शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
3
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
4
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
5
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
6
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
7
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
8
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
9
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
10
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
11
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
12
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
13
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
14
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
15
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
16
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
17
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
18
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
19
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
20
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास

‘शेतकरी चषक पुरस्कारा’साठी पाणी फाऊंडेशन करणार डिजिटल पद्धतीचा अवलंब, आमिर खानने दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 21:27 IST

आमिर-किरणसोबत ‘पाणी फाऊंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ या कार्यक्रमाला उपस्थित होते.

मुंबई - पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर करण्यासाठी झटणाऱ्या अभिनेता आमिर खानचे पाणी फाऊंडेशन डिजिटल मार्गाचा अवलंब करणार आहे. आमिर खानने याबाबतचे संकेत दिले आहेत. या मार्गाने पाणी फाऊंडेशन आपल्या ध्येयाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकणार असल्याचेही आमिरने सांगितले आहे. पाणलोट व्यवस्थापन आणि भूजल झिरपण्याच्या प्रक्रियेला चालना देण्याच्या दिशेने धोरणात्मक वाटचाल करताना आमिर खान आणि किरण राव यांनी २०१६ मध्ये स्थापन केलेल्या ‘पाणी फाऊंडेशन’तर्फे अलीकडेच पुण्यात ‘सत्यमेव जयते शेतकरी चषक २०२३ पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 

आमिर-किरणसोबत ‘पाणी फाऊंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ या कार्यक्रमाला उपस्थित होते. शेतकरी चषक २०२३ पुरस्कार सोहळ्यादरम्यान ‘पाणी फाऊंडेशन’ची सात प्रभावी वर्षे साजरी करत असल्याचे सांगताना आमिरने संस्थेच्या भविष्यातील योजनांचीही माहिती दिली. डिजिटल परिवर्तनाच्या आवश्यकतेवर भर देत आमिर म्हणाला की, आम्ही या टप्प्यापर्यंत सर्वतोपरी प्रयत्न करीत पोहोचलो आहोत. यंदापासून तंत्रज्ञानाच्या वापराची अंमलबजावणी करण्याचे निश्चित केले आहे. 

या वर्षी होणारी ही स्पर्धा डिजिटल पद्धतीने होणार असून, आम्हा सर्वांसाठी हे एक वेगळा अनुभव देणारी ठरेल. त्यात यशस्वी झाल्यास यंदा गटशेती राबवण्यात येईल. येत्या दोन वर्षांत प्रत्येक प्रदेशाशी जोडले जाण्याचे आणि प्रत्येक प्रदेशात गटशेती करण्याचे आमचे ध्येय आहे. गेल्या काही वर्षांत आमचे २० हजारांहून अधिक सदस्य सक्रियपणे समूह शेती करत असून या आकडेवारीत आणखी भर घालण्यास आणि कार्य सातत्याने चालू ठेवण्यास वचनबद्ध असल्याचेही आमिर म्हणाला.

पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल स्टेडियममध्ये अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या ‘सत्यमेव जयते शेतकरी चषक पुरस्कार’ सोहळा संपन्न झाला. दीपप्रज्वलनाने सुरू झालेल्या या सोहळ्यात वेधक कार्यक्रमही सादर करण्यात आले. डॉ. पोळ यांनी आपल्या भाषणात कोणत्याही प्रकल्पाच्या यशासाठी भागीदारी महत्त्वाची असल्याचे सांगत एका प्रकारे कार्यक्रमाची दिशा निश्चित केली.

टॅग्स :Aamir Khanआमिर खान