शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

ओल्या दुष्काळात 'कोरडे' आश्वासन; राजकीय नेत्यांचे नुसतेच दौरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 14:18 IST

अडचणीत आलेले शेतकरी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहे.

मुंबई :राजकीय पक्षात सूर असलेल्या सत्तासंघर्षामुळे राज्यात निर्माण झालेल्या ओल्या दुष्काळाकडे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप होत आहे. राज्यभर मंत्र्यांचे,नेत्यांचे दौरे सूर असले तरीही प्रत्यक्ष मदत अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहचली नाही. अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेले शेतकरी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. राज्यभर मंत्र्यांचे,नेत्यांचे दौरे सूर असले तरीही प्रत्यक्ष मदत अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहचली नाही.

राज्यात परतीच्या पावसाने हाहा:कार माजवला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकाचं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे सरकारच स्थापन न झाल्याने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर मदत मिळत नसल्याने अडचणीत आलेले शेतकरी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील एकट्या सिल्लोड तालुक्यात ओल्या दुष्काळामुळे चार शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे.

अवकाळी पावसाने नुकसान झाले म्हणून गेल्या दोन दिवसात खानदेशात 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर औरंगाबादमधील 35 वर्षीय गजानन जोशी यांनी अतिवृष्टी आणि पिंकाचे अतोनात नुकसान झाल्याने हाताश होऊन खेळणा नदीत उडी घेऊन जीवन यात्रा संपवली.कर्ज कसे फेडावे व रब्बीच्या पेरणीसाठी पैसे कुठून आणावे याची चिंता त्यांना होती. त्यामुळे त्यांनी नैराश्यातून आपली जीवन यात्रा संपवली,असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्यातील मंत्री,आमदार,खासदार दौरे करत आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अजूनही कोणतेही मदत जाहीर झालेली नाही. खिशातील आहे ते पैसे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी आधीच खर्च केली आहेत. त्यामुळे आता सरकारच्या मदतीची अपेक्षा शेतकऱ्याला लागली आहे.