शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

खासदार जलील यांच्यापर्यंत आमच्या वेदना पोहोचवाव्यात; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 15:47 IST

शेतकरी अडचणीत सापडला असताना सुद्धा जलील यांनी शेतकऱ्यांची साधी भेट सुद्धा घेतली नसल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले एमआयएम पक्षाचे एकमेव आमदार इम्तियाज जलील हरवले असल्याचे निवेदन नुकतेच औरंगाबाद जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. मतदारसंघात नागरी समस्या असताना जलील नेमके कुठे हरवले ? त्यांचा शोध लावण्याचे अनोखे पत्र वैजापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते रियाजोद्दीन शेख यांनी प्रशासनाला दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच एमआयएमचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर जलील यांची मोठ्याप्रमाणावर चर्चा झाली होती. त्यातच त्यांनी संसदेत मराठीत शपथ घेतल्याने त्यांचे अनेकांनी कौतुक सुद्धा केले. परंतु निवडून आल्यापासून जलील यांनी औरंगाबाद शहर सोडले तर मतदारसंघातील ग्रामीण भागात पाठ फिरवली असल्याचा आरोप होत आहे.

त्यामुळे वैजापूर येथील समाजिक कार्यकर्ते यांनी जलील हरवले असल्याचे निवदेन प्रशासनाला दिले आहे. जिल्ह्याचे खासदार पद भूषवताना जलील यांना ग्रामीण परिसराचा पूर्णपणे विसर पडला आहे. काही दिवसांपूर्वी वैजापूर तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच आता अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला असताना सुद्धा जलील यांनी शेतकऱ्यांची साधी भेट सुद्धा घेतली नसल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची भेट घेऊन नुकसानीची पाहणी करत आहे. मात्र असे असताना सुद्धा खासदार जलील कुठेच दिसत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे हरवलेल्या खासदार जलील यांची प्रशाकीय बैठकीदरम्यान भेट झाल्यास त्यांना आमच्या अडचणीचे पत्र पोचविण्यासाठीची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

 

 

 

 

 

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलPoliticsराजकारणAurangabadऔरंगाबाद