शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

‘शेतकरी चषक पुरस्कारा’साठी पाणी फाऊंडेशन करणार डिजिटल पद्धतीचा अवलंब, आमिर खानने दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 21:27 IST

आमिर-किरणसोबत ‘पाणी फाऊंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ या कार्यक्रमाला उपस्थित होते.

मुंबई - पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर करण्यासाठी झटणाऱ्या अभिनेता आमिर खानचे पाणी फाऊंडेशन डिजिटल मार्गाचा अवलंब करणार आहे. आमिर खानने याबाबतचे संकेत दिले आहेत. या मार्गाने पाणी फाऊंडेशन आपल्या ध्येयाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकणार असल्याचेही आमिरने सांगितले आहे. पाणलोट व्यवस्थापन आणि भूजल झिरपण्याच्या प्रक्रियेला चालना देण्याच्या दिशेने धोरणात्मक वाटचाल करताना आमिर खान आणि किरण राव यांनी २०१६ मध्ये स्थापन केलेल्या ‘पाणी फाऊंडेशन’तर्फे अलीकडेच पुण्यात ‘सत्यमेव जयते शेतकरी चषक २०२३ पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 

आमिर-किरणसोबत ‘पाणी फाऊंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ या कार्यक्रमाला उपस्थित होते. शेतकरी चषक २०२३ पुरस्कार सोहळ्यादरम्यान ‘पाणी फाऊंडेशन’ची सात प्रभावी वर्षे साजरी करत असल्याचे सांगताना आमिरने संस्थेच्या भविष्यातील योजनांचीही माहिती दिली. डिजिटल परिवर्तनाच्या आवश्यकतेवर भर देत आमिर म्हणाला की, आम्ही या टप्प्यापर्यंत सर्वतोपरी प्रयत्न करीत पोहोचलो आहोत. यंदापासून तंत्रज्ञानाच्या वापराची अंमलबजावणी करण्याचे निश्चित केले आहे. 

या वर्षी होणारी ही स्पर्धा डिजिटल पद्धतीने होणार असून, आम्हा सर्वांसाठी हे एक वेगळा अनुभव देणारी ठरेल. त्यात यशस्वी झाल्यास यंदा गटशेती राबवण्यात येईल. येत्या दोन वर्षांत प्रत्येक प्रदेशाशी जोडले जाण्याचे आणि प्रत्येक प्रदेशात गटशेती करण्याचे आमचे ध्येय आहे. गेल्या काही वर्षांत आमचे २० हजारांहून अधिक सदस्य सक्रियपणे समूह शेती करत असून या आकडेवारीत आणखी भर घालण्यास आणि कार्य सातत्याने चालू ठेवण्यास वचनबद्ध असल्याचेही आमिर म्हणाला.

पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल स्टेडियममध्ये अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या ‘सत्यमेव जयते शेतकरी चषक पुरस्कार’ सोहळा संपन्न झाला. दीपप्रज्वलनाने सुरू झालेल्या या सोहळ्यात वेधक कार्यक्रमही सादर करण्यात आले. डॉ. पोळ यांनी आपल्या भाषणात कोणत्याही प्रकल्पाच्या यशासाठी भागीदारी महत्त्वाची असल्याचे सांगत एका प्रकारे कार्यक्रमाची दिशा निश्चित केली.

टॅग्स :Aamir Khanआमिर खान