शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
2
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
3
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
4
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
5
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
6
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
7
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
8
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
9
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
10
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
11
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
12
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
13
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
14
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
15
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
16
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
17
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
18
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
19
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!

शिवस्मारकाविरोधात हायकोर्टात याचिका

By admin | Updated: January 8, 2017 00:29 IST

राज्यावर कोट्यवधी रुपयांचे ओझे आणि अनेक समस्या ‘आ’ वासून उभ्या असताना करदात्यांचे ३,६०० कोटी रुपये खर्च करून शिवस्मारक बांधण्याची गरज काय, असा थेट

मुंबई : राज्यावर कोट्यवधी रुपयांचे ओझे आणि अनेक समस्या ‘आ’ वासून उभ्या असताना करदात्यांचे ३,६०० कोटी रुपये खर्च करून शिवस्मारक बांधण्याची गरज काय, असा थेट प्रश्न प्रा. मोहन भिडे यांनी जनहित याचिकेद्वारे उपस्थित केला आहे. राज्यातील १२ कोटी जनतेच्या महत्त्वाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून बांधण्यात येणारे शिवस्मारक रद्द करण्यात यावे, अशी मागणी भिडे यांनी केली आहे. ३१ मार्च २०१६पर्यंत राज्यावर ३ लाख ५१ हजार कोटी रुपये कर्ज होते. या आर्थिक वर्षात हे कर्ज ४ लाख कोटी रुपये होण्याची शक्यता आहे. एवढे कर्जाचे ओझे असतानाही राज्य सरकार शिवस्मारकासाठी ३६०० कोटी रुपये खर्च करणार. कर्जाशिवाय राज्य सरकारपुढे अनेक समस्या ‘आ’ वासून उभ्या आहेत. १२ कोटी जनतेला मूलभूत सुविधा पुरविण्यास अपयशी ठरलेल्या सरकारने अशा प्रकारे सामान्य जनतेचे पैसे प्रकल्पासाठी खर्च करणे योग्य आहे का, असा प्रश्न भिडे-कपासी कॉमर्स क्लासेसचे प्राध्यापक मोहम भिडे यांनी जनहित याचिकेद्वारे उपस्थित केला आहे. ‘जगातील सर्वांत उंच स्वातंत्र्यदेवीच्या पुतळ्याला मागे टाकण्यासाठी गुजरात सरकारने सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बांधण्याचा निर्णय घेतला. याही पुतळ्याला मागे टाकण्यासाठी राज्य सरकारने त्याहून उंच असा शिवाजी महाराजांचा पुतळा बांधण्याचा निर्णय घेतला. सर्वांत उंच पुतळे बांधण्याची ही स्पर्धा आहे का? या स्मारकामुळे पर्यावरणालाही हानी पोहोचणार आहे. त्यामुळे हे प्रस्तावित स्मारक रद्द करण्याचा आदेश सरकारला द्या; तसेच ही याचिका प्रलंबित असेपर्यंत प्रस्तावित प्रकल्पाला स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)