शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शहरात शांतता राखावी

By admin | Updated: September 14, 2015 02:22 IST

अहिंसावादी जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वात शहरातील कत्तलखाने बंद करण्यासाठी या समाजातील लोकांनी कोणतीही मागणी अथवा अर्ज केला नसताना त्याचे राजकीय भांडवल मात्र काही

भार्इंदर : अहिंसावादी जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वात शहरातील कत्तलखाने बंद करण्यासाठी या समाजातील लोकांनी कोणतीही मागणी अथवा अर्ज केला नसताना त्याचे राजकीय भांडवल मात्र काही असंतुष्ट गट करत आहेत. त्याला शहरवासीयांनी भीक घालू नये. शहरात शांतता राखावी, असे आवाहन शनिवारी मीरा रोड येथे आयोजित सर्वपक्षीय सभेत करण्यात आले. यावेळी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, काँग्रेस आमदार मुझफ्फर हुसेन, राष्ट्रवादीचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा, मनसे उपाध्यक्ष अरुण कदम, खाटिक समाजाचे नेते हाजी अराफत शेख उपस्थित होते.आमदार सरनाईक यांनी सांगितले की, ‘शहरात नयानगर ही मुस्लिमबहुल लोकवस्ती असतानाही १९९३ मध्ये दोन गटांत झालेल्या दंगलीतदेखील शहरात शांतता होती, हे श्रेय येथील सर्व धर्मांतील लोकांसह त्या वेळच्या स्थानिक राजकीय नेत्यांना जाते. यंदा मात्र नवख्या सत्तापिपासू नेत्यांना शहरात धार्मिक तेढ निर्माण करायची आहे.’ माजी आमदार मेंडोन्सा म्हणाले, ‘यापूर्वीच्या आघाडीच्या सत्ताकाळात असा प्रकार कधीच घडला नव्हता. परंतु, यंदा मात्र त्याला सुरुवात झाली असल्याने त्याचे वाईट परिणाम ओळखून शहरात शांतता कायम ठेवावी,’ मनसे उपाध्यक्ष कदम यांनी सांगितले, ‘आपल्या नगरसेवकपदाच्या काळात अनेकदा कत्तलखाने बंदीवरील प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी आले होते. सर्वपक्षीयांनी धर्माचा आदर करीत त्याला शासकीय आदेशान्वये मंजुरी दिली.’ (प्रतिनिधी)