शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

'राजकारणात शरद पवारांची स्ट्रेंथ केवळ पन्नास आमदारांपुरतीच...!'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 11:50 IST

नव्या घडामोडींची पार्श्वभूमीवर माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचा आरोप; पत्रकान्वये साधला राष्ट्रवादीवर निशाणा

ठळक मुद्देअनुभवी प्रशासनाची माहिती असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेससारख्या भक्कम विरोधी पक्षाची लोकशाही राज्याला खरी गरजविधानसभेच्या आठ निवडणुका जर पाहिल्या तर पवारांची स्ट्रेंथ ५० आमदारांचीच असल्याचा आरोप

सोलापूर : अनुभवी प्रशासनाची माहिती असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेससारख्या भक्कम विरोधी पक्षाची लोकशाही राज्याला खरी गरज आहे. यापुढेही सतत दहा वर्षे असा अनुभवी, जागरूक विरोधी पक्षच लोकशाहीला मजबूत करेल, अशी मतदारांची अपेक्षा आहे. अर्थात १९७८ पासून शरद पवारांची सरासरी ५० आमदारांचीच स्ट्रेंथ आहे. त्या ५० मध्ये देखील १५ आमदार राजकारणातले संस्थानिक असून, वडिलार्जित सात-बारा समजूनच सातत्याने निवडून येतात. अर्थात विधानसभेच्या आठ निवडणुका जर पाहिल्या तर पवारांची स्ट्रेंथ ५० आमदारांचीच असल्याचा आरोप राज्याचे माजी मंत्री प्रा़ लक्ष्मणराव ढोबळे यांनी पत्रकान्वये केला आहे.

मुरब्बी अन् शेवाळलेल्या नेतृत्वाच्या हाती विरोधी बाकावर बसण्याची जबाबदारी मतदारांनी टाकली असून, लोकशाही अधिक समृद्ध झाल्याचेच लक्षण आहे़ कारण गेल्या पाच वर्षांत विरोधी पक्ष अतिशय कमकुवत होता़ मुद्यांऐवजी गुद्यांवर येण्यासाठी धडपडत होता, विचारापेक्षा गोंधळाकडे त्याचा कल असायचा़ परंतु आज सर्वच पक्षांकडे अभ्यासू आमदारांची संख्या जोरदार असून, उद्धव ठाकरेंनी बारामतीला जुळवून घेतले तर १९७८ पासून २०१९ पर्यंत ५० आमदारांचे अ‍ॅव्हरेज असलेला पक्ष शरद पवारांनी मोठ्या कष्टाने सांभाळला आहे, असे ते म्हणाले.

तामिळनाडूच्या जयललिता, आंध्रचे चंद्राबाबू तर बंगालच्या ममता दीदी असो स्वत:च्या कष्टावर त्यांनी राज्य आणले. परंतु धरणीमातेच्या सेवेसाठी राज्य राखण्यापेक्षा राज्य अडचणीत आणण्याचा कार्यक्रम पवारांनी मोठ्या खुबीने राबवला आहे़ राष्ट्रवादी पक्ष आणि त्यातले नेते सन्मानासाठी गर्दी करणारे असून, भाजपने राष्ट्रवादीच्या सन्मानासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष करून पवारांचा सन्मानच केला आहे़ ईडीची चौकशी झाली आणि राष्ट्रवादीला १५ आमदारांचे बळ मिळाले. राष्ट्रवादी आमदाराच्या काही माफक अपेक्षा आहेत़ सत्ता सांभाळणारे साखर कारखाने, त्यांचा साखर संघ, अनेक संस्थांचे फेडरेशन, राजकारणाला आर्थिक ऊर्जा देणारी शिखर बँक, या शक्तिस्थळांना धक्का लागल्यामुळे डिवचलेले शरद पवार अधिक बिथरले आणि आदळआपट करीत राहिले़ अर्थात पवार परिवाराला सन्मान देऊन विधानसभेत नुसता इशारा केला तरी महत्त्वाच्या वेळेला सभात्याग होत राहील आणि सत्ताधाºयांकडून इशारा करताच आमदार सभात्याग करत राहतील. 

ईडीच्या नोटिसीने राष्ट्रवादीचे अधिक १५ आमदार निवडून आले. महाराष्ट्रातील मराठी तरुण बिथरले. आणखी एक-दोन पावसात पवार भिजून बोलले असते तर राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या वाढली असती. जनतेने आम्हाला विरोधी बाकावर बसण्याचा कौल दिलाय, असं सांगत राहतात तर दुसºया बाजूला बारामतीचा गूळ दाखवून संघर्षाचे राजकारण करतात़ सोशल मीडियामुळे आज कोणता पुढारी कसा वागतो, जातवार झालेल्या संघटनांना कोण कोणाला बळ देतो हे एका सेकंदात कळते. परंतु पहिल्याच निवडणुकीत सर्व समाज घटकाला न्याय देताना निवडणुका विकासकामावर झाल्या. लोकांनी सर्वांचे ऐकले आणि मतदान केंद्रात सात्विकपणाचे राजकारण केले. त्यामुळेच सर्वच पक्षांना भाजपच्या व्हिजनची आणि विकासकामाची भीती वाटते. कारण भारतीय जनता पक्षाकडे व्हिजन टँक आहे.  प्रधान कार्यालयात देशाच्या विकासाचा प्लॅन आहे. पुढच्या पन्नास वर्षात काय करायचे ते आधीच ठरलेले आहे. त्यामुळे शंभर वर्षांची परंपरा लाभलेला, अडीचशे देशांमध्ये कामाने स्वत:ची ओळख सांगणारा, कष्टावर, त्यागावर आणि राष्ट्राच्या अस्मितेवर पक्षाची व्यप्ती वाढवणारा भारतीय जनता पक्ष आहे. यासाठीच प्लॅन राज्याचा, जिल्ह्याचा, अगर गावाचा असो प्रत्येक भागाच्या विकासाचा प्लॅन आहे, म्हणून त्यांची संगत करण्यापेक्षा काम करणाºया पक्षांशी मैत्री करणे आणि निर्मळ पक्षाच्या सावलीत राहून देशाची सेवा करणे यातच सौख्य सामावले आहे़ 

शिवसेनेला संपविण्याचा डाव..- राऊत पवारांची जोडीच देशाचं भलं करू शकते, असे अजूनही मतदारांना वाटते. कारण २०१४ साली सत्तेचे परिवर्तन झाल्यानेच प्रफुल्लभाई पटेल यांनी एकतर्फी भाजपला पाठिंबा देऊन शिवसेनेच्या शिडीतली हवाच काढून घेतली. मोठ्या हुशारीने आणि अवजड मंत्र्याचा राजीनामा घेऊन शिवसेना केंद्रातूनही मोकळी झाली आहे. अर्थात शिवसेना बारीक झाल्याशिवाय राष्ट्रवादी मोठी होत नाही, हे महाराष्ट्राचे खरे गणित आहे. एकेकाळी भुजबळ यांना हाताशी धरून शिवसेनेत उभी फूट पडली होती. तेव्हा शिवसेना तू बोलली होती, असेही ढोबळे यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा