शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
3
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
4
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
5
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
6
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
7
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
8
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
9
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
10
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
11
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
12
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
13
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
14
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
16
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
17
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
18
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
19
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
20
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले

...तर शिर्डीत विमानही उतरू दिलं नसतं; PM मोदींच्या दौऱ्यावरून जरांगे थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 12:23 IST

पंतप्रधान हे गोरगरिबांचे आहेत असं वाटायचे पण आता नाही अशी टीका मनोज जरांगे पाटलांनी केली.

अंतरवाली सराटी – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाणुनबुजून मराठा आरक्षण विषय घेतला नाही किंवा त्यांना सांगितला नाही असा अर्थ होतो. मराठ्यांना काही फरक पडत नाही. समाज शांत यासाठी होता की, पंतप्रधान हा विषय हाताळतील आणि मुख्यमंत्री, सरकारला सूचना देतील. मराठ्यांच्या मनात कुठलीही वाईट भावना नव्हती. जर असती तर मराठ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विमानही शिर्डीत उतरू दिले नसते अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावर त्यांनी भाष्य केले. जरांगे पाटील म्हणाले की, पंतप्रधानांबद्दल मराठ्यांच्या मनात काही वाईट नव्हते. पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री १०० टक्के मराठा आरक्षणाचा विषय हाताळतील अशी गोरगरिब मराठा समाजाची आशा होती. परंतु पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाची गरज राहिली नाही असा संदेश कालपासून राज्यात गेला आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच पंतप्रधान हे गोरगरिबांचे आहेत असं वाटायचे पण आता नाही. मराठ्यांनी ४० दिवसांची मुदत दिली होती. जर मुख्यमंत्री आणि सरकारला आरक्षण देणे शक्य नव्हते तर त्यांनी आम्हाला १ महिन्याची मुदत मागायची गरज नव्हती. सांगतानाच त्यांनी ५० वर्ष वेळ देता का म्हणायला हवे होते. कारण सरकारला मनासारखा वेळ देऊनही मराठा समाजातील पोरांचे भले होऊ नये असं त्यांना वाटत असेल. मराठ्यांची पोरं मोठी होऊ नये यासाठी षडयंत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी रचलंय असं मराठा समाजाच्या मनात शंका आहे. तुम्ही आमच्याकडून वेळ घेतला आणि आरक्षण दिला नाही हे षडयंत्र खरे आहे. कायदा पारित करण्यासाठी सरकारनेच वेळ घेतला. त्या वेळेत आरक्षण दिले असते असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

दरम्यान, दुसरं षडयंत्र असं, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकारच्या वतीने गिरीश महाजन इथं आले होते. कायदा पारित करायला वेळ लागतो असं ते म्हणाले. आम्हाला कायदा पारित करायला १ महिन्याचा वेळ द्या असं म्हटलं. आम्ही कायदा पारित करून तुम्हाला टिकणारे आरक्षण देऊ असं सांगूनही १० हजार पानांचा पुरावा असतानाही तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देऊन समाजाचा ओबीसीत समावेश का करत नाही? मराठा समाजाच्या मुलांचे भवितव्य धोक्यात घालून पुरावे असूनही आरक्षण देत नाही. तुम्हाला नाक नसल्यासारखे झालंय. मराठ्यांनी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. समितीने २-३ कोटी दस्तावेज तपासले त्यात नेमके काय हे सरकारने सांगितले नाही असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलNarendra Modiनरेंद्र मोदीMaratha Reservationमराठा आरक्षण