शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
3
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
4
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
7
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
8
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
9
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
10
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
11
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
12
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
13
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
14
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
15
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
16
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
17
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
18
Jagannath Yatra 2025 : जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
19
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
20
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...

अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील भाविकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2016 16:19 IST

अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या नाशिकच्या १५० भाविकांसह राज्यातील सुमारे साडेचार ते पाच हजार नागरिक काश्मिरमधील बालतालमध्ये अडकून पडले आहेत.

ऑनलाइन लोकमत 
नाशिक, दि. १० - अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या नाशिकच्या १५० भाविकांसह राज्यातील  सुमारे साडेचार ते पाच हजार नागरिक काश्मिरमधील बालतालमध्ये अडकून पडले आहेत. विशेष म्हणजे भाविकांसाठी असलेल्या लंगरमधील भोजनव्यवस्थाही संपुष्टात आल्याने भाविकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे या भाविकांनी तेथील प्रशासनाविरूद्ध संताप व्यक्त केला आहे़ 
 
अमरनाथ यात्रेसाठी जळगाव येथील अनिल महाजन यांच्यासमवेत (१२),  दादर येथील तेजस कारंबे यांच्यासमवेत (८०), श्रीरामपूर येथील सुहास परदेशी यांच्यासमवेत (२०), नागपूर येथील गणेश कोठारी यांच्यासमवेत (१२), कल्याण येथील सतीश कोठेकर यांच्यासमवेत (१६), मुंबईतील लक्ष्मण वारे यांच्यासमवेत (८) तर मालेगावमधील दादाजी शेवाळे यांच्यासमवेत १२ व्यक्ती या अमरनाथ यात्रेसाठी गेल्या आहेत. 
 
दरम्यान, अमरनाथ दर्शनाहून परतणा-या भाविकांनी परतीच्या गाड्यांचे केलेले आरक्षण रद्द होण्याचा मार्गावर आहे. मात्र तरीही तेथील स्थानिक प्रशासन त्यांना पुढे जाऊ देत नसल्याची माहिती हेमंत अगरवाल यांनी लोकमत ऑनलाईनसाठी दिली आहे़