शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गेल्या विधानसभेच्या कामाचा पोलिसांना मिळणार मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 22:45 IST

सहा वर्षानंतर गृह विभागाला उपरती

मुंबई : गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणूकीला चार महिन्याला अवधी होवून गेल्यानंतर २०१४ मधील विधानसभा निवडणूकीत पोलिसांनी केलेल्या कामाचा मोबदला देण्यास गृह विभागाला सवड झाली आहे.निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून ते निकालानंतरची प्रक्रिया पुर्ण होईपर्यत कार्यरत पोलीस अधिकारी,अंमलदारांना परिश्रमिक, मानधन या आर्थिक वर्षातील तरतुदीतून देण्यासाठी गृह विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे.

राज्यात कॉँग्रेस आघाडी सरकार अस्तित्वात असताना १५ आॅक्टोंबर २०१४ रोजी विधानसभा निवडणूक झाली होती. त्यासाठी जवळपास ४५ दिवस आधी निवडणूक आचारसंहिता जारी करण्यात आली होती.तेव्हापासून राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतंत्र निवडणूक कार्यालय बनविण्यात आले होते. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार याठिकाणी अन्य विभागाप्रमाणेच स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांचीही तात्पुरत्या स्वरुपात प्रतिनियुक्ती करण्यात आली होती.

अन्य विभागातील अधिकारी,कर्मचाऱ्यांप्रमाणे पोलिसांनाही त्यांच्या एकुण मूळ वेतना इतका अतिरिक्त मानधन निवडणूकीच्या कामाच्या बदल्यात दिला जातो. मात्र गेल्या जवळपास साडेपाच वर्षापासून ही रक्कम मंजुर करण्यात आलेली नव्हती. त्याबाबत पोलिसांकडून वारंवार विचारणा होवूनही गृह विभागाच्या लालफितीमध्ये त्याबाबतच्या प्रस्तावाची फाईल रखडली होती. दरम्यानच्या काळात राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचा ५ वर्षाचा कालावधी पुर्ण होवून गेला, त्यानंतर निवडणूका होवून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी अस्त्विात आली. त्यामुळे २०१४ च्या निवडणूकीच्या थकीत कामाचे आतातरी मानधन मिळण्याची अपेक्षा संबंधित पोलिसांकडून करण्यात येत होती. गृह विभागाने या प्रलंबित प्रस्तावाला मंगळवारी मंजुरी देताना या आर्थिक वर्षातील तरतुदीतून ही रक्कम वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :Policeपोलिस