शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
5
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
6
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
7
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
8
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
9
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
10
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
11
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
12
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
13
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
14
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
15
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
16
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
17
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
18
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
19
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
20
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!

पॅसेंजर बंद झाल्याने प्रवाशांना फटका; मध्य आणि पश्चिम रेल्वेवर अनेक गाड्यांचे रूपांतर एक्स्प्रेसमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 13:39 IST

रेल्वे मंत्रालयाने पूर्वीच्या पॅसेंजर गाड्यांचे रूपांतर एक्स्प्रेसमध्ये करण्याचा निर्णय घेतला.

मुंबई : पॅसेंजर गाड्या बंद करून त्यांच्या जागी कमी अंतरासाठी मेमू गाडीच्या फेऱ्या आणि  लांब पल्ल्यासाठी चालवल्या जाणाऱ्या पूर्वीच्या पॅसेंजर गाड्यांचे रूपांतर एक्स्प्रेसमध्ये करण्यात आले आहे. मध्य आणि  पश्चिम रेल्वेच्या काही पॅसेंजर गाड्या बंद झाल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. दरम्यान, पर्यायी व्यवस्था न करता या  पॅसेंजर गाड्या बंद केल्यामुळे प्रवासी संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. 

रेल्वे मंत्रालयाने पूर्वीच्या पॅसेंजर गाड्यांचे रूपांतर एक्स्प्रेसमध्ये करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पश्चिम रेल्वे मार्गावर पूर्वीच्या वलसाड, सुरत, भरूच पॅसेंजरच्या जागी मेमू गाड्यांच्या फेऱ्या तर पूर्वीच्या दोन अहमदाबाद पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये बदलून चालवल्या जात आहेत. त्याचप्रमाणे कोकण रेल्वे मार्गावर पूर्वीची रत्नागिरी पॅसेंजर मध्य रेल्वेच्या हद्दीत एक्स्प्रेस म्हणून तर कोकण रेल्वेच्या हद्दीत पॅसेंजर म्हणून पारंपरिक पद्धतीने चालवली जात आहे. तर, सावंतवाडी पॅसेंजरचे एक्स्प्रेसमध्ये रूपांतर करून चालवली जात आहे. 

तसेच मध्य रेल्वे प्रशासनाने पर्यायी इतर कोणतीही सोय न करता गेल्या कित्येक वर्षांपासून पनवेल - पुणे - पनवेल पॅसेंजर बंद करून टाकली आहे, तर मुंबई - भुसावळ - मुंबई पॅसेंजर बंद करून ही गाडी इगतपुरी - भुसावळ दरम्यान मेमू गाडीव्दारे चालवली जाते. त्यामुळे लोणावळा ते पुणे दरम्यानच्या लहान स्टेशनवर थेट प्रवास करणे अशक्य झाले असून प्रवाशांना कर्जत व लोणावळा अशा दोन ठिकाणी गाड्या बदलून व कर्जत - लोणावळा दरम्यान लांबपल्ल्याच्या मेल/एक्स्प्रेसने प्रवास करून ये-जा करावी लागत आहे. 

प्रवाशांची  गैरसोय : मुंबई परिसरातून इगतपुरी ते भुसावळ दरम्यानच्या छोट्या स्थानकांवरून थेट प्रवास करणे अशक्य झाले असून प्रवाशांना कसारा व इगतपुरी अशा दोन ठिकाणी गाड्या बदलून व कसारा - इगतपुरी दरम्यान लांबपल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेसने प्रवास करून जा-ये करावी लागत आहे. त्यातही रेल्वेने अनेक मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे कसारा व इगतपुरी हाॅल्ट गेल्या काही वर्षांत रद्द केले आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. 

आम्ही रेल्वे मंत्रालयाचा निर्णयाचा निषेध करतो, प्रवाशांची पर्यायी व्यवस्था न करता गाड्या रूपांतरित करणे योग्य नाही. रेल्वेने मुंबई - भुसावळ व पनवेल - पुणे पॅसेंजरच्या फेऱ्या पुन्हा सुरू कराव्यात.     - नंदकुमार देशमुख,  अध्यक्ष, उपनगरीय प्रवासी महासंघ 

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेpassengerप्रवासी