शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

'त्या' प्रवाशाला बोरीवली-अंधेरी फर्स्ट क्लासचा पास पडला 1.3 लाख रुपयांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 16:27 IST

ई-पेमेंटची सुविधा प्रवाशांच्या फायद्याची असली तरी, प्रवाशांकडून कार्डने पेमेंट स्विकारताना रेल्वे कर्मचा-यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देया मार्गावरचा फर्स्ट क्लास पास  1,333.30 रुपयांना आहे.बुकिंग विंडोवरच्या क्लार्कला आपले क्रेडिट कार्ड स्वाईप करण्यासाठी दिले.

मुंबई, दि. 16 - रेल्वेच्या बुकिंग काऊंटरवर सुरु झालेली ई-पेमेंटची सुविधा प्रवाशांच्या फायद्याची असली तरी, प्रवाशांकडून कार्डने पेमेंट स्विकारताना रेल्वे कर्मचा-यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. कारण काही दिवसांपूर्वी पश्चिम रेल्वेमार्गावर क्लार्ककडून अनावधानाने घडलेल्या चुकीचा एका प्रवाशाला जबर आर्थिक फटका बसला. 

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार दहीसर येथे राहणारे विकास मंचेकर 4 ऑगस्टला अंधेरी-बोरीवली मार्गावरचा फर्स्ट क्लासचा तिमाहीचा पास काढण्यासाठी बोरीवली रेल्वे स्थानकात गेले होते. या मार्गावरचा फर्स्ट क्लास पास  1,333.30 रुपयांना आहे. मंचेकर यांनी बुकिंग विंडोवरच्या क्लार्कला आपले क्रेडिट कार्ड स्वाईप करण्यासाठी दिले. त्यावेळी त्या क्लार्कने 1,333.30 ऐवजी 1,33,330 लाख रुपयांची रक्कम डेबिट केली. त्यामुळे आता उर्वरित लाखो रुपयांची रक्कम परत मिळवण्यासाठी  मंचेकर यांना  पश्चिम रेल्वेच्या कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत. 

आणखी वाचा चीनी स्मार्टफोन वैयक्तिक माहिती चोरत असल्याची भीती, केंद्र सरकारची नोटीस'इंदिरा'ऐवजी चुकून 'अम्मा' बोलून फसले राहुल गांधी 

विकास मंचेकर यांनी लगेच हा प्रकार स्टेशन अधिका-यांच्या लक्षात आणून दिला. रक्कम परत मिळावी यासाठी लिखित तक्रारही केली. ज्या बँकेने क्रेडिट कार्ड इश्यू केले तिथेही फोन केला पण त्याचा उपयोग झाला नाही. 24 ऑगस्टची डयु डेट असून तो पर्यंत रक्कम खात्यात जमा झाली नाही तर, त्यांना 4 ते 5 हजार रुपयांचे व्याज भरावे लागेल. बँकेने व्याज आकारले तर, पश्चिम रेल्वेने भरपाई करावी अशी त्यांची मागणी आहे. पैसे परत मिळवण्यासाठी मंचेकर यांना त्यांच्या दिवसभराच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून मुंबई सेंट्रल येथे चकरा माराव्या लागत आहेत. तेथे पश्चिम रेल्वेचे विभागीय कार्यालय आहे. 

काऊंटरवरील बुकिंग क्लार्क विरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरु करण्यात आली आहे असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी सांगितले. प्रवाशाला त्याचे अतिरिक्त पैसे लवकरात लवकर परत मिळावेत यासाठी स्टेट बँकेबरोबर चर्चा करण्यासाठी पश्चिम रेल्वेने एका व्यक्तीची नियुक्ती केली आहे असे त्यांनी सांगितले. अशा प्रकारची चूक होऊ नये यासाठी रेल्वेने त्यांच्या कर्मचा-यांना योग्य प्रकारे प्रशिक्षण दिले पाहिजे असे विकास मंचेकर म्हणाले.