शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पॅसेंजर बंद झाल्याने प्रवाशांना फटका; मध्य आणि पश्चिम रेल्वेवर अनेक गाड्यांचे रूपांतर एक्स्प्रेसमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 13:39 IST

रेल्वे मंत्रालयाने पूर्वीच्या पॅसेंजर गाड्यांचे रूपांतर एक्स्प्रेसमध्ये करण्याचा निर्णय घेतला.

मुंबई : पॅसेंजर गाड्या बंद करून त्यांच्या जागी कमी अंतरासाठी मेमू गाडीच्या फेऱ्या आणि  लांब पल्ल्यासाठी चालवल्या जाणाऱ्या पूर्वीच्या पॅसेंजर गाड्यांचे रूपांतर एक्स्प्रेसमध्ये करण्यात आले आहे. मध्य आणि  पश्चिम रेल्वेच्या काही पॅसेंजर गाड्या बंद झाल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. दरम्यान, पर्यायी व्यवस्था न करता या  पॅसेंजर गाड्या बंद केल्यामुळे प्रवासी संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. 

रेल्वे मंत्रालयाने पूर्वीच्या पॅसेंजर गाड्यांचे रूपांतर एक्स्प्रेसमध्ये करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पश्चिम रेल्वे मार्गावर पूर्वीच्या वलसाड, सुरत, भरूच पॅसेंजरच्या जागी मेमू गाड्यांच्या फेऱ्या तर पूर्वीच्या दोन अहमदाबाद पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये बदलून चालवल्या जात आहेत. त्याचप्रमाणे कोकण रेल्वे मार्गावर पूर्वीची रत्नागिरी पॅसेंजर मध्य रेल्वेच्या हद्दीत एक्स्प्रेस म्हणून तर कोकण रेल्वेच्या हद्दीत पॅसेंजर म्हणून पारंपरिक पद्धतीने चालवली जात आहे. तर, सावंतवाडी पॅसेंजरचे एक्स्प्रेसमध्ये रूपांतर करून चालवली जात आहे. 

तसेच मध्य रेल्वे प्रशासनाने पर्यायी इतर कोणतीही सोय न करता गेल्या कित्येक वर्षांपासून पनवेल - पुणे - पनवेल पॅसेंजर बंद करून टाकली आहे, तर मुंबई - भुसावळ - मुंबई पॅसेंजर बंद करून ही गाडी इगतपुरी - भुसावळ दरम्यान मेमू गाडीव्दारे चालवली जाते. त्यामुळे लोणावळा ते पुणे दरम्यानच्या लहान स्टेशनवर थेट प्रवास करणे अशक्य झाले असून प्रवाशांना कर्जत व लोणावळा अशा दोन ठिकाणी गाड्या बदलून व कर्जत - लोणावळा दरम्यान लांबपल्ल्याच्या मेल/एक्स्प्रेसने प्रवास करून ये-जा करावी लागत आहे. 

प्रवाशांची  गैरसोय : मुंबई परिसरातून इगतपुरी ते भुसावळ दरम्यानच्या छोट्या स्थानकांवरून थेट प्रवास करणे अशक्य झाले असून प्रवाशांना कसारा व इगतपुरी अशा दोन ठिकाणी गाड्या बदलून व कसारा - इगतपुरी दरम्यान लांबपल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेसने प्रवास करून जा-ये करावी लागत आहे. त्यातही रेल्वेने अनेक मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे कसारा व इगतपुरी हाॅल्ट गेल्या काही वर्षांत रद्द केले आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. 

आम्ही रेल्वे मंत्रालयाचा निर्णयाचा निषेध करतो, प्रवाशांची पर्यायी व्यवस्था न करता गाड्या रूपांतरित करणे योग्य नाही. रेल्वेने मुंबई - भुसावळ व पनवेल - पुणे पॅसेंजरच्या फेऱ्या पुन्हा सुरू कराव्यात.     - नंदकुमार देशमुख,  अध्यक्ष, उपनगरीय प्रवासी महासंघ 

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेpassengerप्रवासी