शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

पेंग्विनचा निवारा निश्चित!

By admin | Updated: March 7, 2017 01:43 IST

मुंबई महापालिकेवर पुन्हा शिवसेनेचीच सत्ता आल्यामुळे राणीच्या बागेतील सात पेंग्विन आता मुंबईचेच रहिवाशी होणार हे स्पष्ट झाले

मुंबई : मुंबई महापालिकेवर पुन्हा शिवसेनेचीच सत्ता आल्यामुळे राणीच्या बागेतील सात पेंग्विन आता मुंबईचेच रहिवाशी होणार हे स्पष्ट झाले आहे़ त्यानुसार बर्फाळलेल्या प्रदेशातून स्वप्नाच्या मायानगरीत आल्यापासून सतत निगराणीखाली बंदिस्त कक्षात असलेल्या या पाहुण्यांना अखेर आठ महिन्यांनंतर हक्काचे घर मिळाले आहे़ प्रशस्त काचघरात आज सकाळी त्यांचे स्थलांतर झाल्यानंतर थोडी बावरलेली ही मंडळी लवकरच मुंबईकरांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहेत़दक्षिण कोरियातून हेम्बोल्ट जातीचे आठ पेंग्विन जुलै २०१६ मध्ये मुंबईत आणण्यात आले़ मात्र एका पेंग्विनचा आॅक्टोबर महिन्यात आतड्यांच्या संसर्गामुळे मृत्यू झाला़ याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले़ यामुळे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयात प्राण्यांच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला़ मुंबई महापालिका निवडणुकीच्या काळात हा मुद्दा विरोधकांनी पेटवत पेंग्विनची रवानगी त्यांच्या मायदेशी करण्याचा दबाव टाकण्यात आला़पेंग्विनच्या मुद्दावरुन असे राजकारण पेटले असताना राणीच्या बागेत या पाहुण्यांसाठी विशेष कक्ष तयार करण्यातही दिरंगाई होत होती़ प्रशस्त काचघर तयार करुन पेंग्विनसाठी अनुकूल वातावरण तयार करण्यात बराच काळ लागला़ यामुळे या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन निवडणुकीपूर्वी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्नही फसला़ निवडणुकांनंतर या कामांनाही वेग आला असून काचघर तयार झाले आहे़ त्यानुसार या काचघरात सात पेंग्विनना आज सकाळी ६ वाजता हलविण्यात आले़ > नवीन घरात पाहुणे बावरलेबर्फाच्या गोळ्यासारखे पण तितकेच लोभस रुप असलेले हे पेंग्विन राणीच्या बागेतील एका छोट्याशा जागेत गेले आठ महिने राहत होते़ पेंग्विनवरुन मुंबईत वाद रंगले असताना ते मात्र यापासून बेखबर आपल्या नवीन घरात वावरत होते़ हळुहळू ते तिथे रुळायला लागले होते़ त्यामुळे आज नवीन काचघरात त्यांना हलविल्यानंतर काही क्षणांसाठी ते बावरले होते़ पण काही दिवसांतच ते या प्रशस्त काचघरातही रुळतील़, असा विश्वास राणीबागेचे संचालक डॉ़ संजय त्रिपाठी यांनी सांगितले़उद्घाटन सोहळ्याची अनिश्चिततामहत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या या पेंग्विनचे दर्शन मुंबईकरांना निवडणूक पूर्वीच घडविण्याचे शिवसेनेचे स्वप्न होते़ मात्र अनंत अडचणींमुळे हा उद्घाटन सोहळा तीनवेळा लांबणीवर पडला़ गेल्याच आठवड्यात मावळत्या स्थायी समितीच्या सदस्यांनी राणीबागेची पाहणी केली़ स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष यशोधर फणसे आणि सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव हे दोघे निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे त्यांच्या कारर्कीदीची मुदत संपण्याआधी हा उद्घाटन सोहळा होण्यासाठी ते आग्रही होते़ मात्र पेंग्विन नवीन घरात जाऊन रुळेपर्यंत उद्घाटन नाहीच़, अशी भूमिका प्रशासनाने घेतली़ त्यामुळे शिवसेनेच्या या शिलेदारांचा हिरमोड झाला़असे आहे नवे काचघर : या पेंग्विनचे आता कायमस्वरुपी घर असलेल्या राणीबागेतील काचघर १८ हजार चौरस फुटांचे आहे़ यामध्ये पेंग्विनना मुक्त विहार करण्यासाठी चारशे चौरस फुटांचा तलाव आहे़ २० पेंग्विन राहू शकतील, एवढी ही जागा असल्याने त्यांची गैरसोय होणार नाही, अशी खात्री महापालिकेने दिली आहे़ तसेच या ठिकाणी स्वयंपाकघर व पेंग्विनना जेवण देण्यासाठी फिडींग एरिया असणार आहे़ एक ते दोन वर्षे वय असलेल्या या पेंग्विनचे वजन सुमारे एक ते अडीच किलो एवढे आहे़ सद्यस्थितीत १२ ते १५ सें़मी़ उंची असलेल्या या पक्ष्यांची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्यांची उंची सुमारे ६५ ते ७० सें़मी़ इतकी होईल़त्यावेळीस त्यांचे वजन चार ते सहा कि़लो इतके असू शकेल़ त्यांचे आयुर्मान २० ते २५ वर्षे असते़