शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

...तर शिर्डीत विमानही उतरू दिलं नसतं; PM मोदींच्या दौऱ्यावरून जरांगे थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 12:23 IST

पंतप्रधान हे गोरगरिबांचे आहेत असं वाटायचे पण आता नाही अशी टीका मनोज जरांगे पाटलांनी केली.

अंतरवाली सराटी – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाणुनबुजून मराठा आरक्षण विषय घेतला नाही किंवा त्यांना सांगितला नाही असा अर्थ होतो. मराठ्यांना काही फरक पडत नाही. समाज शांत यासाठी होता की, पंतप्रधान हा विषय हाताळतील आणि मुख्यमंत्री, सरकारला सूचना देतील. मराठ्यांच्या मनात कुठलीही वाईट भावना नव्हती. जर असती तर मराठ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विमानही शिर्डीत उतरू दिले नसते अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावर त्यांनी भाष्य केले. जरांगे पाटील म्हणाले की, पंतप्रधानांबद्दल मराठ्यांच्या मनात काही वाईट नव्हते. पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री १०० टक्के मराठा आरक्षणाचा विषय हाताळतील अशी गोरगरिब मराठा समाजाची आशा होती. परंतु पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाची गरज राहिली नाही असा संदेश कालपासून राज्यात गेला आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच पंतप्रधान हे गोरगरिबांचे आहेत असं वाटायचे पण आता नाही. मराठ्यांनी ४० दिवसांची मुदत दिली होती. जर मुख्यमंत्री आणि सरकारला आरक्षण देणे शक्य नव्हते तर त्यांनी आम्हाला १ महिन्याची मुदत मागायची गरज नव्हती. सांगतानाच त्यांनी ५० वर्ष वेळ देता का म्हणायला हवे होते. कारण सरकारला मनासारखा वेळ देऊनही मराठा समाजातील पोरांचे भले होऊ नये असं त्यांना वाटत असेल. मराठ्यांची पोरं मोठी होऊ नये यासाठी षडयंत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी रचलंय असं मराठा समाजाच्या मनात शंका आहे. तुम्ही आमच्याकडून वेळ घेतला आणि आरक्षण दिला नाही हे षडयंत्र खरे आहे. कायदा पारित करण्यासाठी सरकारनेच वेळ घेतला. त्या वेळेत आरक्षण दिले असते असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

दरम्यान, दुसरं षडयंत्र असं, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकारच्या वतीने गिरीश महाजन इथं आले होते. कायदा पारित करायला वेळ लागतो असं ते म्हणाले. आम्हाला कायदा पारित करायला १ महिन्याचा वेळ द्या असं म्हटलं. आम्ही कायदा पारित करून तुम्हाला टिकणारे आरक्षण देऊ असं सांगूनही १० हजार पानांचा पुरावा असतानाही तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देऊन समाजाचा ओबीसीत समावेश का करत नाही? मराठा समाजाच्या मुलांचे भवितव्य धोक्यात घालून पुरावे असूनही आरक्षण देत नाही. तुम्हाला नाक नसल्यासारखे झालंय. मराठ्यांनी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. समितीने २-३ कोटी दस्तावेज तपासले त्यात नेमके काय हे सरकारने सांगितले नाही असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलNarendra Modiनरेंद्र मोदीMaratha Reservationमराठा आरक्षण