शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगड फेकू नये- मुख्यमंत्री

By admin | Updated: July 21, 2016 05:44 IST

मला गृहखात्यातील काही कळतं की नाही, याचं मूल्यमापन जनताच करेल, पण राणे यांचा गृहखात्याचा अनुभव दांडगा आहे.

मुंबई : ‘मला गृहखात्यातील काही कळतं की नाही, याचं मूल्यमापन जनताच करेल, पण राणे यांचा गृहखात्याचा अनुभव दांडगा आहे. खालपासून वरपर्यंत त्यांना बरीच माहिती आहे,’ असा टोला लगावत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुन्हेगारीची आकडेवारी सांगत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांचे पुरते वस्त्रहरण केले. आपल्या तासभराच्या भाषणात विरोधकांवर मार्मिक टोलेबाजी करत, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगडफेक करू नये, असा इशारा द्यायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत. नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर झालेला अनन्वित अत्याचार आणि खुनाच्या घटनेसंदर्भात विधान परिषदेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी बुधवारी उत्तर दिले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँँग्रेस नेते नारायण राणे यांनी केलेल्या प्रत्येक आरोपांची त्यांनी मुद्देसूद चिरफाड केली. मुख्यमंत्री म्हणाले, ‘मी कोपर्डीला घटनास्थळी भेट दिली नाही, म्हणून माझ्या हेतूवर शंका घेऊ नका. नागपुरात ११५ गोवारी मृत्युमुखी पडले होते, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार तेथे गेले नाहीत, म्हणून ते असंवेदनशील होते, असा आरोप करणे योग्य होणार नाही. राजकीय भाषण मला देता येत नाही, पण झालेल्या आरोपांना उत्तर दिले नसते, तर लोकांना ते खरे वाटले असते. कोपर्डी प्रकरणावरून राज्यात दुफळी माजण्याची शक्यता असताना विधिमंडळाच्या दोन्ही सदनातून राज्याला एकमताने संदेश द्यायला हवा. राज्य पिडीतांच्या कुटुंबीयांसोबत आहे. नराधमांना फाशी होईलच, असे मुख्यमंत्री म्हणाले.राज्यात सध्या तीन मुख्यमंत्री आहेत, असा आरोप राणे यांनी केला होता. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात तीन ह्यसीएमह्ण नाहीत, मी एकच आहे आणि सक्षम आहे. तीन ह्यसीएमह्णची सवय तुम्हाला असेल. तुमच्यासारखा एक रवी इकडे आणि एक रवी तिकडे अशी गरज मला नाही, असा टोलाही त्यांनी राणेंना हाणला. आम्ही सुडाचे राजकारण करीत नाही. पण ईडी आणि सीआयडीच्या कारवाईला राणेंसारख्या सज्जन, सत्शील माणसाने का घाबरावे? असा तिरकस सवालही केला. भाजपाला गुंडांचा पक्ष म्हटले गेले. पण हे सांगतंय कोण? सिंधुदुर्गात कोणावर काय गुन्हे आहेत हे सांगितले, तर पार्टी आॅफ क्रिमीनल कोण आहे हे कळेल. खरे तर रमेश गोवेकरचे काय झाले, अंकुश राणेचे काय झाले, श्रीधर नाईक कुठे आहे, असे प्रश्न राणेंनी विचारायला हवे होते, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राणेंच्या गुन्ह्यांचा पाढाच वाचला. सिंधुदुर्गात राणेंच्या विरोधात दाखल गुन्ह्यांच्या कलमे वाचून दाखवितानाच ‘शिशे के घरो में रहने वाले, दुसरों के घरोंपर पत्थर नही फेका करते’, असा डायलॉगही मुख्यमंत्र्यांनी ऐकवला. भाषणात मुख्यमंत्र्यांनी राणे यांची अनेकदा फिरकी घेतली. राणेंना राग आल्यानंतर ते जे बोलतात ते फार गांभिर्याने घ्यायचे नसते. केंद्रातील काँग्रेस नेत्यांसह विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव यांना राणे यांनी काय म्हटले होते याचा पाढाच मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवला. (प्रतिनिधी)