शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

ओल्या दुष्काळात 'कोरडे' आश्वासन; राजकीय नेत्यांचे नुसतेच दौरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 14:18 IST

अडचणीत आलेले शेतकरी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहे.

मुंबई :राजकीय पक्षात सूर असलेल्या सत्तासंघर्षामुळे राज्यात निर्माण झालेल्या ओल्या दुष्काळाकडे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप होत आहे. राज्यभर मंत्र्यांचे,नेत्यांचे दौरे सूर असले तरीही प्रत्यक्ष मदत अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहचली नाही. अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेले शेतकरी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. राज्यभर मंत्र्यांचे,नेत्यांचे दौरे सूर असले तरीही प्रत्यक्ष मदत अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहचली नाही.

राज्यात परतीच्या पावसाने हाहा:कार माजवला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकाचं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे सरकारच स्थापन न झाल्याने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर मदत मिळत नसल्याने अडचणीत आलेले शेतकरी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील एकट्या सिल्लोड तालुक्यात ओल्या दुष्काळामुळे चार शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे.

अवकाळी पावसाने नुकसान झाले म्हणून गेल्या दोन दिवसात खानदेशात 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर औरंगाबादमधील 35 वर्षीय गजानन जोशी यांनी अतिवृष्टी आणि पिंकाचे अतोनात नुकसान झाल्याने हाताश होऊन खेळणा नदीत उडी घेऊन जीवन यात्रा संपवली.कर्ज कसे फेडावे व रब्बीच्या पेरणीसाठी पैसे कुठून आणावे याची चिंता त्यांना होती. त्यामुळे त्यांनी नैराश्यातून आपली जीवन यात्रा संपवली,असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्यातील मंत्री,आमदार,खासदार दौरे करत आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अजूनही कोणतेही मदत जाहीर झालेली नाही. खिशातील आहे ते पैसे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी आधीच खर्च केली आहेत. त्यामुळे आता सरकारच्या मदतीची अपेक्षा शेतकऱ्याला लागली आहे.