शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मंत्रालयापासून प्लॅस्टिक बंदी, शासकीय कार्यालयांनाही निर्णय लागू: रामदास कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 03:05 IST

पर्यावरण संवर्धनासाठी राज्य सरकारने राज्यात टप्प्याटप्प्याने प्लॅस्टिक वापरावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला असून, आज मंत्रालय आणि सर्व शासकीय कार्यालयांत प्लॅस्टिक बंदी लागू करून

मुंबई : पर्यावरण संवर्धनासाठी राज्य सरकारने राज्यात टप्प्याटप्प्याने प्लॅस्टिक वापरावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला असून, आज मंत्रालय आणि सर्व शासकीय कार्यालयांत प्लॅस्टिक बंदी लागू करून ‘प्लॅस्टिकमुक्त महाराष्ट्र’ अभियानाची सुरुवात करण्यात आली, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली.प्लॅस्टिकच्या अमर्याद वापरामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे. त्यामुळे प्लॅस्टिकच्या पिशव्या व बाटल्यांच्या वापरावर बंदी आणतानाच प्लॅस्टिकला पर्याय निर्माण करण्याबाबत विचार सुरू आहे.दुधाच्या, तेलाच्या, औषधांच्या प्लॅस्टिक पिशव्यांना पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध केले जाणार आहेत. पर्यावरण जनजागृती कार्यक्रमाची आखणी करण्याबरोबरच कापडी पिशव्या बनवण्यासाठी राज्यातल्या विविध महिला बचत गटांना निधीसह प्रोत्साहन देणार असल्याचे कदम यांनी सांगितले.याशिवाय, निवासी हॉटेलमधील प्लॅस्टिकच्या बाटलीबंद पाण्यावर बंदी आणण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.मात्र, हॉटेलमधील पाण्याच्या शुद्धतेची खात्री नसल्याने ग्राहक बाटलीबंद पाण्याचा पर्याय निवडतात. त्यामुळे बाटलीबंद पाण्यावर बंदी घातल्यास ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. याबाबत चर्चेसाठी पर्यावरण विभागातर्फे बाटलीबंद पाणी उत्पादक कंपन्या, दुकान मालक असोसिएशन, हॉटेल मालक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करण्यात येणार आहे....तर दुकानांचा परवाना होणार रद्द -अलीकडच्या काळात पर्यावरणाच्यादृष्टीने अनेक कायदे, नियम करण्यात आले. मात्र त्याची परिणामकारक अंमलबजावणी होत नाही. कायद्याची अमलबजावणी न करणा-या हॉटेल्स आणि विक्रेत्यांवर फौजदारी कारवाईची तरतूद आहे. मात्र, आता या कायद्यात सुधारणा करून सहा महिन्यांची शिक्षा आणि परवाना रद्द करण्याची तरतूद करण्यात येणार असल्याचेही कदम यांनी सांगितले.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमPlastic banप्लॅस्टिक बंदीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार