शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत मिळणार पीककर्ज

By admin | Updated: June 22, 2015 02:32 IST

राज्यात ज्या जिल्हा बँका बंद आहेत तेथील पीककर्जाची जबाबदारी यापूर्वीच राष्ट्रीयीकृत बँकांकडे सोपविण्यात आली आहे. ज्या जिल्हा बँकांची आर्थिक

पुणे : राज्यात ज्या जिल्हा बँका बंद आहेत तेथील पीककर्जाची जबाबदारी यापूर्वीच राष्ट्रीयीकृत बँकांकडे सोपविण्यात आली आहे. ज्या जिल्हा बँकांची आर्थिक स्थिती वाईट आहे तेथीलही पीककर्जाची जबाबदारी राष्ट्रीयीकृत बँकांनी उचलावी, असे शासनाचे म्हणणे आहे. बँकांच्या २४ जूनच्या बैठकीत याबाबत निर्णय होणार आहे. नागपूर, वर्धा व बुलढाणा या जिल्हा बँका बंद असल्याने तेथील कर्जवाटप राष्ट्रीयीकृत बँका करतात. यावर्षी बीड, उस्मानाबाद, धुळे, नंदूरबार, सोलापूर, जालना या जिल्हा बँकांचा पीक कर्जाचा भारही राष्ट्रीयीकृत बँकांनी उचलावा, असा प्रस्ताव आहे. याबाबत या बँकांनी अद्याप तयारी दर्शविलेली नाही. गतवर्षी राज्यात ३९ हजार ४०० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्याच्या तुुलनेत ३४ हजार १०० कोटी रुपयांचे वाटप झाले. हे प्रमाण ८६ टक्के आहे. मात्र, काही राष्ट्रीयीकृत बँका या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करतात, अशा तक्रारी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अशा बँकांवर फौजदारी कारवाईचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीयीकृत बँका धास्तावल्या आहेत. सरकार पीक कर्जाची हमी बँकांना देत नाही. पीक कर्जाच्या व्याजातील सवलतीचे या बँकांचे पैसेही शासनाकडे थकीत आहेत. दुसरीकडे सरकार कर्जवाटपाचे उद्दिष्ट वाढवून ते साध्य न झाल्यास गुन्हेही दाखल करण्याचा इशारा देते. यामुळे काही बँकांत नाराजीचाही सूर आहे. सरकारच्या या भूमिकेने राष्ट्रीयीकृत बँकांवरील पीककर्जासंदर्भातील दबाव वाढला आहे. (प्रतिनिधी)