शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

पोपट मेलाच आहे; पण सांगायचे कुणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2017 04:40 IST

नाशिक शहरात सन २०१२च्या महापालिका निवडणुकीच्या वेळीच सेना-भाजपा युतीचा पोपट मेला आहे, पण आता २०१७ च्या निवडणुकीतही तो थडग्यातून पुन्हा उकरून

धनंजय वाखारे / नाशिक नाशिक शहरात सन २०१२च्या महापालिका निवडणुकीच्या वेळीच सेना-भाजपा युतीचा पोपट मेला आहे, पण आता २०१७ च्या निवडणुकीतही तो थडग्यातून पुन्हा उकरून काढत अर्धमेला झाला आहे, निपचित पडलेला आहे, असे सांगत युतीबाबत सेना-भाजपात एकमेकांना झुलवत ठेवले जात आहे. राज्यस्तरावर युतीबाबत खलबते सुरू असली तरी नाशिकमध्ये महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्यास सेना-भाजपा ठाम आहे. फक्त युतीच्या या साऱ्या चर्चेत पोपट कधीच मेला आहे, हे सांगायचे कुणी, हा खरा प्रश्न आहे. २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत युती तोडण्यास भाजपानेच पुढाकार घेतला होता. त्या वेळी १२२ ठिकाणी उमेदवार देताना सेना-भाजपा या दोन्ही पक्षांची दमछाक झाली होती. निवडणुकीत भाजपाने आपल्या १४ जागा राखल्या होत्या, तर सेनेचे संख्याबळ कमी होऊन ते २२ वर आले होते. त्यानंतर गेल्या पाच वर्षांत सेना-भाजपातून विस्तव गेला नाही आणि एकमेकांना विरोध करण्यातच उभयतांनी शक्ती खर्च केली. आता २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी सेना - भाजपाने स्वबळावर लढण्याची पूर्ण तयारी चालविली आहे. स्थानिक पातळीवर युतीच्या वावड्या उठविल्या जात असल्या तरी दोन्ही पक्षांचे पदाधिकारी मात्र कोणत्याही परिस्थितीत युती करायची नाही, या मुद्द्यावर ठाम आहेत. शहरात गेल्या पाच वर्षांत १२२ पैकी तब्बल ४२ नगरसेवकांनी पक्षांतरे केलेली आहेत आणि महापालिकेच्या इतिहासात ही सर्वात मोठ्या प्रमाणावर पक्षांतराची लाट ठरली आहे. त्यात शिवसेनेत तब्बल २४, तर भाजपात १८ नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे यातील काही अपवाद वगळता सर्वांना तिकिटे देण्याचे आव्हान उभयतांपुढे आहे. यदाकदाचित वरिष्ठ स्तरावरून युतीचा संदेश आल्यास सेना-भाजपात तिकिटावरून मोठी दुफळी माजण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी व इच्छुकांकडूनही युती न होण्याचीच मानसिकता दर्शविली जात आहे.