शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यगृहांच्या सुधारणेसाठी नाट्यप्रेमी एकत्र

By admin | Updated: July 3, 2017 19:58 IST

नाट्यगृहांची दुरवस्था याविषयी लिहून आणि बोलून अनेक वर्षे उलटली तरी मनपा कधी याबद्दल गांभीर्याने विचार करताना दिसत नाही

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 3 - शहरातील नाट्यगृहांची दुरवस्था याविषयी लिहून आणि बोलून अनेक वर्षे उलटली तरी मनपा कधी याबद्दल गांभीर्याने विचार करताना दिसत नाही. एवढ्या वर्षांची निष्क्रियता पाहूनही निराश न होता पुन्हा एकदा प्रशासनासमोर नाट्यगृहांचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी शहरातील नाट्यक्षेत्रातील कलावंत आणि नाट्यरसिक रविवारी एकत्र आले. संत एकनाथ रंगमंदिर येथे रविवारी (दि.२) नाट्यप्रेमींच्या झालेल्या बैठकीत मनपांतर्गत येणाऱ्या दोन्ही नाट्यगृहांची बिकट अवस्था समोर आणून त्यांची सुधारणा करण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काय करता येईल, याची चर्चा करण्यात आली. मनपा चालवीत असलेल्या संत तुकाराम नाट्यगृह आणि संत एकनाथ रंगमंदिर या दोन नाट्यगृहांमध्ये सुविधांचा अभाव आहे. वेळोवेळी मनपाला याबाबत सांगूनही काही विशेष प्रयत्न होताना दिसत नाही. अस्वच्छता, तुटलेल्या खुर्च्या, मोडका रंगमंच, असुविधाजनक ग्रीन रूम, स्वच्छतागृहांची दुरवस्था, जुनी ध्वनियंत्रणा व प्रकाश व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, अशा अनेक समस्यांनी शहरातील या नाट्यगृहांना ग्रासलेले आहे. शाळा- कॉलेजच्या गॅदरिंगसाठी सूट देऊन नाट्यगृह उपलब्ध करून देण्यात येते. विद्यार्थी खुर्च्यांवर उभे राहून नाचतात, त्यामुळे खुर्च्या तुटतात. याची भरपाईदेखील दिली जात नाही. यावर कुठे तरी नियंत्रण राहिले पाहिजे, अशी मागणी नाट्यप्रेमींनी केली आहे.लवकरच मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर आणि विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना याबाबत निवेदन देऊन प्रत्यक्ष परिस्थिती दाखविण्यात येणार आहे. नाट्यगृहांचे हाल पाहून अनेक व्यावसायिक नाटक कंपन्या व कलावंत शहरात प्रयोग करण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे स्थानिक रसिक दर्जेदार कलाकृती पाहण्यापासून मुकतात. कला-संस्कृतीचा मोठा वारसा लाभलेल्या आपल्या शहराची ही ओळख आता ओसरू लागल्याची खंत नाट्यकर्मींनी व्यक्त केली. यावेळी शीतल रुद्रवार, सचिन नेवपूरकर, संदीप सोनार, राजू परदेशी, पवन गायकवाड, विशाखा रूपल, प्रसाद साडेकर, राजेंद्र जोशी, हेमंत अष्टपुत्रे, सारंग टाकळकर, माया गोस्वामी आणि नाट्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रत्यक्ष अभिनेत्यांनी केली होती तक्रार...रंगभूमीची अशी वाताहत झालेली पाहून अनेक कलावंतांनी आवर्जून येथील अनास्थेविषयी भाष्य केले होते. मागच्या वर्षी तर प्रशांत दामले यांनी स्वत: प्रयोगापूर्वी नाट्यगृहात झाडूने सफाई केली होती. सुयश टिळकने नाट्यगृहाच्या दुरुस्तीची मागणी केली होती. याबरोबरच जितेंद्र जोशी, सौरभ गोखले, प्राजक्ता माळी आदी कलाकारांनी येथे आल्यावर नाट्यगृहांच्या दुरवस्थेविषयी चिंता व्यक्त केली आहे.जीएसटीमुळे नाटकाचे तिकीट दर वाढलेवस्तू व सेवा करांतर्गत (जीएसटी) नाटकांच्या तिकिटावर आता १८ टक्के कर लागणार आहे. म्हणजे ३०० रुपयांच्या तिकिटावर ५४ रुपये कर बसेल. म्हणजे तिकीट होणार ३५४ रुपये. जीएसटी लागू झाल्यामुळे नाट्यरसिकांच्या खिशाला थोडाफार भार सोसावा लागणार आहे. महागडे तिकीट काढून येणाऱ्या प्रेक्षकांना जेव्हा त्या बदल्यात सुविधा मिळत नसतील तर ते पुन्हा येणे पसंत करणार नाहीत.