शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

पवारांच्या दौऱ्याने राष्ट्रवादीत उत्साह; काँग्रेसची स्थिती 'जैसे थे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 17:30 IST

राज्यातील अनेक जिल्ह्यात दोन्ही पक्षांमध्ये दिग्गज नेत्यांची पोकळी निर्माण झाली. यावर राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रा काढून काही प्रमाणात मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला. तर काँग्रेसने देखील नाना पटोले यांच्या नेतृत्वात पोलखोल यात्रा काढली. मात्र काँग्रेसच्या यात्रेचा प्रभाव फरसा पडला नाही.

मुंबई - लोकसभा निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात पक्षातून झालेल्या आउंटगोईंगनंतर पक्षाला सावरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार खुद्द मैदानात उतरले आहे. पवार सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करत आहेत. मात्र राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेला काँग्रेस पक्ष अजुनही सैरभैर असल्याचे दिसून येते.

लोकसभा निवडणुकीच्या एकतर्फी निकालानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात गळती लागली. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात दोन्ही पक्षांमध्ये दिग्गज नेत्यांची पोकळी निर्माण झाली. यावर राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रा काढून काही प्रमाणात मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला. तर काँग्रेसने देखील नाना पटोले यांच्या नेतृत्वात पोलखोल यात्रा काढली. मात्र काँग्रेसच्या यात्रेचा प्रभाव फरसा पडला नाही. तर राष्ट्रवादीची यात्रा बऱ्यापैकी चर्चेत आली. पण हे पुरसं नव्हतं.

दरम्यान राष्ट्रवादीची यात्रा सुरू असतानाच पवार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत. त्यांच्या सभांना प्रत्येक जिल्ह्यात मिळत असलेला प्रतिसाद देखील मोठा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी हा बुस्टर डोस ठरणार आहे. त्याचवेळी काँग्रेसची परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष बदलण्यात आले आहे. तर नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्षांना अद्याप फारसचा प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळे काँग्रेस स्पर्धेत आहे का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

त्यातच काँग्रेसचे विदर्भातील नेते आशिष देशमुख यांनी पक्षाला घरचा आहेर देताना प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि पाच कार्याध्यक्षांवर घणाघाती टीका केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात सारे काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे केवळ संगमनेरपुरते प्रदेशाध्यक्ष आहेत की काय, अशी चर्चा सुरू आहे, अशी टीका आशिष देशमुख यांनी केली. तसेच निवडण्यात आलेल्या पाच कार्याध्यक्षांच्या कार्यपद्धतीवरही देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे पवारांच्या दौऱ्याने राष्ट्रवादीत उत्साह निर्माण झाला असला तरी काँग्रेसमध्ये 'जैसे थे' स्थिती असल्याचे दिसून येते.