शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

कवी दिनकर मनवर आणि पत्रकार सुरेश पाटील यांनी मागितली महिलांची माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 20:10 IST

'पाणी कसं अस्त' या वादग्रस्त कवितेबद्दल नांदेड येथील कवी दिनकर मनवर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची माफी मागितली आहे. त्याचबरोबर ही कविता अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे.

मुंबई - 'पाणी कसं अस्त' या वादग्रस्त कवितेबद्दल नांदेड येथील कवी दिनकर मनवर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची माफी मागितली आहे. त्याचबरोबर ही कविता अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. याच कवितेवरून वादग्रस्त लेखन करणारे औरंगाबादचे पत्रकार सुरेश पाटील यांनीही आयोगामार्फत समस्त महिलांची माफी मागितली आहे. 

'पाणी कसं अस्त' या कवितेमध्ये श्री मनवर यांनी स्त्रियांबाबत जातिविषयक टिप्पणी केली होती.  त्याविरुद्ध  काही संघटनानी आयोगाकडे तक्रारी केल्या होत्या. त्याआधारे आयोगाने कवी मनवर, अभ्यासक्रमात त्या कवितेचा समावेश करणारे मुंबई विद्यापीठ आणि सुरेश पाटील यांना नोटिसा बजावल्या होत्या.    कवी दिनकर मनवर यांनी आपल्या व्यक्तिशः हजर राहून दिलेल्या निवेदनात विशिष्ट ओळ लिहिताना तसेच लिहिण्याआधी आणि लिहिल्यानंतरही माझ्या कुणाच्याही भावनांशी खेळण्याचा किंवा कोणत्याही स्त्रीवर्गाची अवहेलना करण्याचा कोणताही हेतू नव्हता व नाही असे म्हटले आहे. सदर कवितेतली माझ्या एका ओळीमुळे माझ्या बांधवांना व भगिनींना मानसिक क्लेश झाला. माझा काही हेतू नसताना या सर्वांच्या भावना दुखावल्या गेल्या याचे मला अतिशय दुःख झाले आहे. त्याबद्दल मा आयोगासमोर मी मनापासून माफी मागतो असे स्पष्ट केले आहे. या कवितेमागची, वादग्रस्त ओळीबाबतची भूमिका त्यांनी मांडली आहे. 

महाराष्ट्र राज्य आयोगाने मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना कवी मनवर यांची कविता  अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याबाबतची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. मुंबई विद्यापीठाचे निबंधक श्री सुनील भिरूड, तसेच मराठी अभ्यास मंडळाचे निमंत्रक डॉ सिसिलिया कार्व्हालो यांच्यासह मराठी अभ्यास मंडळाच्या सदस्यांनी आयोगापुढे उपस्थित राहत सादर केलेल्या खुलाशात म्हटले आहे कि, विद्यापीठाच्या कला शाखा तृतीय वर्ष मराठी विषयाच्या 'अभ्यास पत्रिका - ६ साहित्य आणि समाज' या मध्ये दिनकर मनवर यांच्या कवितेचा महानगरीय जाणिवेचे साहित्य म्हणून अभ्यासक्रमात २०१८-१९ ते २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी समावेश करण्यात आला होता मात्र यामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या असल्याने दिनकर मनवर यांनी समाज माध्यमाद्वारे माफी मागितली आहे. अभ्यास मंडळ ही यास सहमत असून मुंबई विद्यापीठाच्या गौरवशाली परंपरेचा विचार करून विद्यापीठाच्या परंपरेला कुठलेही गालबोट लागू नये तसेच सामाजिक सलोखा अबाधित रहावा, यासाठी मनवर यांच्या कविता संग्रहातील 'पाणी कसं अस्त' ही कविता वगळण्याचा निर्णय मराठी अभ्यास मंडळाने एकमताने घेतला आहे. तसेच यापुढे अभ्यास मंडळ अभ्यासक्रमाचे नियोजन करीत असताना कोणत्याही समाज घटकाची भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेईल. 

 औरंगाबाद येथील पत्रकार सुरेश पाटील यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे स्वतः उपस्थित राहून दिलेल्या आपल्या खुलाशात समाज माध्यमावर अनवधानाने महिलांचा अपमान झाला असून महिला आयोग व महिलांची माफी मागतो असे म्हटले आहे. त्यांनी  मूळ कवितेमध्ये बदल करून स्त्रियांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी समाज माध्यमांवर केली होती. त्यावर आयोगाने नोटीस बजावली होती.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMumbai Universityमुंबई विद्यापीठ