शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

जैन धर्माचे तत्त्वज्ञान जगाला प्रेरणादायी

By admin | Updated: December 21, 2014 01:49 IST

जैन धर्माने जगाला मानवता आणि अहिंसेची शिकवण दिली आहे.

कुलगुरू पवार : दक्षिण भारत जैन सभेच्या त्रैवार्षिक अधिवेशनाला प्रारंभकोल्हापूर : जैन धर्माने जगाला मानवता आणि अहिंसेची शिकवण दिली आहे. आपली सांस्कृतिक वैशिष्ट्ये जपतानाच शैक्षणिकदृष्ट्या प्रगती साधत समाजाने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले औद्योगिक सामर्थ्य निर्माण केले आहे. मानवतेच्या मार्गाने जाताना स्वत:सोबत समाजाचा विकास साधणारे जैन धर्माचे तत्त्वज्ञान जगाला प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी केले. शाहू सांस्कृतिक भवनमध्ये दक्षिण भारत जैन सभेच्यावतीने आयोजित ९४ व्या त्रैवार्षिक अधिवेशनात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील होते. व्यासपीठावर लक्ष्मीसेन महाराज, महापौर तृप्ती माळवी, अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष अ‍ॅड. के. ए. कापसे, नगरसेविका अपर्णा आडके, पद्मजा देशिंगे, महावीर देसाई, सुभाष चौगुले उपस्थित होते. डॉ. पवार म्हणाले, उन्नतीचा मार्ग शांततेतून आणि शिक्षणातून जातो, हे जैन समाजाने सिद्ध केले आहे. जैन समाजातील सुशिक्षितांची आकडेवारी ८५ टक्के इतकी आहे. शिक्षणामुळे समाजाने आंतरराष्ट्रीय पातळीवर औद्योगिक सामर्थ्य निर्माण केले आहे; तर दक्षिण भारत जैन सभेने प्रगतीसोबतच आपली संस्कृती जोपासण्याची ताकद समाजाला दिली आहे. तर के. ए. कापसे म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी सर्वसामान्य जनतेसाठी शिक्षणाची दारे खुली केली; मात्र अजूनही खेड्यात राहणाऱ्या जैन बांधवांत शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. ते वाढविण्यासाठी शिक्षणासाठी सुसज्ज केंद्रे निर्माण झाली पाहिजेत. ‘एज्युकेशन हब’ व्हायला हवेत. माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, जैन धर्माला अल्पसंख्याक दर्जा मिळाला हे या वर्षातील सर्वांत मोठे यश आहे. समाजाने आणि सभेने या अल्पसंख्याक दर्जाचा उपयोग शिक्षणासाठी करून घ्यावा. या दर्जाचा अधिकाधिक लाभ समाजातील प्रत्येक मुलापर्यंत कसा पोहोचेल यासाठी सभेने कार्यरत राहावे. आपला समाज शेतीपासून दुरावत आहे. नव्या पिढीला शेतीतील ज्ञान आत्मसात करता यावे, यासाठी अ‍ॅग्रिकल्चर कॉलेज निर्माण केले जावे. स्त्री-भ्रूणहत्या रोखणे व व्यसनमुक्तीस समाजाने पुढाकार घ्यावा. दरम्यान, रावसाहेब पाटील यांचेही यावेळी भाषण झाले़ दिवसभरात दक्षिण भारत महिला परिषद, वीर महिला मंडळ मध्यवर्ती समितीचे अधिवेशन झाले. दुपारनंतरच्या सत्रात पदवीधर संघटनेचे व वीर सेवा दलाच्या मध्यवर्ती समितीचे अधिवेशन झाले. (प्रतिनिधी)शेती आणि उद्योगाकडे वळा लक्ष्मीसेन महाराज म्हणाले, दक्षिण भारत जैन सभा ही संस्था १२३ वर्षांपूर्वी एका साधूंनी स्थापन केलेली संस्था आहे. हे करताना त्यांनी मठाने धार्मिक कार्य करावे आणि सभेने शैक्षणिक-सामाजिक कार्य करावे, असे सांगितले. आताची मुलं शिक्षण घेतले की नोकरीकडे वळतात; पण त्याऐवजी शेती आणि उद्योगधंद्यांकडे वळले पाहिजे. अधिवेशनात आज सकाळी १० वाजता : दक्षिण भारत जैन सभेची वार्षिक सर्वसाधारण सभा दुपारी २ वाजता : पुरस्कार वितरण व स्मरणिका प्रकाशन