शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

ओल्या दुष्काळात 'कोरडे' आश्वासन; राजकीय नेत्यांचे नुसतेच दौरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 14:18 IST

अडचणीत आलेले शेतकरी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहे.

मुंबई :राजकीय पक्षात सूर असलेल्या सत्तासंघर्षामुळे राज्यात निर्माण झालेल्या ओल्या दुष्काळाकडे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप होत आहे. राज्यभर मंत्र्यांचे,नेत्यांचे दौरे सूर असले तरीही प्रत्यक्ष मदत अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहचली नाही. अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेले शेतकरी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. राज्यभर मंत्र्यांचे,नेत्यांचे दौरे सूर असले तरीही प्रत्यक्ष मदत अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहचली नाही.

राज्यात परतीच्या पावसाने हाहा:कार माजवला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकाचं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे सरकारच स्थापन न झाल्याने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर मदत मिळत नसल्याने अडचणीत आलेले शेतकरी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील एकट्या सिल्लोड तालुक्यात ओल्या दुष्काळामुळे चार शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे.

अवकाळी पावसाने नुकसान झाले म्हणून गेल्या दोन दिवसात खानदेशात 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर औरंगाबादमधील 35 वर्षीय गजानन जोशी यांनी अतिवृष्टी आणि पिंकाचे अतोनात नुकसान झाल्याने हाताश होऊन खेळणा नदीत उडी घेऊन जीवन यात्रा संपवली.कर्ज कसे फेडावे व रब्बीच्या पेरणीसाठी पैसे कुठून आणावे याची चिंता त्यांना होती. त्यामुळे त्यांनी नैराश्यातून आपली जीवन यात्रा संपवली,असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्यातील मंत्री,आमदार,खासदार दौरे करत आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अजूनही कोणतेही मदत जाहीर झालेली नाही. खिशातील आहे ते पैसे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी आधीच खर्च केली आहेत. त्यामुळे आता सरकारच्या मदतीची अपेक्षा शेतकऱ्याला लागली आहे.