शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

...तर शिर्डीत विमानही उतरू दिलं नसतं; PM मोदींच्या दौऱ्यावरून जरांगे थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 12:23 IST

पंतप्रधान हे गोरगरिबांचे आहेत असं वाटायचे पण आता नाही अशी टीका मनोज जरांगे पाटलांनी केली.

अंतरवाली सराटी – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाणुनबुजून मराठा आरक्षण विषय घेतला नाही किंवा त्यांना सांगितला नाही असा अर्थ होतो. मराठ्यांना काही फरक पडत नाही. समाज शांत यासाठी होता की, पंतप्रधान हा विषय हाताळतील आणि मुख्यमंत्री, सरकारला सूचना देतील. मराठ्यांच्या मनात कुठलीही वाईट भावना नव्हती. जर असती तर मराठ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विमानही शिर्डीत उतरू दिले नसते अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावर त्यांनी भाष्य केले. जरांगे पाटील म्हणाले की, पंतप्रधानांबद्दल मराठ्यांच्या मनात काही वाईट नव्हते. पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री १०० टक्के मराठा आरक्षणाचा विषय हाताळतील अशी गोरगरिब मराठा समाजाची आशा होती. परंतु पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाची गरज राहिली नाही असा संदेश कालपासून राज्यात गेला आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच पंतप्रधान हे गोरगरिबांचे आहेत असं वाटायचे पण आता नाही. मराठ्यांनी ४० दिवसांची मुदत दिली होती. जर मुख्यमंत्री आणि सरकारला आरक्षण देणे शक्य नव्हते तर त्यांनी आम्हाला १ महिन्याची मुदत मागायची गरज नव्हती. सांगतानाच त्यांनी ५० वर्ष वेळ देता का म्हणायला हवे होते. कारण सरकारला मनासारखा वेळ देऊनही मराठा समाजातील पोरांचे भले होऊ नये असं त्यांना वाटत असेल. मराठ्यांची पोरं मोठी होऊ नये यासाठी षडयंत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी रचलंय असं मराठा समाजाच्या मनात शंका आहे. तुम्ही आमच्याकडून वेळ घेतला आणि आरक्षण दिला नाही हे षडयंत्र खरे आहे. कायदा पारित करण्यासाठी सरकारनेच वेळ घेतला. त्या वेळेत आरक्षण दिले असते असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

दरम्यान, दुसरं षडयंत्र असं, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकारच्या वतीने गिरीश महाजन इथं आले होते. कायदा पारित करायला वेळ लागतो असं ते म्हणाले. आम्हाला कायदा पारित करायला १ महिन्याचा वेळ द्या असं म्हटलं. आम्ही कायदा पारित करून तुम्हाला टिकणारे आरक्षण देऊ असं सांगूनही १० हजार पानांचा पुरावा असतानाही तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देऊन समाजाचा ओबीसीत समावेश का करत नाही? मराठा समाजाच्या मुलांचे भवितव्य धोक्यात घालून पुरावे असूनही आरक्षण देत नाही. तुम्हाला नाक नसल्यासारखे झालंय. मराठ्यांनी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. समितीने २-३ कोटी दस्तावेज तपासले त्यात नेमके काय हे सरकारने सांगितले नाही असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलNarendra Modiनरेंद्र मोदीMaratha Reservationमराठा आरक्षण