शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

Raju Shetti: स्वाभिमानी संघटना मोठा निर्णय घेण्याची शक्यता! राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 13:00 IST

Raju Shetti: विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या यादीत आमदार व्हायचे की नाही, याचाही निर्णय होणार असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई: महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) बेबनाव वारंवार समोर येत आहे. एकीकडे विरोधी पक्ष सातत्याने निशाणा साधत असताना महाविकास आघाडीतील घटक पक्षातील कुरबुरही वाढताना दिसत आहे. यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी महाविकास आघाडीवर निशाणा साधताना दिसत आहेत. शेतकरी प्रश्नांवर आक्रमक झालेले राजू शेट्टी (Raju Shetti) आता महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. 

राज्यातील शेतकरी बांधवांच्या प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. त्यामुळे राजू शेट्टी महविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ५ एप्रिल रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत अंतिम निर्णय घेण्याचे सूतोवाच देण्यात आले आहेत. दरम्यान, विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या यादीत आमदार व्हायचे की नाही, याचाही निर्णय याच बैठकीत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

स्वाभिमानीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता

शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, खासगी कंपन्यांकडून सरकार वीज खरेदी करत नाही. दिवसा वीज द्यावी ही पक्षाची मागणी असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. महाविकास आघाडीला पाठींबा द्यायचा की नाही याबाबतचा निर्णय ५ एप्रिल रोजी घेणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली. स्वाभिमानी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्य बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. राज्यात भविष्यात आघाडीचे राजकारण करायचे की नाही, याचादेखील गंभीर विचार या बैठकीत करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. एबीपी माझाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

दरम्यान, अलीकडेच दिल्लीत देशातील सर्वच शेतकरी संघटना बैठक झाली. शेतकऱ्यांना हमी भाव देणारा कायदा करुन घेण्यासाठी आता पुढचा लढा असल्याचे राजू शेट्टींनी सांगितले. हरभरा हमी भावपेक्षा कमी दरानं खरेदी केला जात आहे. ऊस तोडणी मजूर पेटवून ऊस तोडत आहेत. हे बरोबर नाही. हमी भावाच्या संदर्भात ०१ मे रोजी गावसभेत ठराव घेणार असल्याचे ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमध्ये जाण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्णय सामुदायिक होता. अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारला समीक्षा करण्याची वेळ आली आहे. ज्या उद्देशाने किमान समान कार्यक्रमावर महाविकास आघाडी तयार झाली, त्याचे काय झाले? अनेक मुद्दे खटकणारे आहेत. नवीन धोरण राबवताना संवादही साधला नाही, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीRaju Shettyराजू शेट्टी