शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

राज्यात प्रदूषणकारी रासायनिक खतांवर लवकरच येणार बंदी- रामदास कदम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 05:26 IST

प्लॅस्टिकबंदीपाठोपाठ आणखी एक निर्णय

दापोली : प्रदूषणकारी रासायनिक खतांवर लवकरच बंदी घालण्यात येणार असून प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर हा एक धाडसी निर्णय असेल, असे सूतोवाच पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केले. पर्यावरण विभागामार्फत राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत उंबरशेत येथील तळ्याचे नुतनीकरण व सुशोभीकरणाचे भूमिपूजन कदम यांच्या हस्ते झाले.ते म्हणाले की, रासायनिक खते ही विषासमान आहेत. खतांच्या अतिमात्रेने कर्करोगासारख्या दुर्धर व्याधी जडतात. माणसाचे आयुष्यही १५ ते २० वर्षांनी कमी होते, असे तज्ज्ञांचे मत आहे. याचा विचार करून रासायनिक खतांचा वापर बंद करण्याबाबत विचार सुरू आहे.राज्यात २२७ नगरपालिका आणि २७ महानगरपालिका आहेत. त्यांच्या हद्दीत जमा होणाऱ्या कचºयावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत तयार करण्यात येणार आहे. तसेच गायी, म्हशी, गोठ्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून शेतकºयांकडून शेण विकत घेऊन त्या माध्यमातूनही सेंद्रिय खत तयार करण्यात येईल. हे खत शेतकºयांना ५० टक्के सवलतीत देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.कोकणावर सातत्याने काँग्रेस व राष्ट्रवादीने अन्याय केला. पश्चिम महाराष्ट्रात १९ टक्के सिंचन क्षमता असून कोकणामध्ये ती केवळ एक टक्का आहे. मुख्यमंत्र्यांनी विदर्भातील सिंचनासाठी एक हजार कोटींच्या निधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणला. त्यावेळी कोकणावर अन्याय होऊ देणार नाही असे सांगत आपण रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ४५० कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला, असे ते म्हणाले.जमिनीचे आरोग्य महत्त्वाचेजमिनीची सुपिकता कायम राखण्यासाठी रासायनिक खते व विषारी कीटकनाशकांचा अति वापर टाळण्याची गरज आहे. रासायनिक खतांचा अतिरेक टाळून पारंपरिक भारतीय पद्धतीने शेती करण्याची गरज कृषितज्ज्ञ सातत्याने व्यक्त करत आहेत.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमFarmerशेतकरीagricultureशेती