शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
4
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
5
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
6
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
7
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
8
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
9
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
10
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
11
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
12
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
13
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
14
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
15
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
17
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
18
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
19
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
20
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'

ग्रहदिशेचा अभ्यासक कोपर्निकस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 4:28 AM

मागच्या अंकात आपण बघितले होते की, आपल्या पूर्वजांनी विश्वाची कल्पना करताना कशाप्रकारे विचार केला होता. त्यांनी असा विचार मांडला की, पृथ्वी स्थिर आहे आणि तिच्या भोवती एक मोठा गोल फिरत आहे. या गोलावर आतून तारे चिकटवले आहेत.

- अरविंद परांजपेमागच्या अंकात आपण बघितले होते की, आपल्या पूर्वजांनी विश्वाची कल्पना करताना कशाप्रकारे विचार केला होता. त्यांनी असा विचार मांडला की, पृथ्वी स्थिर आहे आणि तिच्या भोवती एक मोठा गोल फिरत आहे. या गोलावर आतून तारे चिकटवले आहेत. त्यांची संख्या सुमारे ६००० आहे. या गोलाचा अर्धा भाग पृथ्वीच्या क्षितिजावर तर अर्धा भाग तिच्या खाली असतो. म्हणून एका वेळेस आपल्याला सुमारे ३००० तारे दिसू शकतात. हा गोल पृथ्वी भोवती फिरत असल्यामुळे आपल्याला ताºयांचा उदय आणि अस्त होताना दिसतो आणि हे तारे त्या गोलावर अंकित असल्यामुळे त्यांना काल्पनिक रेषांनी जोडून त्यांच्यात वेगवेगळ्या आकृतींची कल्पना करता येते. या गोलाला आपण भूगोल म्हणून ओळखतो. तर इंग्रजीत याला सेलेस्टीयल स्फियर असे म्हणतात. अनेकदा याला आपण नभपटलही म्हणतो.या ६००० ताºयांच्या शिवाय पाच तारे असे ही होते की, ज्यांची जागा इतर ताºयांच्या सापेक्षात बदलत असताना दिसून येत. अस वाटे की, हे तारे या गोलावर स्वच्छंदपणे नभपटलावर भटकत आहेत. ग्रीक लोकांनी त्याच्या भाषेत यांना प्लॅनेट (म्हणजचे भटके) म्हटले. यांना आपण ग्रह म्हणून ओळखले. याशिवाय या गोलावर चंद्र आणि सूर्यही आहेत, ज्यांची जागापण बदलत असते. कालांतराने आणखीन दोन गोष्टी लक्षात आल्या. एक म्हणजे नभपटलावर सूर्य मात्र एका विशिष्ट मार्गानेच प्रवास करतो. तर चंद्राचा आणि इतर ग्रहांचा मार्ग सूर्याच्या मार्गाच्या जवळपासच असतो. या सर्वांचा नभपटलावर प्रवास दाखवण्याकरिता मग अशी कल्पना मांडण्यात आली की, पृथ्वी आणि भूगोल यांच्यामध्ये ग्रहांचे पाच, चंद्र्राचा आणि सूर्याचा एक-एक असे सात अत्यंत पारदर्शक स्फटिकांचे गोल आहेत. हे गोल इतके पारदर्शक आहेत की, त्याचे अस्तित्व आपल्याला दिसत नाही. या गोलांची फिरण्याची गती वेगवेगळी असल्याने ग्रह वेगवेगळ्या गतीने नभपटलावर प्रवास करताना दिसतात.आज आपल्याला वाटू शकते की, त्या काळात लोकांच्या विश्वाबद्दलच्या कल्पना खूप भन्नाट होत्या. तरीही त्या काळाचा विचार करता त्यांच्या कल्पनेतील विश्व चुकीचे होते, असे मात्र म्हणता येणार नाही. कारण त्यांना ग्रहांच्या प्रवासाचा मार्ग गणिताने बºयापैकी सोडवता येत होता; पण यात एक वेगळीच अडचण समोर येत होती. ही अडचण अशी होती की, नभपटलावर प्रवास करता करता ग्रह आपल्या प्रवासाची दिशा बदलून विरुद्ध दिशेने प्रवास करत होते. यालाच आपण ग्रह वक्री आला, असे म्हणतो. हे ग्रह कधी उजवीकडून तर कधी डावीकडून दिशा बदलतात. मग काही दिवसांनी परत फिरून ते आपला पूर्ववत प्रवास सुरू करायचे. हे सर्व स्फटिक गोलांच्या फिरण्यातून दाखवणे, खूपच कठीण होते. हा स्फटिक गोल आधी थांबवायचा, मग तो उलटा फिरवायचा, मग परत सुलटा फिरवायचा, हे सर्व काम सोपे अजिबात नव्हते, कारण ते अभ्यासक हाडाचे शास्त्रज्ञ होते. गोलांना सरळ आणि वक्री फिरवणारी ही दैवी शक्ती आहे, अश्ी पळवाट शोधली नाही.ग्रहांची दिशा का व कशी बदलते, हे दाखविण्याकरिता अनेक गणिते मांडण्यात आली आणि सोडविण्यात आली. ही गणिते अत्यंत किचकट तर होतीच; पण त्याचबरोबर ग्रहांचे मार्ग अचूक सोडवण्यास असक्षम होती.१५व्या शतकातील गणितज्ञ शास्त्रज्ञ कोपर्निकसने (१९ फेब्रुवारी १४७३ - २४ मे १५४३ ) एक गृहीत मांडले. थोडक्यात ते असे होते. समजा आपण मानले की, ग्रह पृथ्वी भोवती न फिरता सूर्याभोवती फिरत आहेत. तर ग्रहांचे वक्री जाणे हे आपण सहज दाखवू शकतो. म्हणजे असे की, एक क्षण समजा की तुम्ही मेरी गो राउंडवर बसून फेरी मारत आहात. एका फेरीत बाहेर उभा असलेला तुमचा मित्र दूरच्या घरांच्या सापेक्षात पुढे-मागे जाताना तुम्हाला दिसून येईल. त्याच्या या गृहिताचे काय पडसाद उमटतील, याची कोपर्निकसला पुरेपूर कल्पना होती. याचा सरळ सरळ अर्थ होतो की, विश्वाचे केंद्र हे पृथ्वी नसून सूर्य आहे. जे पोपला मान्य होणे शक्य तर नव्हतेच; पण असे विचार मांडल्याबद्दल कोपर्निकसला मोठी शिक्षाही झाली असती. कोपर्निकसने एका ग्रंथात आपल्या गृहितांची कारणमिमांसा केली होती. त्याने आपला ग्रंथ फक्त काही जवळच्या विद्वान मित्रांनाच दाखवला होता; पण प्रसिद्ध केला नव्हता. तो मृत्युशय्येवर असताना त्याने आपल्या मित्रांना तो ग्रंथ प्रसिद्ध करण्याची परवानगी दिली.असे म्हणतात की, २४ मे १५४३ रोजी त्याच्या मित्रांनी प्रसिद्ध झालेल्या ग्रंथाची प्रत त्याला दाखवायला आणली, तेव्हा कोपर्निकस कोमात होता; पण तो काही काळ कोमामधून बाहेर आला. त्याने तो ग्रंथ डोळे भरून बघितला आणि हा अमूल्य ठेवा आणि एक संपूर्ण नवीन विचार जगासाठी ठेवून तो कायमचा निघून गेला.(लेखक नेहरू तारांगणचे संचालक आहेत.)paranjpye.arvind@gmail.com

टॅग्स :Earthपृथ्वीscienceविज्ञान