शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

चोटी गँग ! कल्याणमध्येही विद्यार्थिनीला बेशुद्ध करुन कापले केस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 19:37 IST

उत्तर प्रदेश, हरियाणा, भिवंडी, नालासोपारा, डोंबिवलीपाठोपाठ चोटी गँग मुंबईतही आल्याने महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. कल्याण-शहराच्या पूर्व भागातील गोविंदवाडी परिसरात राहणा-या 14 वर्षीय शाळकरी मुलीचे शुक्रवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास केस कापण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.

कल्याण, दि. 19 -उत्तर प्रदेश, हरियाणा, भिवंडी, नालासोपारा, डोंबिवलीपाठोपाठ चोटी गँग मुंबईतही आल्याने महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. कल्याण-शहराच्या पूर्व भागातील गोविंदवाडी परिसरात राहणा-या 14 वर्षीय शाळकरी मुलीचे शुक्रवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास केस कापण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. या शाळकरी मुलीचे नाव सपना गुप्ता आहे. ती इयत्ता आठवीच्या वर्गात शिकते आहे. शुक्रवारी रात्री ती घरातील एक खोलीत अभ्यास करीत होती. तेव्हा ती अचानक बेशुद्ध पडली. ती बेशुद्ध पडल्याने तिच्या भावाचे तिच्याकडे लक्ष्य गेले. त्यावेळी तिचे केस कापण्यात आल्याचे त्याच्या निदर्शनास आले.  त्याने तिच्या तोंडावर पाणी मारुन तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या घटनेमुळे गोविंदवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी डोंबिवलीतील पिसवली व कल्याण मलंग रोडवर केस कापण्याचे दोन घटना घडलेल्या आहे. केस कापण्याच्या घटनांचे सत्र कल्याणमध्ये सुरुच आहे. 

‘चोटी गँग’ आता मुंबईतही

दरम्यान,  उत्तर प्रदेश, हरियाणा, भिवंडी, नालासोपारा, डोंबिवलीपाठोपाठ चोटी गँग मुंबईतही आल्याने महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. रात्रीच्या अंधारात मुंबईतील तीन महिलांचे केस कापण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.भायखळा येथील मदनपुरा परिसरात फरिदा शेख (३९) मुलीसोबत राहतात. १२ आॅगस्ट रोजी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास त्या घरात झोपल्या असताना अंगावरून काहीतरी सळसळत जात असल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी लाइट लावून पाहताच त्यांचे अर्धे केस कोणीतरी कापल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरड करताच शेजारी राहत असलेला अकबर हा भाऊ धावून आला. त्याने घराबाहेर आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे कोणीच नव्हते. या प्रकरणी अकबरने आग्रीपाडा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.अशीच एक घटना १५ ऑगस्टला घडली. आग्रीपाडा येथील कालापाणी परिसरात रोशन खातुम (४०) राहतात. त्या घराबोहर झोपल्या होत्या. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांना जाग आली. त्यांनी डोक्यावरून हात फिरवला तेव्हा हातात अर्धवट कापलेली वेणी आल्याने त्यांनी घाबरून आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकताच पती नदिम घराबाहेर आले. मात्र तिथे कोणीच नव्हते. या प्रकरणी त्यांनीही आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. असाच एक प्रकार १६ आॅगस्टला वडाळ्यात घडला. अनिता शर्मा केस विंचरत असताना त्यांच्या डोळ्यांसमोर अंधार आला. त्या झोपून उठल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की कोणीतरी त्यांची वेणी कापून टाकली आहे. या घटनांमुळे अफवांचे पीक आले आहे.>अफवांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. घडलेल्या घटनांचा सखोल सुरू असून लवकरच सत्य उजेडात येईल, असे पोलिसांनी सांगितले.>अंधश्रद्धा किंवा विकृतीअंधश्रद्धा, किंवा विकृतीतून या घटना घडत असल्याचा संशय पोलिसांना आहे. या घटना कितपत खºया आहेत याची शहानिशा सुरू आहे.