शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

वशीलेबाजीने अपात्र पोलीस कर्मचाऱ्यांना बढती ; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 17:34 IST

वेटिंग लिस्टमध्ये असलेल्यांना पात्र करून आत घेण्याचा प्रकार मागील ७० वर्षात कधीच झाला नसल्याचे आव्हाड म्हणाले.

मुंबई - महाराष्ट्रात पोलिस भरतीत मोठा घोटाळा झाला असल्याचे आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. राजकीय वशीलेबाजीने अपात्र कर्मचाऱ्यांची पोलीस उपनिरिक्षकपदावर (PSI) बढती करण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याकडून लाच सुद्धा घेण्यात आली असल्याचा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपावरून पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

सरकराने अपात्र ६३६ हवलदारांना पीएसआय म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे एमपीएससी अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत अपात्र ठरवलेल्यांना पात्र ठरवण्याचा अधिकारी सरकारला नाही, असे आव्हाड म्हणाले. मात्र, राजकीय वशीलेबाजीने ह्या अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली असल्याचा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला आहे. दिवस रात्र मेहनत करत  असलेल्या तरूणांचे अधिकारी होण्याचे स्वप्न सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे धुळीला मिळाले असल्याचे आव्हाड म्हणाले.

सरकराने बढती केलेल्या ६३६ जणांकडून पैसे घेतले असल्याचे आरोप आव्हाड यांनी केला. वेटिंग लिस्टमध्ये असलेल्यांना पात्र करून आत घेण्याचा प्रकार मागील ७० वर्षात कधीच झाला नसल्याचे आव्हाड म्हणाले. पोलीस दलातील हा सर्वात मोठा आणि अशोभनीय घोटाळा असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे.