शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

‘शेतकरी चषक पुरस्कारा’साठी पाणी फाऊंडेशन करणार डिजिटल पद्धतीचा अवलंब, आमिर खानने दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 21:27 IST

आमिर-किरणसोबत ‘पाणी फाऊंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ या कार्यक्रमाला उपस्थित होते.

मुंबई - पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर करण्यासाठी झटणाऱ्या अभिनेता आमिर खानचे पाणी फाऊंडेशन डिजिटल मार्गाचा अवलंब करणार आहे. आमिर खानने याबाबतचे संकेत दिले आहेत. या मार्गाने पाणी फाऊंडेशन आपल्या ध्येयाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकणार असल्याचेही आमिरने सांगितले आहे. पाणलोट व्यवस्थापन आणि भूजल झिरपण्याच्या प्रक्रियेला चालना देण्याच्या दिशेने धोरणात्मक वाटचाल करताना आमिर खान आणि किरण राव यांनी २०१६ मध्ये स्थापन केलेल्या ‘पाणी फाऊंडेशन’तर्फे अलीकडेच पुण्यात ‘सत्यमेव जयते शेतकरी चषक २०२३ पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 

आमिर-किरणसोबत ‘पाणी फाऊंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ या कार्यक्रमाला उपस्थित होते. शेतकरी चषक २०२३ पुरस्कार सोहळ्यादरम्यान ‘पाणी फाऊंडेशन’ची सात प्रभावी वर्षे साजरी करत असल्याचे सांगताना आमिरने संस्थेच्या भविष्यातील योजनांचीही माहिती दिली. डिजिटल परिवर्तनाच्या आवश्यकतेवर भर देत आमिर म्हणाला की, आम्ही या टप्प्यापर्यंत सर्वतोपरी प्रयत्न करीत पोहोचलो आहोत. यंदापासून तंत्रज्ञानाच्या वापराची अंमलबजावणी करण्याचे निश्चित केले आहे. 

या वर्षी होणारी ही स्पर्धा डिजिटल पद्धतीने होणार असून, आम्हा सर्वांसाठी हे एक वेगळा अनुभव देणारी ठरेल. त्यात यशस्वी झाल्यास यंदा गटशेती राबवण्यात येईल. येत्या दोन वर्षांत प्रत्येक प्रदेशाशी जोडले जाण्याचे आणि प्रत्येक प्रदेशात गटशेती करण्याचे आमचे ध्येय आहे. गेल्या काही वर्षांत आमचे २० हजारांहून अधिक सदस्य सक्रियपणे समूह शेती करत असून या आकडेवारीत आणखी भर घालण्यास आणि कार्य सातत्याने चालू ठेवण्यास वचनबद्ध असल्याचेही आमिर म्हणाला.

पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल स्टेडियममध्ये अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या ‘सत्यमेव जयते शेतकरी चषक पुरस्कार’ सोहळा संपन्न झाला. दीपप्रज्वलनाने सुरू झालेल्या या सोहळ्यात वेधक कार्यक्रमही सादर करण्यात आले. डॉ. पोळ यांनी आपल्या भाषणात कोणत्याही प्रकल्पाच्या यशासाठी भागीदारी महत्त्वाची असल्याचे सांगत एका प्रकारे कार्यक्रमाची दिशा निश्चित केली.

टॅग्स :Aamir Khanआमिर खान