शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Raj Thackeray: राज्यात राजकारणाचा चिखल झालाय; राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 10:18 IST

मनसेच्या वतीने आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज यांची पनवेल येथील फडके नाट्यगृहात प्रकट मुलाखत झाली. 

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. कोण नेमका कोणत्या पक्षात आहे, हेच कळत नाही. महाराष्ट्रातील राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर कधीच गेले नसल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. मनसेच्या वतीने आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज यांची पनवेल येथील फडके नाट्यगृहात प्रकट मुलाखत झाली. 

पत्रकार अमोल परचुरे यांनी राज यांची मुलाखत घेत त्यांना बोलते केले. ‘ठाकरे नेमके काय वाचतात?’ हा मुलाखतीचा विषय होता. ‘मी चेहरे वाचतो’ हे उत्तर देताच नाट्यगृहात चांगलाच हशा पिकला. महाराष्ट्रातील जनतेने महाराष्ट्रासाठी झटलेल्या लोकांचे योगदान समजून घेणे गरजेचे आहे, तसेच दादा कोंडके यांच्यावरचे ‘एकटा जीव’ हे पुस्तक आवडीचे असल्याचे राज  म्हणाले. 

वाचनाचे संस्कार करावे लागत नाहीत, ते होत असतात. यासाठी वाचनही आत्मसात करणे गरजेचे आहे. नियतकालिके बंद पडत आहेत. याकरिता मराठी वाचकांनी वाचन संस्कृती जोपासण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याच्या घडीला पुतळे केवळ जयंती आणि पुण्यतिथीला धुतले जातात. त्यामुळे केवळ स्मारक उभारून होणार नसल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्रातील राजकारणाबाबत  गुढीपाडव्याला सभेमध्ये बोलणार असे म्हणाले.

आमचं काय जळतं ते तुम्हाला कळेल...काही दिवसांपूर्वी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह अशा दोन्ही गोष्टी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. त्यानंतर, मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील कधीही मनसे या पक्षावर आणि चिन्हावर दावा सांगू शकतात, असे ‘मिम्स’ व्हायरल झाले होते. यावरही राज ठाकरेंनी रोखठोक मत मांडले. मला आमच्या राजू पाटील यांना विचारायचं आहे की, तुम्ही पक्षाची जबाबदारी घेता का? एकदा हातात घेऊन बघा, मग आमचं काय जळतं, ते कळेल तुम्हाला... आम्ही दिवसरात्र बरनॉल लावत असतो.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे