शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

पवारांच्या दौऱ्याने राष्ट्रवादीत उत्साह; काँग्रेसची स्थिती 'जैसे थे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 17:30 IST

राज्यातील अनेक जिल्ह्यात दोन्ही पक्षांमध्ये दिग्गज नेत्यांची पोकळी निर्माण झाली. यावर राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रा काढून काही प्रमाणात मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला. तर काँग्रेसने देखील नाना पटोले यांच्या नेतृत्वात पोलखोल यात्रा काढली. मात्र काँग्रेसच्या यात्रेचा प्रभाव फरसा पडला नाही.

मुंबई - लोकसभा निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात पक्षातून झालेल्या आउंटगोईंगनंतर पक्षाला सावरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार खुद्द मैदानात उतरले आहे. पवार सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करत आहेत. मात्र राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेला काँग्रेस पक्ष अजुनही सैरभैर असल्याचे दिसून येते.

लोकसभा निवडणुकीच्या एकतर्फी निकालानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात गळती लागली. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात दोन्ही पक्षांमध्ये दिग्गज नेत्यांची पोकळी निर्माण झाली. यावर राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रा काढून काही प्रमाणात मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला. तर काँग्रेसने देखील नाना पटोले यांच्या नेतृत्वात पोलखोल यात्रा काढली. मात्र काँग्रेसच्या यात्रेचा प्रभाव फरसा पडला नाही. तर राष्ट्रवादीची यात्रा बऱ्यापैकी चर्चेत आली. पण हे पुरसं नव्हतं.

दरम्यान राष्ट्रवादीची यात्रा सुरू असतानाच पवार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत. त्यांच्या सभांना प्रत्येक जिल्ह्यात मिळत असलेला प्रतिसाद देखील मोठा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी हा बुस्टर डोस ठरणार आहे. त्याचवेळी काँग्रेसची परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष बदलण्यात आले आहे. तर नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्षांना अद्याप फारसचा प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळे काँग्रेस स्पर्धेत आहे का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

त्यातच काँग्रेसचे विदर्भातील नेते आशिष देशमुख यांनी पक्षाला घरचा आहेर देताना प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि पाच कार्याध्यक्षांवर घणाघाती टीका केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात सारे काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे केवळ संगमनेरपुरते प्रदेशाध्यक्ष आहेत की काय, अशी चर्चा सुरू आहे, अशी टीका आशिष देशमुख यांनी केली. तसेच निवडण्यात आलेल्या पाच कार्याध्यक्षांच्या कार्यपद्धतीवरही देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे पवारांच्या दौऱ्याने राष्ट्रवादीत उत्साह निर्माण झाला असला तरी काँग्रेसमध्ये 'जैसे थे' स्थिती असल्याचे दिसून येते.