शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगड फेकू नये- मुख्यमंत्री

By admin | Updated: July 21, 2016 05:44 IST

मला गृहखात्यातील काही कळतं की नाही, याचं मूल्यमापन जनताच करेल, पण राणे यांचा गृहखात्याचा अनुभव दांडगा आहे.

मुंबई : ‘मला गृहखात्यातील काही कळतं की नाही, याचं मूल्यमापन जनताच करेल, पण राणे यांचा गृहखात्याचा अनुभव दांडगा आहे. खालपासून वरपर्यंत त्यांना बरीच माहिती आहे,’ असा टोला लगावत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुन्हेगारीची आकडेवारी सांगत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांचे पुरते वस्त्रहरण केले. आपल्या तासभराच्या भाषणात विरोधकांवर मार्मिक टोलेबाजी करत, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगडफेक करू नये, असा इशारा द्यायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत. नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर झालेला अनन्वित अत्याचार आणि खुनाच्या घटनेसंदर्भात विधान परिषदेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी बुधवारी उत्तर दिले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँँग्रेस नेते नारायण राणे यांनी केलेल्या प्रत्येक आरोपांची त्यांनी मुद्देसूद चिरफाड केली. मुख्यमंत्री म्हणाले, ‘मी कोपर्डीला घटनास्थळी भेट दिली नाही, म्हणून माझ्या हेतूवर शंका घेऊ नका. नागपुरात ११५ गोवारी मृत्युमुखी पडले होते, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार तेथे गेले नाहीत, म्हणून ते असंवेदनशील होते, असा आरोप करणे योग्य होणार नाही. राजकीय भाषण मला देता येत नाही, पण झालेल्या आरोपांना उत्तर दिले नसते, तर लोकांना ते खरे वाटले असते. कोपर्डी प्रकरणावरून राज्यात दुफळी माजण्याची शक्यता असताना विधिमंडळाच्या दोन्ही सदनातून राज्याला एकमताने संदेश द्यायला हवा. राज्य पिडीतांच्या कुटुंबीयांसोबत आहे. नराधमांना फाशी होईलच, असे मुख्यमंत्री म्हणाले.राज्यात सध्या तीन मुख्यमंत्री आहेत, असा आरोप राणे यांनी केला होता. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात तीन ह्यसीएमह्ण नाहीत, मी एकच आहे आणि सक्षम आहे. तीन ह्यसीएमह्णची सवय तुम्हाला असेल. तुमच्यासारखा एक रवी इकडे आणि एक रवी तिकडे अशी गरज मला नाही, असा टोलाही त्यांनी राणेंना हाणला. आम्ही सुडाचे राजकारण करीत नाही. पण ईडी आणि सीआयडीच्या कारवाईला राणेंसारख्या सज्जन, सत्शील माणसाने का घाबरावे? असा तिरकस सवालही केला. भाजपाला गुंडांचा पक्ष म्हटले गेले. पण हे सांगतंय कोण? सिंधुदुर्गात कोणावर काय गुन्हे आहेत हे सांगितले, तर पार्टी आॅफ क्रिमीनल कोण आहे हे कळेल. खरे तर रमेश गोवेकरचे काय झाले, अंकुश राणेचे काय झाले, श्रीधर नाईक कुठे आहे, असे प्रश्न राणेंनी विचारायला हवे होते, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राणेंच्या गुन्ह्यांचा पाढाच वाचला. सिंधुदुर्गात राणेंच्या विरोधात दाखल गुन्ह्यांच्या कलमे वाचून दाखवितानाच ‘शिशे के घरो में रहने वाले, दुसरों के घरोंपर पत्थर नही फेका करते’, असा डायलॉगही मुख्यमंत्र्यांनी ऐकवला. भाषणात मुख्यमंत्र्यांनी राणे यांची अनेकदा फिरकी घेतली. राणेंना राग आल्यानंतर ते जे बोलतात ते फार गांभिर्याने घ्यायचे नसते. केंद्रातील काँग्रेस नेत्यांसह विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव यांना राणे यांनी काय म्हटले होते याचा पाढाच मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवला. (प्रतिनिधी)