शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

'सोलापूरकर सारख्या लोकांना गोळ्या घालून मारलं पाहिजे'; खासदार उदयनराजे भोसले संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 16:08 IST

खासदार उदयनराजे भोसले यांनी अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.

मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर ( Rahul Solapurkar ) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेबाबत मोठं विधान केलं आहे. या विधानावरुन आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून सुटण्यासाठी 'पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं, छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले', असा दावा सोलापूरकर यांनी केला. यावर आता खासदार छत्रपती उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale ) यांनी प्रतिक्रिया दिली असून संताप व्यक्त केला आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या विधानाचा निषेध व्यक्त केला. यावेळी बोलताना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले,  सर्वधर्म समभाव भावनेतून ज्यांनी सर्व समाजाला एक केले. एकता हा त्यामागचा एक मंत्र होता, राज्यकाराभारात लोकांचा सहभाग व्हावा. ज्या लोकशाहीमध्ये आपण वावरतो त्या लोकशाहीचा पाया छत्रपती शिवाजी महाराज यांनी रचला. त्यांनी स्वत:चं कुटुंब कधी पाहिलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीच तडजोड केली नाही, त्यांच्याबद्दल गलिच्छ विधान केली जातात. दोन, तीन दिवसापूर्वी असंच एक विधान केले. या विधानामुळे अनेक शिवभक्तांना वेदना झाल्या. हा राहुल सोलापूरकर ( Rahul Solapurkar )  कोण आहे? अशी लोक काही लाच घेतात, त्यांनी लाचे पलिकडे काही समजत नाही. हे लोक बोलत असताना काहीही बोलतात. अशा लोकांच्या जिभा हासडल्या पाहिजेत. अशा लोकांना जनतेने दिसेल तिथे ठेचले पाहिजे, असा सांगत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale ) यांनी संताप व्यक्त केला. 

अशा लोकांमुळे समाजात तेढ निर्माण होतो

"अशा विकृत लोकांमुळे समाजात तेढ निर्माण होतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मी या संदर्भात बोलणार आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांचीही भेट घेऊन अशी विधान करतात त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मी करणार आहे.  छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जपले नाही तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. विकृत विधान करतात त्यांच्यामुळे समाजात तेढ निर्माण होतात. अशा लोकांना त्याच ठिकाणी ठेचलं पाहिजे, चित्रपट इंडस्ट्रीतील लोकांनी अशा लोकांना थारा दिला नाही पाहिजे, असंही खासदार छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले. 

खासदार उदयनराजे भोसले म्हणाले,"अशी विधान करणाऱ्या लोकांना गाडलं पाहिजे, यांना जर गाडलं नाही तर या देशाच्या अखंडतेचा प्रश्न आहे. मी त्यांचा निषेध करतो. मला असं वाटतं याला गोळ्या घालून मारलं पाहिजे. यालाच नाही तर अशी विधान करणाऱ्यांना गोळ्या घालून मारलं पाहिजे असं वाटतं, असंही उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale ) म्हणाले. 

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेBJPभाजपा