शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
3
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
4
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
5
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
6
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
9
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
10
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
11
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
12
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
13
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
14
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
15
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
16
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
17
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
18
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
19
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
20
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 

पंतप्रधान सिंचन योजना सुरू करणार

By admin | Updated: September 29, 2014 07:32 IST

भाजपा सरकार हेच पक्षाचे एकमेव ध्येय असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व ग्रामीण विकास मंत्री नितीन गडकरी यांनी नंदुरबार व शिंदखेडा येथे प्रचार सभेत बोलताना सांगितले.

नंदुरबार/ शिंदखेडा (जि. धुळे) : महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी शतप्रतिशत भाजपा सरकार हेच पक्षाचे एकमेव ध्येय असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व ग्रामीण विकास मंत्री नितीन गडकरी यांनी नंदुरबार व शिंदखेडा येथे प्रचार सभेत बोलताना सांगितले. पंतप्रधान ग्रामसडक योजनेप्रमाणे लवकरच पंतप्रधान सिंचन योजना सुरू करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. भाजपाने राज्यातील प्रचाराचा प्रारंभ नंदुरबारमधील सभेने रविवारी केला. राज्याला दिवाळखोरीत काढणारे आघाडी सरकार आतापर्यंतचे सर्वात निष्क्रिय सरकार ठरले. घोटाळे आणि गैरव्यवहारांनी या सरकारच्या काळात उच्चांक गाठला गेला. त्यामुळे औद्योगिक विकासात राज्य पहिल्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर फेकले गेले, असा आरोप त्यांनी केला. बाबा व दादामुळे महाराष्ट्र खड्डयात गेल्याची टीका त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार व अजित पवार यांच्यावरही त्यांनी टीका करत भ्रष्टाचार, गैरव्यवहाराचे आरोप केले. अमरावती-सुरत हा सात हजार कोटी खर्चाचा आणि संपूर्ण काँक्रीटीकरण असलेला चौपदरी महामार्ग केंद्राच्या निधीतून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.शिंदखेडा येथे बोलताना, आघाडी सरकारने जातीपातीचे राजकारण केले आणि सामान्यांच्या तोंडाला पाने पुसली. इंदूर- मनमाड रेल्वे मार्गाबाबत पुढील वर्षी कामाला सुरुवात सुरुवात केली जाईल, असे त्यांनी सांगितले. चाळीसगाव (जि.जळगाव) येथेही सायंकाळी गडकरींची सभा झाली.