शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

खासदार जलील यांच्यापर्यंत आमच्या वेदना पोहोचवाव्यात; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 15:47 IST

शेतकरी अडचणीत सापडला असताना सुद्धा जलील यांनी शेतकऱ्यांची साधी भेट सुद्धा घेतली नसल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले एमआयएम पक्षाचे एकमेव आमदार इम्तियाज जलील हरवले असल्याचे निवेदन नुकतेच औरंगाबाद जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. मतदारसंघात नागरी समस्या असताना जलील नेमके कुठे हरवले ? त्यांचा शोध लावण्याचे अनोखे पत्र वैजापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते रियाजोद्दीन शेख यांनी प्रशासनाला दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच एमआयएमचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर जलील यांची मोठ्याप्रमाणावर चर्चा झाली होती. त्यातच त्यांनी संसदेत मराठीत शपथ घेतल्याने त्यांचे अनेकांनी कौतुक सुद्धा केले. परंतु निवडून आल्यापासून जलील यांनी औरंगाबाद शहर सोडले तर मतदारसंघातील ग्रामीण भागात पाठ फिरवली असल्याचा आरोप होत आहे.

त्यामुळे वैजापूर येथील समाजिक कार्यकर्ते यांनी जलील हरवले असल्याचे निवदेन प्रशासनाला दिले आहे. जिल्ह्याचे खासदार पद भूषवताना जलील यांना ग्रामीण परिसराचा पूर्णपणे विसर पडला आहे. काही दिवसांपूर्वी वैजापूर तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच आता अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला असताना सुद्धा जलील यांनी शेतकऱ्यांची साधी भेट सुद्धा घेतली नसल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची भेट घेऊन नुकसानीची पाहणी करत आहे. मात्र असे असताना सुद्धा खासदार जलील कुठेच दिसत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे हरवलेल्या खासदार जलील यांची प्रशाकीय बैठकीदरम्यान भेट झाल्यास त्यांना आमच्या अडचणीचे पत्र पोचविण्यासाठीची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

 

 

 

 

 

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलPoliticsराजकारणAurangabadऔरंगाबाद