शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
3
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
4
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
5
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
6
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
7
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
8
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
9
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
11
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
12
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
13
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
14
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
15
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
16
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
17
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
18
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
19
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
20
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

शिवस्मारकाविरोधात हायकोर्टात याचिका

By admin | Updated: January 8, 2017 00:29 IST

राज्यावर कोट्यवधी रुपयांचे ओझे आणि अनेक समस्या ‘आ’ वासून उभ्या असताना करदात्यांचे ३,६०० कोटी रुपये खर्च करून शिवस्मारक बांधण्याची गरज काय, असा थेट

मुंबई : राज्यावर कोट्यवधी रुपयांचे ओझे आणि अनेक समस्या ‘आ’ वासून उभ्या असताना करदात्यांचे ३,६०० कोटी रुपये खर्च करून शिवस्मारक बांधण्याची गरज काय, असा थेट प्रश्न प्रा. मोहन भिडे यांनी जनहित याचिकेद्वारे उपस्थित केला आहे. राज्यातील १२ कोटी जनतेच्या महत्त्वाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून बांधण्यात येणारे शिवस्मारक रद्द करण्यात यावे, अशी मागणी भिडे यांनी केली आहे. ३१ मार्च २०१६पर्यंत राज्यावर ३ लाख ५१ हजार कोटी रुपये कर्ज होते. या आर्थिक वर्षात हे कर्ज ४ लाख कोटी रुपये होण्याची शक्यता आहे. एवढे कर्जाचे ओझे असतानाही राज्य सरकार शिवस्मारकासाठी ३६०० कोटी रुपये खर्च करणार. कर्जाशिवाय राज्य सरकारपुढे अनेक समस्या ‘आ’ वासून उभ्या आहेत. १२ कोटी जनतेला मूलभूत सुविधा पुरविण्यास अपयशी ठरलेल्या सरकारने अशा प्रकारे सामान्य जनतेचे पैसे प्रकल्पासाठी खर्च करणे योग्य आहे का, असा प्रश्न भिडे-कपासी कॉमर्स क्लासेसचे प्राध्यापक मोहम भिडे यांनी जनहित याचिकेद्वारे उपस्थित केला आहे. ‘जगातील सर्वांत उंच स्वातंत्र्यदेवीच्या पुतळ्याला मागे टाकण्यासाठी गुजरात सरकारने सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बांधण्याचा निर्णय घेतला. याही पुतळ्याला मागे टाकण्यासाठी राज्य सरकारने त्याहून उंच असा शिवाजी महाराजांचा पुतळा बांधण्याचा निर्णय घेतला. सर्वांत उंच पुतळे बांधण्याची ही स्पर्धा आहे का? या स्मारकामुळे पर्यावरणालाही हानी पोहोचणार आहे. त्यामुळे हे प्रस्तावित स्मारक रद्द करण्याचा आदेश सरकारला द्या; तसेच ही याचिका प्रलंबित असेपर्यंत प्रस्तावित प्रकल्पाला स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)