शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

वशीलेबाजीने अपात्र पोलीस कर्मचाऱ्यांना बढती ; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 17:34 IST

वेटिंग लिस्टमध्ये असलेल्यांना पात्र करून आत घेण्याचा प्रकार मागील ७० वर्षात कधीच झाला नसल्याचे आव्हाड म्हणाले.

मुंबई - महाराष्ट्रात पोलिस भरतीत मोठा घोटाळा झाला असल्याचे आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. राजकीय वशीलेबाजीने अपात्र कर्मचाऱ्यांची पोलीस उपनिरिक्षकपदावर (PSI) बढती करण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याकडून लाच सुद्धा घेण्यात आली असल्याचा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपावरून पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

सरकराने अपात्र ६३६ हवलदारांना पीएसआय म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे एमपीएससी अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत अपात्र ठरवलेल्यांना पात्र ठरवण्याचा अधिकारी सरकारला नाही, असे आव्हाड म्हणाले. मात्र, राजकीय वशीलेबाजीने ह्या अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली असल्याचा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला आहे. दिवस रात्र मेहनत करत  असलेल्या तरूणांचे अधिकारी होण्याचे स्वप्न सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे धुळीला मिळाले असल्याचे आव्हाड म्हणाले.

सरकराने बढती केलेल्या ६३६ जणांकडून पैसे घेतले असल्याचे आरोप आव्हाड यांनी केला. वेटिंग लिस्टमध्ये असलेल्यांना पात्र करून आत घेण्याचा प्रकार मागील ७० वर्षात कधीच झाला नसल्याचे आव्हाड म्हणाले. पोलीस दलातील हा सर्वात मोठा आणि अशोभनीय घोटाळा असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे.