शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन कायद्यासाठी उच्च न्यायालयात धाव, जनहित याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2018 12:29 IST

गेल्या काही महिन्यात मुंबईसह विविध ठिकाणी होत असलेल्या आगीच्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर असोसिएशन फॉर अ‍ॅडिंग जस्टिस या स्वयंसेवी संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत जनहित याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारने सुरक्षाविषयक नियम अधिक प्रभावी करून अग्नी सुरक्षा कायदा लागू करावा, अशी मागणी त्यात करण्यात आली आहे.

पुणे : गेल्या काही महिन्यात मुंबईसह विविध ठिकाणी होत असलेल्या आगीच्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर असोसिएशन फॉर अ‍ॅडिंग जस्टिस या स्वयंसेवीसंस्थेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत जनहित याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारने सुरक्षाविषयक नियम अधिक प्रभावी करून अग्नी सुरक्षा कायदा लागू करावा, अशी मागणी त्यात करण्यात आली आहे.मुंबईमध्ये पाठोपाठ अग्नितांडवाच्या घटना गेल्या काही महिन्यात घडल्या आहेत. त्यात मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. राज्याचे क्षेत्रफळ 3 लाथ 7 हजार 578 चौरस किलोमीटर असून, त्यापैकी ६ हजार ३८० चौरस किलोमीटर शहरी आहे. त्यासाठी केवळ 354अग्निशमन केंद्र आहेत. म्हणजेच उर्वरित 3 लाख 1 हजार 195 चौरस किलोमीटर क्षेत्रासाठी अग्निशमन केंद्रच नाही.अग्निशमन तंत्रामध्ये वेगाने बदल होत आहे. मात्र तसा बदल करण्यासाठी अग्निशमन दलात पुरेसा वाव नाही. त्यांना सुविधा आणि मनुष्यबळदेखील उपलब्ध करून दिले जात नाही. शिवाय नागरिकांमध्ये जागृती, इमारतींची नियमित तपासणी, प्रशिक्षण, मॉकड्रीलचा उपयोग करणे असे याचिकेत सुनावण्यात आले होते.आगीच्या घटनांत महाराष्ट्र दुसरा : पालिकेने उभारावी आपत्ती निवारण यंत्रणा-नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या काळात बचावकार्य आणि आपत्ती निवारण कायद्यात सुसूत्रता यावी या साठी सरकारने महापालिका आणि नगरपालिका अग्निशमन दलाचे एकत्रिकरण करावे. त्याऐवजी अग्निशमन आणि आपत्ती निवारण यंत्रणा उभारावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. राज्यात दरवर्षी सरासरी 160 व्यक्तींचा मृत्यू आगीत होरपळून होतो. राज्यात 2008 ते 2012 या कालावधीत मुंबईत सर्वाधिक 236 आगीच्या घटना घडल्या होत्या. आगीच्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशात दुस-या स्थानी असल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.राज्यासह देशातील आगीच्या घटनांमध्ये ‘शॉर्ट सर्किट’ हे मुख्य कारण आहे. बांधकाम करताना अनेक कायदे आणि नियम पायदळी तुडविले जातात. आवश्यक मोकळी जागा सोडली जात नाही. पाण्याची टाकी, मोकळे व-हांडे योग्य पद्धतीने केले जात नाहीत. त्यामुळे सरकारने आपत्ती धोरण निश्चित केले पाहिजे. हॉटेल, मॉल, रुग्णालये, व्यावसायिक, औद्योगिक आस्थापना आणि निवासी भागासाठी अग्निशमन अधिकारी आणि निरीक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. असोसिएशनच्या अ‍ॅड. रितेश मेहता यांनी ही याचिका दाखल केली आहे.

टॅग्स :fireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दल