शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

खासगी बँकांंकडील पीककर्जही माफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 06:42 IST

कृषी कर्जमाफी योजना; आधार कार्ड प्रमाणीकरण अनिवार्य

- अतुल कुलकर्णी मुंबई : महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेतंर्गत राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती, ग्रामीण बँकांबरोबरच खासगी बँकांकडील २ लाख रुपयांपर्यंतचे अल्पमुदतीचे पीककर्जही माफ होणार आहे.शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी बैठक झाली. सहकार मंत्री जयंत पाटील, मंत्री अनिल परब, मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते. याआधी भाजप सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत खाजगी बँकांचा समावेश नव्हता. आता अशा बँकांचा समावेश झाल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. नव्या कर्जमुक्ती योजनेमुळे राज्यातील ३० लाख शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न करणे अनिवार्य आहे. ज्यांची खाती आधार कार्डाशी संलग्न नसतील अशा कर्जखात्यांची यादी ७ जानेवारी पर्यंत प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपले कर्जखाते आधारसंलग्न करुन घ्यायचे आहे. ही प्रक्रिया राबविताना शेतकºयांना शासकीय यंत्रणेने वेठीला धरू नये, अशा शब्दात मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना बजावले आहे. या आधीची कर्जमाफीची योजना बँका जी माहिती देतील त्यावर आधारित होती, मात्र ही योजना राज्यातील महसूल विभागाने राबवायची आहे. आधार प्रमाणीकरणासाठी इंटरनेटची आवश्यकता असून ज्या दुर्गम भागात इंटरनेट सुविधा नाही अशा गावातील शेतकऱ्यांना नजिकच्या गावात न्यावे. तेथील ‘आपले सरकार’ केंद्रावर आधार प्रमाणिकरण आणि अन्य बाबी पूर्ण कराव्यात. त्यासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागणार नाही म्हणून बसची व्यवस्था करा, एकाच दिवशी असे जेवढे शेतकरी असतील त्यांना बसमध्ये बसवून न्या, त्यांचे आधार लिंक करा आणि परत त्यांना गावात आणून सोडा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले....तर बँकावर देखील कारवाई करू - अजित पवारबँकांनी पीक कर्जाऐवजी अन्य कर्ज खात्याची यादी दिली तर तशा याद्या देणाºया बँक अधिकाºयांवर तसेच शेतकºयांची चुकीची यादी देणाºया जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँकांवर कारवाई करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.कोणत्या प्रकारचे कर्ज माफ होणार?हंगामी पीक कर्ज व किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत देण्यात आलेले २ लाख रुपयांपर्यंतचे अल्प मुदत पीक कर्ज, तसेच मध्यम मुदत कर्जात रुपांतरित केलेले अल्प मुदत पीक कर्ज जे पुनर्गठित केलेले असेल. यात सोने तारण ठेवून घेतलेल्या पीक कर्जाचा अंतर्भाव करण्यात आलेला नाही.शेतकºयांना सन्मानाने वागवाशेतकºयांना कर्जमुक्त करताना कुठलीही अट नको. त्यांना रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. सन्मानाने कर्जमुक्तीचा लाभ मिळावा याकरिता महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आखली आहे हे त्यांना कळू द्या, ही योजना राबविताना महसूल यंत्रणेची मोठी जबाबदारी आहे. यंत्रणांनी शेतकºयांना आपुलकीची वागणूक द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.कोणत्या काळातील कर्ज माफ होईल?१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत वितरीत केलेले कर्ज.३० सप्टेंबर २०१९ अखेर थकीत (मुद्दल + व्याज) व परतफेड न केलेले कर्ज.पुनर्गठित कर्ज१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत वितरीत केलेले अल्प मुदत पीक कर्ज३१ मार्च २०१९ अखेर मध्यम मुदत कर्जात रुपांतरित कर्ज.पुनर्गठित कर्जाचे दि.३० सप्टेंबर २०१९ अखेर थकीत (मुद्दल+व्याज मिळून) आणि परतफेड न झालेले हप्ते.

टॅग्स :Farmerशेतकरी