शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

चोटी गँग ! कल्याणमध्येही विद्यार्थिनीला बेशुद्ध करुन कापले केस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 19:37 IST

उत्तर प्रदेश, हरियाणा, भिवंडी, नालासोपारा, डोंबिवलीपाठोपाठ चोटी गँग मुंबईतही आल्याने महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. कल्याण-शहराच्या पूर्व भागातील गोविंदवाडी परिसरात राहणा-या 14 वर्षीय शाळकरी मुलीचे शुक्रवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास केस कापण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.

कल्याण, दि. 19 -उत्तर प्रदेश, हरियाणा, भिवंडी, नालासोपारा, डोंबिवलीपाठोपाठ चोटी गँग मुंबईतही आल्याने महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. कल्याण-शहराच्या पूर्व भागातील गोविंदवाडी परिसरात राहणा-या 14 वर्षीय शाळकरी मुलीचे शुक्रवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास केस कापण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. या शाळकरी मुलीचे नाव सपना गुप्ता आहे. ती इयत्ता आठवीच्या वर्गात शिकते आहे. शुक्रवारी रात्री ती घरातील एक खोलीत अभ्यास करीत होती. तेव्हा ती अचानक बेशुद्ध पडली. ती बेशुद्ध पडल्याने तिच्या भावाचे तिच्याकडे लक्ष्य गेले. त्यावेळी तिचे केस कापण्यात आल्याचे त्याच्या निदर्शनास आले.  त्याने तिच्या तोंडावर पाणी मारुन तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या घटनेमुळे गोविंदवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी डोंबिवलीतील पिसवली व कल्याण मलंग रोडवर केस कापण्याचे दोन घटना घडलेल्या आहे. केस कापण्याच्या घटनांचे सत्र कल्याणमध्ये सुरुच आहे. 

‘चोटी गँग’ आता मुंबईतही

दरम्यान,  उत्तर प्रदेश, हरियाणा, भिवंडी, नालासोपारा, डोंबिवलीपाठोपाठ चोटी गँग मुंबईतही आल्याने महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. रात्रीच्या अंधारात मुंबईतील तीन महिलांचे केस कापण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.भायखळा येथील मदनपुरा परिसरात फरिदा शेख (३९) मुलीसोबत राहतात. १२ आॅगस्ट रोजी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास त्या घरात झोपल्या असताना अंगावरून काहीतरी सळसळत जात असल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी लाइट लावून पाहताच त्यांचे अर्धे केस कोणीतरी कापल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरड करताच शेजारी राहत असलेला अकबर हा भाऊ धावून आला. त्याने घराबाहेर आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे कोणीच नव्हते. या प्रकरणी अकबरने आग्रीपाडा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.अशीच एक घटना १५ ऑगस्टला घडली. आग्रीपाडा येथील कालापाणी परिसरात रोशन खातुम (४०) राहतात. त्या घराबोहर झोपल्या होत्या. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांना जाग आली. त्यांनी डोक्यावरून हात फिरवला तेव्हा हातात अर्धवट कापलेली वेणी आल्याने त्यांनी घाबरून आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकताच पती नदिम घराबाहेर आले. मात्र तिथे कोणीच नव्हते. या प्रकरणी त्यांनीही आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. असाच एक प्रकार १६ आॅगस्टला वडाळ्यात घडला. अनिता शर्मा केस विंचरत असताना त्यांच्या डोळ्यांसमोर अंधार आला. त्या झोपून उठल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की कोणीतरी त्यांची वेणी कापून टाकली आहे. या घटनांमुळे अफवांचे पीक आले आहे.>अफवांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. घडलेल्या घटनांचा सखोल सुरू असून लवकरच सत्य उजेडात येईल, असे पोलिसांनी सांगितले.>अंधश्रद्धा किंवा विकृतीअंधश्रद्धा, किंवा विकृतीतून या घटना घडत असल्याचा संशय पोलिसांना आहे. या घटना कितपत खºया आहेत याची शहानिशा सुरू आहे.