शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

पवारांच्या दौऱ्याने राष्ट्रवादीत उत्साह; काँग्रेसची स्थिती 'जैसे थे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 17:30 IST

राज्यातील अनेक जिल्ह्यात दोन्ही पक्षांमध्ये दिग्गज नेत्यांची पोकळी निर्माण झाली. यावर राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रा काढून काही प्रमाणात मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला. तर काँग्रेसने देखील नाना पटोले यांच्या नेतृत्वात पोलखोल यात्रा काढली. मात्र काँग्रेसच्या यात्रेचा प्रभाव फरसा पडला नाही.

मुंबई - लोकसभा निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात पक्षातून झालेल्या आउंटगोईंगनंतर पक्षाला सावरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार खुद्द मैदानात उतरले आहे. पवार सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करत आहेत. मात्र राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेला काँग्रेस पक्ष अजुनही सैरभैर असल्याचे दिसून येते.

लोकसभा निवडणुकीच्या एकतर्फी निकालानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात गळती लागली. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात दोन्ही पक्षांमध्ये दिग्गज नेत्यांची पोकळी निर्माण झाली. यावर राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रा काढून काही प्रमाणात मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला. तर काँग्रेसने देखील नाना पटोले यांच्या नेतृत्वात पोलखोल यात्रा काढली. मात्र काँग्रेसच्या यात्रेचा प्रभाव फरसा पडला नाही. तर राष्ट्रवादीची यात्रा बऱ्यापैकी चर्चेत आली. पण हे पुरसं नव्हतं.

दरम्यान राष्ट्रवादीची यात्रा सुरू असतानाच पवार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत. त्यांच्या सभांना प्रत्येक जिल्ह्यात मिळत असलेला प्रतिसाद देखील मोठा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी हा बुस्टर डोस ठरणार आहे. त्याचवेळी काँग्रेसची परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष बदलण्यात आले आहे. तर नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्षांना अद्याप फारसचा प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळे काँग्रेस स्पर्धेत आहे का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

त्यातच काँग्रेसचे विदर्भातील नेते आशिष देशमुख यांनी पक्षाला घरचा आहेर देताना प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि पाच कार्याध्यक्षांवर घणाघाती टीका केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात सारे काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे केवळ संगमनेरपुरते प्रदेशाध्यक्ष आहेत की काय, अशी चर्चा सुरू आहे, अशी टीका आशिष देशमुख यांनी केली. तसेच निवडण्यात आलेल्या पाच कार्याध्यक्षांच्या कार्यपद्धतीवरही देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे पवारांच्या दौऱ्याने राष्ट्रवादीत उत्साह निर्माण झाला असला तरी काँग्रेसमध्ये 'जैसे थे' स्थिती असल्याचे दिसून येते.