराजू शेट्टी