शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

फरसबीसह वाटाणा गेला शंभरीपार; उकाड्यामुळे दर वाढले, गवार झाली स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 09:14 IST

तीव्र उकाड्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी होऊ लागल्याने दर वाढत आहेत.

नवी मुंबई : तीव्र उकाड्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली असून, बाजारभाव वाढू लागले आहेत. फरसबीसह वाटाण्याचे दर प्रतिकिलो शंभरच्या पुढे गेले असून टोमॅटो, कारलीचे दरही वाढले आहेत. गवारचे दर मात्र नियंत्रणात आले असल्याचे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आधीच महागाईने कंबरडे मोडले असताना भाजीपाल्याच्या दरात झालेली वाढ सामान्यांचा खिसा रिकामा करीत आहे.  

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी ५९२ ट्रक व टेम्पोमधून २७१८ टन भाजीपाल्याची आवक झाली असून, जवळपास ५ लाख जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. एक महिन्यापूर्वी होलसेल मार्केटमध्ये फरसबी ४० ते ६० रुपये किलो दराने विकले जात होते, त्याचे दर ६० ते १०० रुपये झाले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये फरसबी १२० रुपये किलोवर गेली आहे. वाटाणाही किरकोळ मार्केटमध्ये १०० रुपये किलो दराने विकला जात आहे. गवारचे दर ६० ते ८० वरून ३० ते ६० रुपयांवर आले आहेत. भेंडीचे दरही नियंत्रणात आहेत. तीव्र उकाड्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी होऊ लागल्याने दर वाढत आहेत. गवार व इतर काही भाज्यांची आवक जास्त असल्यामुळे त्यांचे दर कमी झाल्याचे व्यापारी स्वप्निल घाग यांनी दिली आहे.

एपीएमसी व किरकोळ बाजारातील बाजारभाव 

वस्तू       २७ मार्च       २७ एप्रिल     २७ एप्रिल किरकोळबीट       ८ ते१२       १० ते २०      ४०फरसबी       ४० ते ६०      ६० ते १००      १२०फ्लॉवर       ८ ते १२       १० ते २०       ६०कारली       २० ते ३०      २६ ते ३६      ५० ते ६०टोमॅटो       १० ते १४      १४ ते २२      ४० ते ५० वाटाणा     ३५ ते ५५       ६० ते ८०