शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

पेंग्विनचा निवारा निश्चित!

By admin | Updated: March 7, 2017 01:43 IST

मुंबई महापालिकेवर पुन्हा शिवसेनेचीच सत्ता आल्यामुळे राणीच्या बागेतील सात पेंग्विन आता मुंबईचेच रहिवाशी होणार हे स्पष्ट झाले

मुंबई : मुंबई महापालिकेवर पुन्हा शिवसेनेचीच सत्ता आल्यामुळे राणीच्या बागेतील सात पेंग्विन आता मुंबईचेच रहिवाशी होणार हे स्पष्ट झाले आहे़ त्यानुसार बर्फाळलेल्या प्रदेशातून स्वप्नाच्या मायानगरीत आल्यापासून सतत निगराणीखाली बंदिस्त कक्षात असलेल्या या पाहुण्यांना अखेर आठ महिन्यांनंतर हक्काचे घर मिळाले आहे़ प्रशस्त काचघरात आज सकाळी त्यांचे स्थलांतर झाल्यानंतर थोडी बावरलेली ही मंडळी लवकरच मुंबईकरांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहेत़दक्षिण कोरियातून हेम्बोल्ट जातीचे आठ पेंग्विन जुलै २०१६ मध्ये मुंबईत आणण्यात आले़ मात्र एका पेंग्विनचा आॅक्टोबर महिन्यात आतड्यांच्या संसर्गामुळे मृत्यू झाला़ याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले़ यामुळे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयात प्राण्यांच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला़ मुंबई महापालिका निवडणुकीच्या काळात हा मुद्दा विरोधकांनी पेटवत पेंग्विनची रवानगी त्यांच्या मायदेशी करण्याचा दबाव टाकण्यात आला़पेंग्विनच्या मुद्दावरुन असे राजकारण पेटले असताना राणीच्या बागेत या पाहुण्यांसाठी विशेष कक्ष तयार करण्यातही दिरंगाई होत होती़ प्रशस्त काचघर तयार करुन पेंग्विनसाठी अनुकूल वातावरण तयार करण्यात बराच काळ लागला़ यामुळे या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन निवडणुकीपूर्वी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्नही फसला़ निवडणुकांनंतर या कामांनाही वेग आला असून काचघर तयार झाले आहे़ त्यानुसार या काचघरात सात पेंग्विनना आज सकाळी ६ वाजता हलविण्यात आले़ > नवीन घरात पाहुणे बावरलेबर्फाच्या गोळ्यासारखे पण तितकेच लोभस रुप असलेले हे पेंग्विन राणीच्या बागेतील एका छोट्याशा जागेत गेले आठ महिने राहत होते़ पेंग्विनवरुन मुंबईत वाद रंगले असताना ते मात्र यापासून बेखबर आपल्या नवीन घरात वावरत होते़ हळुहळू ते तिथे रुळायला लागले होते़ त्यामुळे आज नवीन काचघरात त्यांना हलविल्यानंतर काही क्षणांसाठी ते बावरले होते़ पण काही दिवसांतच ते या प्रशस्त काचघरातही रुळतील़, असा विश्वास राणीबागेचे संचालक डॉ़ संजय त्रिपाठी यांनी सांगितले़उद्घाटन सोहळ्याची अनिश्चिततामहत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या या पेंग्विनचे दर्शन मुंबईकरांना निवडणूक पूर्वीच घडविण्याचे शिवसेनेचे स्वप्न होते़ मात्र अनंत अडचणींमुळे हा उद्घाटन सोहळा तीनवेळा लांबणीवर पडला़ गेल्याच आठवड्यात मावळत्या स्थायी समितीच्या सदस्यांनी राणीबागेची पाहणी केली़ स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष यशोधर फणसे आणि सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव हे दोघे निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे त्यांच्या कारर्कीदीची मुदत संपण्याआधी हा उद्घाटन सोहळा होण्यासाठी ते आग्रही होते़ मात्र पेंग्विन नवीन घरात जाऊन रुळेपर्यंत उद्घाटन नाहीच़, अशी भूमिका प्रशासनाने घेतली़ त्यामुळे शिवसेनेच्या या शिलेदारांचा हिरमोड झाला़असे आहे नवे काचघर : या पेंग्विनचे आता कायमस्वरुपी घर असलेल्या राणीबागेतील काचघर १८ हजार चौरस फुटांचे आहे़ यामध्ये पेंग्विनना मुक्त विहार करण्यासाठी चारशे चौरस फुटांचा तलाव आहे़ २० पेंग्विन राहू शकतील, एवढी ही जागा असल्याने त्यांची गैरसोय होणार नाही, अशी खात्री महापालिकेने दिली आहे़ तसेच या ठिकाणी स्वयंपाकघर व पेंग्विनना जेवण देण्यासाठी फिडींग एरिया असणार आहे़ एक ते दोन वर्षे वय असलेल्या या पेंग्विनचे वजन सुमारे एक ते अडीच किलो एवढे आहे़ सद्यस्थितीत १२ ते १५ सें़मी़ उंची असलेल्या या पक्ष्यांची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्यांची उंची सुमारे ६५ ते ७० सें़मी़ इतकी होईल़त्यावेळीस त्यांचे वजन चार ते सहा कि़लो इतके असू शकेल़ त्यांचे आयुर्मान २० ते २५ वर्षे असते़