शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील जनतेला उष्णतेचा सर्वाधिक धोका; ७५% जिल्हे ‘हाय रिस्क’मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 12:03 IST

उष्णतेच्या लाटांमुळे २०३० पर्यंत भारतातील ३.५ कोटी पूर्णवेळ नोकऱ्या जाण्याची भीती असून, जीडीपीमध्ये ४.५ टक्के घट होण्याची भीतीही अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबई : भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ७६ टक्के लोक जिथे राहतात, अशा सुमारे ५७ टक्के जिल्ह्यांतील जनता ‘उच्च’ ते ‘खूप उच्च’ उष्णतेचा धोका सहन करत आहे. भारताच्या ३/४ लोकसंख्येला गंभीर उष्णतेचा धोका असून, महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि केरळातील तब्बल ७५ टक्क्यांपेक्षा अधिक जिल्हे उष्णतेच्या धोक्याच्या पातळीवर असल्याची धक्कादायक बाब ‘सीईईडब्ल्यू’ने केलेल्या अभ्यासात समोर आली आहे. 

उष्णतेच्या लाटांमुळे २०३० पर्यंत भारतातील ३.५ कोटी पूर्णवेळ नोकऱ्या जाण्याची भीती असून, जीडीपीमध्ये ४.५ टक्के घट होण्याची भीतीही अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबई, दिल्लीत सर्वाधिक धोकादायक वातावरणमुंबई, दिल्लीसारखी शहरे सर्वाधिक धोकादायक वातावरणाचा सामना करत आहेत. लोकसंख्येची घनता, दाट इमारती आणि सामाजिक-आर्थिक आणि आरोग्य समस्या उष्णतेचे धोके वाढवतात. उच्च तापमान आणि आरोग्य बिघडण्याच्या तक्रारी आंध्र प्रदेश, महाराष्ट्रात सर्वाधिक होत आहेत. ४१७  अति उच्च जोखीम श्रेणींमध्ये येत आहेत.

सर्वाधिक उष्णतेचा धोका येथे...दिल्ली, महाराष्ट्र, गोवा, केरळ, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश ही राज्ये सर्वाधिक उष्णतेचा धोका सहन करत आहेत. महाराष्ट्रातील विदर्भात उष्णतेबाबत अत्यंत संवेदनशील स्थिती आहे.

२०२४ हे भारतात आणि जागतिक स्तरावर आतापर्यंतचे सर्वात गरम वर्ष ठरले. २७-२८ फेब्रुवारी रोजी देशात पहिली उष्णतेची लाट आली.१,६६,००० हून अधिक लोकांचा मृत्यू १९९८ ते २०१७ दरम्यान उष्णतेच्या लाटांमुळे झाला आहे.४८,००० हून अधिक उष्माघाताचे रुग्ण १५९ जणांचा उष्माघातामुळे २०२४ मध्ये मृत्यू झाला.

रात्रीची थंडी गायब, उष्ण रात्री वेगाने वाढल्याचिंताजनक बाब म्हणजे, खूप उष्ण रात्रींची संख्या आणखी वाढत आहे, ज्यामुळे आरोग्य धोके निर्माण होत असून, गेल्या दशकात अतिशय उष्ण दिवसांपेक्षा रात्रींची संख्या वेगाने वाढत आहे.

अत्यंत उष्ण रात्रींमध्ये वाढ ही सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या (१० लाखांहून अधिक) जिल्ह्यांमध्ये दिसून येते. गेल्या दशकात, मुंबईत प्रत्येक उन्हाळ्यात १५ अतिरिक्त अति उष्ण रात्री, बंगळुरू (११), भोपाळ आणि जयपूर (प्रत्येकी ७), दिल्ली (६) आणि चेन्नई (४) अशी वाढ झाली आहे. 

रात्रीचे उच्च तापमान धोकादायक मानले जाते कारण शरीराला थंड होण्याची संधी मिळत नाही. थंड असलेल्या हिमालयीन भागामध्येही खूप उष्ण दिवस आणि खूप उष्ण रात्री वाढल्या आहेत. याचा परिणाम नाजूक पर्वतीय परिसंस्थांवर गंभीरपणे होऊ शकतो.  गर्भवती महिला, वृद्ध, लहान मुले, बाहेर काम करणारे मजूर, आणि दीर्घकालीन आजार असणारे रुग्ण यांना उषण्तेचा सर्वाधिक धोका आहे.

सर्वाधिक फटका कुणाला? : तीव्र आणि वारंवार येणाऱ्या उष्णतेच्या लाटा देशातील कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना संकटात टाकत आहेत. त्यांना बहुतेकदा पाणी आणि थंड पाण्याची कमतरता असते आणि कडक उन्हात काम करणाऱ्या कामगारांच्या सहनशक्तीची यावेळी परीक्षा असते.