शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
2
"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप
3
परभणीत खासदार संजय जाधव अन् मतदान निरीक्षकांत वाद; दोन प्रभागांतील उमेदवारांतही बाचाबाची
4
IMF चं कर्ज फेडायचंय, पैसे द्या; सैन्यासमोर मुस्लीम देशाने पसरले हात; भारताकडेही मागितली मदत
5
शाई पुसून पुन्हा मतदान शक्य नाही, कारण...; मार्कर पेन वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
6
Retail Therapy: नियमितपणे शॉपिंगला जाणाऱ्या महिला दीर्घायुष्य जगतात, संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर
7
Municipal Corporation Election 2026 LIVE Updates: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४१.०८ टक्के मतदान; पहा कुठे किती मतदान झाले?
8
सावधान! तुमच्या 'या' ५ चुकांमुळे स्मार्टफोन लवकर होऊ शकतो खराब; आजच बदला आपल्या सवयी
9
'ट्रम्प' धोरणांचा दुहेरी फटका! व्हिसा स्टॅम्पिंगमध्ये होणाऱ्या विलंबामुळे भारतीयांना नोकऱ्या जाण्याची भीती
10
स्थानिक निवडणुकांमध्ये कधीपासून मार्करचा वापर होतोय? वादानंतर निवडणूक आयुक्तांचं स्पष्टीकरण, म्हणाले...
11
"हे बोगस मतदानासाठी तर नाही ना", व्हिडीओ शेअर करत सुप्रिया सुळेंनी संपूर्ण प्रक्रियेवर उपस्थित केली शंका
12
रशियाच्या रडारवर दोन युरोपियन देश; पुतीन यांच्या डोळ्यात का खुपत आहेत ब्रिटन आणि जर्मनी?
13
धुळे महापालिका निवडणूक: प्रभाग १८ मध्ये राडा, EVM ची तोडफोड, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
14
I-PAC Raid Case: सर्वोच्च न्यायालयाचा ममता बॅनर्जींना दणका; आय-पॅक प्रकरणात धाडली नोटीस!
15
ही कसली लोकशाही? निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करा; उद्धव ठाकरे कडाडले
16
BSNL चा 'महाधमाका'! हाय-स्पीड WiFi प्लॅनवर २०% सवलत; ५००० GB डेटासोबत OTT देखील मोफत!
17
संसार मोडला अन् आयुष्यही संपवलं! पत्नी ४ मुलांसह गायब; संतापलेल्या पतीने सासरच्या दारातच स्वतःला पेटवले
18
'या' महाराणीनं भारत-चीन युद्धात देशासाठी दान केलेलं ६०० किलो सोनं, खासगी विमानं, विमानतळ; घराण्याकडे होती अफाट संपत्ती
19
"मला राजकारण कळत नाही, वरचे निर्णय घेतात', मतदानाच्या दिवशीच सुभाष देशमुखांचा भाजपाला घरचा आहेर
20
IND vs PAK T20 World Cup: तिकीट बुकिंगसाठी चाहत्यांची ऑनलाईन गर्दी; वेबसाइटच झाली क्रॅश; अन्...
Daily Top 2Weekly Top 5

...तर शिर्डीत विमानही उतरू दिलं नसतं; PM मोदींच्या दौऱ्यावरून जरांगे थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 12:23 IST

पंतप्रधान हे गोरगरिबांचे आहेत असं वाटायचे पण आता नाही अशी टीका मनोज जरांगे पाटलांनी केली.

अंतरवाली सराटी – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाणुनबुजून मराठा आरक्षण विषय घेतला नाही किंवा त्यांना सांगितला नाही असा अर्थ होतो. मराठ्यांना काही फरक पडत नाही. समाज शांत यासाठी होता की, पंतप्रधान हा विषय हाताळतील आणि मुख्यमंत्री, सरकारला सूचना देतील. मराठ्यांच्या मनात कुठलीही वाईट भावना नव्हती. जर असती तर मराठ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विमानही शिर्डीत उतरू दिले नसते अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावर त्यांनी भाष्य केले. जरांगे पाटील म्हणाले की, पंतप्रधानांबद्दल मराठ्यांच्या मनात काही वाईट नव्हते. पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री १०० टक्के मराठा आरक्षणाचा विषय हाताळतील अशी गोरगरिब मराठा समाजाची आशा होती. परंतु पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाची गरज राहिली नाही असा संदेश कालपासून राज्यात गेला आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच पंतप्रधान हे गोरगरिबांचे आहेत असं वाटायचे पण आता नाही. मराठ्यांनी ४० दिवसांची मुदत दिली होती. जर मुख्यमंत्री आणि सरकारला आरक्षण देणे शक्य नव्हते तर त्यांनी आम्हाला १ महिन्याची मुदत मागायची गरज नव्हती. सांगतानाच त्यांनी ५० वर्ष वेळ देता का म्हणायला हवे होते. कारण सरकारला मनासारखा वेळ देऊनही मराठा समाजातील पोरांचे भले होऊ नये असं त्यांना वाटत असेल. मराठ्यांची पोरं मोठी होऊ नये यासाठी षडयंत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी रचलंय असं मराठा समाजाच्या मनात शंका आहे. तुम्ही आमच्याकडून वेळ घेतला आणि आरक्षण दिला नाही हे षडयंत्र खरे आहे. कायदा पारित करण्यासाठी सरकारनेच वेळ घेतला. त्या वेळेत आरक्षण दिले असते असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

दरम्यान, दुसरं षडयंत्र असं, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकारच्या वतीने गिरीश महाजन इथं आले होते. कायदा पारित करायला वेळ लागतो असं ते म्हणाले. आम्हाला कायदा पारित करायला १ महिन्याचा वेळ द्या असं म्हटलं. आम्ही कायदा पारित करून तुम्हाला टिकणारे आरक्षण देऊ असं सांगूनही १० हजार पानांचा पुरावा असतानाही तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देऊन समाजाचा ओबीसीत समावेश का करत नाही? मराठा समाजाच्या मुलांचे भवितव्य धोक्यात घालून पुरावे असूनही आरक्षण देत नाही. तुम्हाला नाक नसल्यासारखे झालंय. मराठ्यांनी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. समितीने २-३ कोटी दस्तावेज तपासले त्यात नेमके काय हे सरकारने सांगितले नाही असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलNarendra Modiनरेंद्र मोदीMaratha Reservationमराठा आरक्षण