शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राणेंविरोधातील याचिकाकर्ते केतन तिरोडकरांनी मागणी केल्यास त्यांना पोलीस संरक्षण देऊ- दीपक केसरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 21:54 IST

याचिकाकर्ते केतन तिरोडकर यांनी मागणी केल्यास त्याना पोलीस संरक्षण दिले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तीन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौ-यावर असलेल्या मंत्री केसरकर यांनी गुरुवारी रात्री उशिरा सावंतवाडीत पत्रकारांशी संवाद साधला.

सावंतवाडी : स्वच्छ मंत्रिमंडळात कलंकित व्यक्तीला घ्यायचे की नाही ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओळखावे. मात्र मला मिळालेल्या ईश्वरी संकेताप्रमाणे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या विरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयात आठवड्यात तीन वेळा सुनावणी झाली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी एवढे होणे म्हणजे केवढा हा ईश्वरी संकेत आहे, असा खुलासा राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला. तसेच याचिकाकर्ते केतन तिरोडकर यांनी मागणी केल्यास त्याना पोलीस संरक्षण दिले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तीन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौ-यावर असलेल्या मंत्री केसरकर यांनी गुरुवारी रात्री उशिरा सावंतवाडीत पत्रकारांशी संवाद साधला.मंत्री केसरकर म्हणाले, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यांची तीन वेळा सुनावणी झाली आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने भ्रष्ट व्यक्तीची यादी सरकारकडे मागितली आहे. त्यामुळे अशा कलंकित व्यक्तींना मंत्री मंडळात घ्यायचे की नाही ते मुख्यमंत्र्यांनी ठरवावे, असे सांगत मुख्यमंत्र्यांवर वरून दबाव असू शकतो, असा खुलासा त्यामुळे त्यांना हे करावे लागत आहे. अन्यथा लोकनेता असलेल्या एकनाथ खडसे यांच्यावर आरोप झाले तर त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्यात आले आहे. मग राणे यांची चौकशी सुरू झाली तर त्यांनाही घ्यायचे की नाही घ्यायचे ते भाजपाने ठरवावे असे सांगितले. राणेंमुळे शिवसेना कधीही सरकारमधून बाहेर पडणार नसल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले. तसेच जिल्हाप्रमुख व संपर्कप्रमुख यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली. त्यात पुढील दोन वर्षांत निवडणूक असून त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती, असे सांगितले. त्यामुळे सरकारमधून बाहेर पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे जाहीर केले.माझ्यावर टीका करणा-या सतीश सावंत यांना ईश्वरी संकेताचे महत्त्व काय कळणार, जे लोक पुण्यवान असतात, त्यांनाच ईश्वरी संकेत मिळत असतात. सावंत हे नेहमी या ना त्या कारणाने अडचणीत येतात. त्यामुळे त्यांना माझ्या विरोधात काही तरी बोलावे लागते आणि त्यांना बोलण्याशिवाय पर्यायच नाही अन्यथा त्यांचे नेते विचारतील, अशी टीकाही मंत्री केसरकर यांनी केली.ईडीच्या चौकशीत एका नेत्याचे काय झाले ते बघाईडीच्या चौकशीत राज्यातील एका नेत्याचे काय झाले त्याचा अभ्यास करावा. त्यामुळे मनी लाँड्रिंग हा मोठा गुन्हा आहे. त्यात काही होऊ शकते, सर्वोच्च न्यायालयानेही अशा राजकीय व्यक्तीची यादी मागवली असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Narayan Raneनारायण राणे