शहरं
Join us  
Trending Stories
1
Hayli Gubbi: भारतीयांच्या चिंतेत भर! भारतात आली इथियोपिया ज्वालामुखीची राख, महाराष्ट्रातील कोणत्या भागात ढग?
2
PM Modi: ११ फूट रुंद, २२ फूट लांब, १९१ फूट उंच; पंतप्रधान मोदी राम मंदिराच्या शिखरावर फडकवणार भगवा ध्वज!
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, दर महिन्याला छोटी रक्कम जमा करा; ५ वर्षात बनेल १४ लाखांचा फंड
4
मोहम्मद पैगंबरांच्या केसासाठी १० लाखांचे दागिने गमावले, माहीममधील कुटुंबाची भामट्याकडून फसवणूक
5
T20 World Cup 2026 Schedule : कधी अन् कुठं रंगणार IND vs PAK यांच्यातील सामना? मोठी माहिती आली समोर
6
Benjamin Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंचा भारत दौरा पुन्हा लांबणीवर! कारण काय? 
7
IND vs SA: गुवाहाटी कसोटीत भारताचा विजय अशक्य का? आतापर्यंत एकदाच गाठलाय ३००+ स्कोर!
8
धर्मेंद्र यांचे चाहते सनी-बॉबी देओलवर नाराज, म्हणाले- आयुष्यात त्यांचे सिनेमे पाहणार नाही !
9
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
10
'यमला पगला दीवाना' टायटल मीच धर्मेंद्र यांना दिलेलं..., सचिन पिळगावकरांनी सांगितला किस्सा
11
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
12
बिग बॉस मराठी ६ लवकरच...! अखेर झाली घोषणा, कोण असणार होस्ट? प्रेक्षकांची वाढली उत्सुकता
13
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
14
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
15
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
16
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
17
कुणावरही टीकाटिप्पणी नाही, केवळ विकासाचे मुद्दे, मुख्यमंत्री प्रचारात फडणवीसांचा व्हिजनवर भर, विरोधकांवरही टीका नाही
18
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
19
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
20
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी त्यांच्या वृत्तीत बदल करावा : उच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 03:58 IST

पोलिसांनी त्यांच्या वृत्तीत बदल करावा. त्यांनी लोकांशी चांगले वागावे. लोकांची सेवा करणे, हे त्यांचे कर्तव्य आहे, हे त्यांनी विसरू नये, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले.

मुंबई : पोलिसांनी त्यांच्या वृत्तीत बदल करावा. त्यांनी लोकांशी चांगले वागावे. लोकांची सेवा करणे, हे त्यांचे कर्तव्य आहे, हे त्यांनी विसरू नये, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले. नवी मुंबईचे बांधकाम व्यावसायिक सुनील लाहोरिया यांचा मुलगा संदीप लाहोरिया याचे काढलेले पोलीस संरक्षण परत देण्याचा आदेशही न्यायालयाने नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांना दिला.कोणत्याही व्यक्तीची काहीही पार्श्वभूमी असली तरी त्याची बाजू ऐकून घेण्याचे कर्तव्य पोलिसांचे आहे. येथे लोकशाही आहे. हे मालदीव नाही, अशा शब्दांत न्या. भूषण गवई व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठाने नवी मुंबई आयुक्त हेमंत नागराळे यांना समज दिली.गेल्या सुनावणीत न्यायालयाने नागराळे यांनी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी चांगलीच खरडपट्टी काढली होती. संदीप लाहोरिया यांचे अचानक पोलीस संरक्षण काढल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने नागराळे यांना त्यांची बाजू ऐकण्याचे निर्देश दिले होते. मात्र नागराळे यांनी संदीप लाहोरिया यांचे म्हणणे न ऐकताच न्यायालयाच्या आदेशाबाबत आक्षेपार्ह व्यक्तव्य केले. नागराळे संदीप यांच्याशी अत्यंत उद्धटपणे वागल्याचा दावा संदीप यांचे वकील तन्वीर निझाम यांनी केला. नागराळे व संदीप यांच्यातील रेकॉर्डेड संवादही त्यांनी न्यायालयात सादर केला. त्यावर संतापत न्यायालयाने नागाराळे यांची पोलीस दलातील उर्वरित सेवा धोक्यात आणण्याचा संकेत देत न्यायालयाची माफी मागण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार, मंगळवारच्या सुनावणीत खुद्द हेमंत नागराळे न्यायालयात उपस्थित राहिले. त्यांनी न्यायालयाची माफी मागितली. मात्र, नागराळे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात काही त्रुटी असल्याने न्यायालयाने महाअधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांना समन्स बजावले. त्यावर कुंभकोणी यांनी एखाद्या पोलिसाने असे बोलणे योग्य नसल्याचे म्हटले. लाहोरिया यांनी केलेल्या याचिकेनुसार, जानेवारीमध्ये नागराळे यांनी संदीप लाहोरिया यांचे म्हणणे ऐकून न घेताच त्यांना नोटीस बजावून पोलीस संरक्षण काढून घेतले होते.पोलीस संरक्षण परत देण्याचे निर्देश-‘गुन्हेगारांशी बोलण्याची पोलिसांची एक पद्धत असते. त्यामुळे हळूहळू ये इतरांशीही तशाच भाषेत बोलतात,’ असे कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर ‘असे असेल तर त्यांनी (पोलिसांनी) त्यांची वृत्ती बदलावी. लोकांची सेवा करण्याचे पोलिसांचे कर्तव्य आहे. व्यक्तीची पार्श्वभूमी न पाहता त्याची बाजू ऐकणे, हे पोलिसांचे कर्तव्य आहे,’ असे म्हणत उच्च न्यायालयाने संदीप लाहोरिया यांना त्यांच्या वडिलांच्या मृत्यूचा खटला संपेपर्यंत पोलीस संरक्षण देण्याचे निर्देश हेमंत नागराळे यांना दिले.

टॅग्स :PoliceपोलिसHigh Courtउच्च न्यायालय