शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

मंत्रालयापासून प्लॅस्टिक बंदी, शासकीय कार्यालयांनाही निर्णय लागू: रामदास कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 03:05 IST

पर्यावरण संवर्धनासाठी राज्य सरकारने राज्यात टप्प्याटप्प्याने प्लॅस्टिक वापरावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला असून, आज मंत्रालय आणि सर्व शासकीय कार्यालयांत प्लॅस्टिक बंदी लागू करून

मुंबई : पर्यावरण संवर्धनासाठी राज्य सरकारने राज्यात टप्प्याटप्प्याने प्लॅस्टिक वापरावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला असून, आज मंत्रालय आणि सर्व शासकीय कार्यालयांत प्लॅस्टिक बंदी लागू करून ‘प्लॅस्टिकमुक्त महाराष्ट्र’ अभियानाची सुरुवात करण्यात आली, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली.प्लॅस्टिकच्या अमर्याद वापरामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे. त्यामुळे प्लॅस्टिकच्या पिशव्या व बाटल्यांच्या वापरावर बंदी आणतानाच प्लॅस्टिकला पर्याय निर्माण करण्याबाबत विचार सुरू आहे.दुधाच्या, तेलाच्या, औषधांच्या प्लॅस्टिक पिशव्यांना पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध केले जाणार आहेत. पर्यावरण जनजागृती कार्यक्रमाची आखणी करण्याबरोबरच कापडी पिशव्या बनवण्यासाठी राज्यातल्या विविध महिला बचत गटांना निधीसह प्रोत्साहन देणार असल्याचे कदम यांनी सांगितले.याशिवाय, निवासी हॉटेलमधील प्लॅस्टिकच्या बाटलीबंद पाण्यावर बंदी आणण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.मात्र, हॉटेलमधील पाण्याच्या शुद्धतेची खात्री नसल्याने ग्राहक बाटलीबंद पाण्याचा पर्याय निवडतात. त्यामुळे बाटलीबंद पाण्यावर बंदी घातल्यास ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. याबाबत चर्चेसाठी पर्यावरण विभागातर्फे बाटलीबंद पाणी उत्पादक कंपन्या, दुकान मालक असोसिएशन, हॉटेल मालक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करण्यात येणार आहे....तर दुकानांचा परवाना होणार रद्द -अलीकडच्या काळात पर्यावरणाच्यादृष्टीने अनेक कायदे, नियम करण्यात आले. मात्र त्याची परिणामकारक अंमलबजावणी होत नाही. कायद्याची अमलबजावणी न करणा-या हॉटेल्स आणि विक्रेत्यांवर फौजदारी कारवाईची तरतूद आहे. मात्र, आता या कायद्यात सुधारणा करून सहा महिन्यांची शिक्षा आणि परवाना रद्द करण्याची तरतूद करण्यात येणार असल्याचेही कदम यांनी सांगितले.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमPlastic banप्लॅस्टिक बंदीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार