शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पॅसेंजर बंद झाल्याने प्रवाशांना फटका; मध्य आणि पश्चिम रेल्वेवर अनेक गाड्यांचे रूपांतर एक्स्प्रेसमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 13:39 IST

रेल्वे मंत्रालयाने पूर्वीच्या पॅसेंजर गाड्यांचे रूपांतर एक्स्प्रेसमध्ये करण्याचा निर्णय घेतला.

मुंबई : पॅसेंजर गाड्या बंद करून त्यांच्या जागी कमी अंतरासाठी मेमू गाडीच्या फेऱ्या आणि  लांब पल्ल्यासाठी चालवल्या जाणाऱ्या पूर्वीच्या पॅसेंजर गाड्यांचे रूपांतर एक्स्प्रेसमध्ये करण्यात आले आहे. मध्य आणि  पश्चिम रेल्वेच्या काही पॅसेंजर गाड्या बंद झाल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. दरम्यान, पर्यायी व्यवस्था न करता या  पॅसेंजर गाड्या बंद केल्यामुळे प्रवासी संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. 

रेल्वे मंत्रालयाने पूर्वीच्या पॅसेंजर गाड्यांचे रूपांतर एक्स्प्रेसमध्ये करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पश्चिम रेल्वे मार्गावर पूर्वीच्या वलसाड, सुरत, भरूच पॅसेंजरच्या जागी मेमू गाड्यांच्या फेऱ्या तर पूर्वीच्या दोन अहमदाबाद पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये बदलून चालवल्या जात आहेत. त्याचप्रमाणे कोकण रेल्वे मार्गावर पूर्वीची रत्नागिरी पॅसेंजर मध्य रेल्वेच्या हद्दीत एक्स्प्रेस म्हणून तर कोकण रेल्वेच्या हद्दीत पॅसेंजर म्हणून पारंपरिक पद्धतीने चालवली जात आहे. तर, सावंतवाडी पॅसेंजरचे एक्स्प्रेसमध्ये रूपांतर करून चालवली जात आहे. 

तसेच मध्य रेल्वे प्रशासनाने पर्यायी इतर कोणतीही सोय न करता गेल्या कित्येक वर्षांपासून पनवेल - पुणे - पनवेल पॅसेंजर बंद करून टाकली आहे, तर मुंबई - भुसावळ - मुंबई पॅसेंजर बंद करून ही गाडी इगतपुरी - भुसावळ दरम्यान मेमू गाडीव्दारे चालवली जाते. त्यामुळे लोणावळा ते पुणे दरम्यानच्या लहान स्टेशनवर थेट प्रवास करणे अशक्य झाले असून प्रवाशांना कर्जत व लोणावळा अशा दोन ठिकाणी गाड्या बदलून व कर्जत - लोणावळा दरम्यान लांबपल्ल्याच्या मेल/एक्स्प्रेसने प्रवास करून ये-जा करावी लागत आहे. 

प्रवाशांची  गैरसोय : मुंबई परिसरातून इगतपुरी ते भुसावळ दरम्यानच्या छोट्या स्थानकांवरून थेट प्रवास करणे अशक्य झाले असून प्रवाशांना कसारा व इगतपुरी अशा दोन ठिकाणी गाड्या बदलून व कसारा - इगतपुरी दरम्यान लांबपल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेसने प्रवास करून जा-ये करावी लागत आहे. त्यातही रेल्वेने अनेक मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे कसारा व इगतपुरी हाॅल्ट गेल्या काही वर्षांत रद्द केले आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. 

आम्ही रेल्वे मंत्रालयाचा निर्णयाचा निषेध करतो, प्रवाशांची पर्यायी व्यवस्था न करता गाड्या रूपांतरित करणे योग्य नाही. रेल्वेने मुंबई - भुसावळ व पनवेल - पुणे पॅसेंजरच्या फेऱ्या पुन्हा सुरू कराव्यात.     - नंदकुमार देशमुख,  अध्यक्ष, उपनगरीय प्रवासी महासंघ 

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेpassengerप्रवासी