शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अकाली निधनाने संपली अनेकांची राजकीय कारकीर्द

By admin | Updated: June 4, 2014 00:36 IST

गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली अपघाती निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली़

फराज अहमद/नवी दिल्ली : गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली अपघाती निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली़ मुंडेंप्रमाणेच असेच अनेक नेते ऐन उमेदीत गेले़ अपघाती वा अनैसर्गिक मृत्युने अशाच अनेक दिग्गजांची राजकीय कारकीर्द संपली़ मुंडेंचे मेहुणे प्रमोद महाजन यांचाही राजकीय शिखरावर तळपत असताना असाच अकाली मृत्यू झाला़ प्रवीण महाजन या लहान भावानेच प्रमोद महाजन यांची गोळ्या घालून हत्या केली़ प्रमोद महाजन हे त्यावेळी अटलबिहारी वाजपेयीनंतरचे भाजपातील एक वरिष्ठ नेते होते़ भाजपात अत्युच्च स्थानी पोहोचण्याएवढी प्रतिभा त्यांच्यात होती़महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे १४ ऑगस्ट २०१२ रोजी निधन झाले. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे निधन हाही भारताच्या राजकारणात सर्वाधिक मोठी पोकळी निर्माण करणारा धक्का होता़ उण्यापुर्‍या ४६ व्या वर्षी तामिळनाडूतील श्रीपेरम्बुदूर येथील निवडणूक रॅलीदरम्यान श्रीलंकन तामीळ अतिरेक्यांच्या मानवी बॉम्बहल्ल्यात राजीव गांधी मृत्युमुखी पडले होते़ काँग्रेस पक्षातील एकेकाळचे पंतप्रधानपदाचे दावेदार मानले जाणारे राजेश पायलट यांचा ११ जून २००० रोजी एका सडक दुर्घटनेत मृत्यू झाला़ दौसा या आपल्या संसदीय मतदारसंघातून दिल्लीला येत असताना राजस्थान परिवहन मंडळाच्या बसने त्यांच्या वाहनाला धडक दिली होती़ पी़व्ही नरसिंहराव यांचे नेतृत्व काँग्रेसने निर्विवादपणे मान्य केले असताना पायलट त्यांच्याविरोधात उभे ठाकले होते़काँग्रेस पक्षातीलच पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार आणि पक्षश्रेष्ठींचे निकटस्थ मानले जाणारे माधवराव शिंदे हेही असेच अपघातात गेले़ ३० सप्टेंबर २००१ रोजी मैनपुरीच्या आकाशात विमान दुर्घटनेत ते मृत्युमुखी पडले़काँग्रेसचे माजी खासदार श्रीकांत जिचकार यांचे २ जून २००४ रोजी कार अपघातात निधन झाले. नागपूरजवळील कोंढाळी येथे त्यांच्या कारला एसटी बसने धडक दिली होती. अवघ्या ४७ व्या वर्षी जिचकार यांचे झालेले निधन चटका लावून गेले.आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय. एस़ राजशेखर रेड्डी यांनीही हेलिकॉप्टर दुर्घटनेत आपले प्राण गमावले़२००४ च्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत वाय़एस़ राजशेखर रेड्डी यांनी सत्ताधारी तेलगू देसम पार्टीला धूळ चारून काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवून दिली होती़ सप्टेंबर २००९ मध्ये हैदराबादनजीक नल्लामाला जंगलात त्यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले होते़ त्यांच्या मृत्यूसोबतच आंध्रातील काँग्रेस पक्षालाही हळूहळू घरघर लागली़राजकीय नेत्यांच्या अकाली निधनाने केवळ काँग्रेस व भाजपाचेच नुकसान झालेले नाही तर तेलगू देसम पार्टीनेही आपले दोन महत्त्वाचे नेते असेच गमावले़ तत्कालीन लोकसभाध्यक्ष जी़एम़सी. बालयोगी यांचा मार्च २००२ मध्ये हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला़ यानंतर २०१२ मध्ये या पक्षाने के़येरन नायडू यांच्या रूपात आणखी एक प्रमुख नेता गमावला़ दशकभर दिल्लीतील तेलगू देसम पार्टीचा प्रमुख चेहरा राहिलेले के़येरन नायडू यांचा नोव्हेंबर २०१२ रोजी एका सडक दुर्घटनेत मृत्यू झाला़ विशाखाप˜णम येथून हैदराबादला जात असताना एका तेलाच्या टँकरने त्यांच्या कारला धडक दिली आणि ते जागीच गतप्राण झाले़ येरन नायडू आज हयात असते तर कदाचित मोदींच्या मंत्रिमंडळातील ते एक प्रमुख मंत्री असते़