शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

'त्या' मानाच्या वारकऱ्याने एकादशीलाच विठुरायाच्या पंढरीत घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 12:24 IST

अरे, झालं ते वाईट, पण एकादशीच चांगल मरण आलं, असे शब्द आपण नेहमीच गावखेड्यात लोकांच्या तोंडून ऐकतो

सोलापूर - बस्स, एकदाचं पांडुरंगाच्या दरबारात डोळे मिटावं म्हणजे या जन्माचं सार्थक होईल, असे कित्येक वारकरी आषाढी वा कार्तिकी वारीत चालताना बोलून जातात. तर, जन्म अन् मृत्यू त्याच्या हातात आहे. त्यानं बोलावलं की जायचं, असे शब्द आपण नेहमीच ऐकतो. मात्र, देऊळगाव राजा तालुक्यातील एका वारकऱ्याला ऐन कार्तिकी एकादशीदिवशीच पांडुरंगाच्या दारी मरण आले. कार्तिकी वारीसाठी पंढरपुरात दाखल झाल्यानंतर सोमवारी वारकरी गणेशराव डोके यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यामुळे वारकरी संप्रदाय अन् गावकऱ्यांवर शोककळा पसरली आहे. 

अरे, झालं ते वाईट, पण एकादशीच चांगल मरण आलं, असे शब्द आपण नेहमीच गावखेड्यात लोकांच्या तोंडून ऐकतो. एखाद्याचे अकस्मात निधन झाल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. मात्र, त्यानंतर चर्चा होते ती निधनाची, त्या दिवसाची अन् मृत्युच्या कारणाची. देऊळगाव राजा येथील वारकरी गणेशराव डोके यांच्या मृत्युनंतरही अशीच चर्चा रंगली. कारण, गेल्या 35 वर्षांपासून न चुकता पंढरीची वारी करणाऱ्या गणेश डोके यांना विठ्ठलचरणीच मरण आले. योगायोग म्हणजे सन 2011 साली मानाचे वारकरी म्हणून पंढरपूर संस्थानाकडून गणेशराव डोकेंचा सपत्नीक सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गणेशराव आणि त्यांच्या पत्नी रुख्मीनीबाई यांना मानाचे वारकरी म्हणून गौरवले होते. डोके यांच्यारुपाने तालुक्याला प्रथमच हा मान मिळाला होता. त्यामुळे गावकऱ्यांनीही त्यांचा सत्कार केला होता. मात्र, आता 2018 साली कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर पंढरपुरात दाखल झाल्यानंतर ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर वारकरी संप्रदाय आणि गावावर शोककळा पसरली आहे. पण, निस्सीम पांडुरंग भक्ताच्या मृत्युचा हा दैवी योगायोग सर्वच ठिकाणी चर्चेचा विषय बनला.