शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

कवी दिनकर मनवर आणि पत्रकार सुरेश पाटील यांनी मागितली महिलांची माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 20:10 IST

'पाणी कसं अस्त' या वादग्रस्त कवितेबद्दल नांदेड येथील कवी दिनकर मनवर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची माफी मागितली आहे. त्याचबरोबर ही कविता अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे.

मुंबई - 'पाणी कसं अस्त' या वादग्रस्त कवितेबद्दल नांदेड येथील कवी दिनकर मनवर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची माफी मागितली आहे. त्याचबरोबर ही कविता अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. याच कवितेवरून वादग्रस्त लेखन करणारे औरंगाबादचे पत्रकार सुरेश पाटील यांनीही आयोगामार्फत समस्त महिलांची माफी मागितली आहे. 

'पाणी कसं अस्त' या कवितेमध्ये श्री मनवर यांनी स्त्रियांबाबत जातिविषयक टिप्पणी केली होती.  त्याविरुद्ध  काही संघटनानी आयोगाकडे तक्रारी केल्या होत्या. त्याआधारे आयोगाने कवी मनवर, अभ्यासक्रमात त्या कवितेचा समावेश करणारे मुंबई विद्यापीठ आणि सुरेश पाटील यांना नोटिसा बजावल्या होत्या.    कवी दिनकर मनवर यांनी आपल्या व्यक्तिशः हजर राहून दिलेल्या निवेदनात विशिष्ट ओळ लिहिताना तसेच लिहिण्याआधी आणि लिहिल्यानंतरही माझ्या कुणाच्याही भावनांशी खेळण्याचा किंवा कोणत्याही स्त्रीवर्गाची अवहेलना करण्याचा कोणताही हेतू नव्हता व नाही असे म्हटले आहे. सदर कवितेतली माझ्या एका ओळीमुळे माझ्या बांधवांना व भगिनींना मानसिक क्लेश झाला. माझा काही हेतू नसताना या सर्वांच्या भावना दुखावल्या गेल्या याचे मला अतिशय दुःख झाले आहे. त्याबद्दल मा आयोगासमोर मी मनापासून माफी मागतो असे स्पष्ट केले आहे. या कवितेमागची, वादग्रस्त ओळीबाबतची भूमिका त्यांनी मांडली आहे. 

महाराष्ट्र राज्य आयोगाने मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना कवी मनवर यांची कविता  अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याबाबतची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. मुंबई विद्यापीठाचे निबंधक श्री सुनील भिरूड, तसेच मराठी अभ्यास मंडळाचे निमंत्रक डॉ सिसिलिया कार्व्हालो यांच्यासह मराठी अभ्यास मंडळाच्या सदस्यांनी आयोगापुढे उपस्थित राहत सादर केलेल्या खुलाशात म्हटले आहे कि, विद्यापीठाच्या कला शाखा तृतीय वर्ष मराठी विषयाच्या 'अभ्यास पत्रिका - ६ साहित्य आणि समाज' या मध्ये दिनकर मनवर यांच्या कवितेचा महानगरीय जाणिवेचे साहित्य म्हणून अभ्यासक्रमात २०१८-१९ ते २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी समावेश करण्यात आला होता मात्र यामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या असल्याने दिनकर मनवर यांनी समाज माध्यमाद्वारे माफी मागितली आहे. अभ्यास मंडळ ही यास सहमत असून मुंबई विद्यापीठाच्या गौरवशाली परंपरेचा विचार करून विद्यापीठाच्या परंपरेला कुठलेही गालबोट लागू नये तसेच सामाजिक सलोखा अबाधित रहावा, यासाठी मनवर यांच्या कविता संग्रहातील 'पाणी कसं अस्त' ही कविता वगळण्याचा निर्णय मराठी अभ्यास मंडळाने एकमताने घेतला आहे. तसेच यापुढे अभ्यास मंडळ अभ्यासक्रमाचे नियोजन करीत असताना कोणत्याही समाज घटकाची भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेईल. 

 औरंगाबाद येथील पत्रकार सुरेश पाटील यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे स्वतः उपस्थित राहून दिलेल्या आपल्या खुलाशात समाज माध्यमावर अनवधानाने महिलांचा अपमान झाला असून महिला आयोग व महिलांची माफी मागतो असे म्हटले आहे. त्यांनी  मूळ कवितेमध्ये बदल करून स्त्रियांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी समाज माध्यमांवर केली होती. त्यावर आयोगाने नोटीस बजावली होती.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMumbai Universityमुंबई विद्यापीठ